कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday, 30 March 2018

फसवणूक 

                         एका स्त्री ने प्रश्न विचारला, पतीने धंध्यामधे पैसे गुंतविण्यासाठी एका व्क्यक्तीला १० लाख रूपये दिले. १५ दिवसांनी सदर व्यक्ती पळून गेली. त्याव्यक्ती कडून पैसे परत मिळतील का ?
 के पी. १५९ दिनांक २६/३/१८ वेळ १८-१३-५७ फलटण
अ १७-५९ रे ७४ -२६
नियम...षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे मिळतील. 
सब शनी असेल तर कमी मिळतील ,बुध असेल तर हप्त्यांत मिळतील.
पतिने पैसे दिलेत म्हणून कुंडली फिरवून घेतली
षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे परत मिळतील. 
फिरविलेल्या कुंडलीमधे षष्टाचा सब शनी आहे 
शनी..
शुक्र..११ १
शुक्र..
केतू..८ ,९ कस्प युती श ७ ९ 
शनी ३-४ पायरीवर ७,८,९ चा कार्येश आहे  २,६ चा कार्येश होत नाही. 
दशा शनी बुध २६-४-१९ पर्यंत
शनी चे कार्येशत्व वर आहेच. 
बुध..१०, ५ ,११
बुध..१०,५,११
रवी..१०,४ मं द्रुष्ट ७ ,१२
शनी..७ ,९

बुध सुधा २,६ चा कार्येश होत नाही. 

सबब पैसे मिळणार नाहीत.
माझे मत...चतुर्थात पापग्रह असतील तर व्यक्ती, लबाड,अप्रामाणिक, खोटारडी, फसवणूक करणारी असते . (  (शनी,मंगळ,राहू ,नेपच्यून ) 
या कुंडलीमध्ये नेपच्यून चतुर्थ भावारंभी आहे 
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये नेपच्यून दशम भावारंभी येतो . धंद्यामध्ये फसवणूक 
पैसे मिळण्यासाठी सहावा भाव लागलाच पाहिजे, कारण सप्तम भाव हि पळून गेलेली व्यक्ती तिच्या पैशाचा व्यय म्हणजे षष्ट स्थान . षष्ट स्थान लागत नाही. म्हणून पैसे मिळणार नाहीत.
फक्त ६ किंवा २ ६ चा कार्येश असलाच पाहिजे. फक्त २ लागून चालणार नाही.
 ११ भाव तसा दुय्यम आहे. फक्त इच्छापुर्ती दाखवितो. म्हणून ६ ११ किंवा २ ६ ११ भाव असावेत.
शुभम भवतु 





















Wednesday, 14 March 2018

   सबची प्रतिकूलता 
                                        आदित्य , अधुनमधून माझ्याकडून ज्योतिष चा सल्ला घेत असे. मध्यंतरी ऑगस्ट २०१७ मधे नोकरीविषयी प्रश्र्न विचारला होता. तो म्हणाला तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे. मि नविन नोकरीसाठी मुलाखत दिली आहे. मला खात्री आहे , माझी निवड होईल. काल त्याचा अहमदाबाद हून फोन आला मला म्हणाला माझा विवाहाचा योग केंव्हा आहे ?  त्याची पत्रिका माझ्याकडे आहेच. शिवाय मि त्याला एक केपी नंबर ध्यायला सांगितले. त्याने ३७ नंबर दिला. २-३ दिवसांनी सांगतो असे म्हणून फोन ठेवला.
त्याची पत्रीका खालीलप्रमाणे।....।
दिनांक...३१/३/१९८५ वेळ...सकाळी १०-१०-१२ स्थळ..परभणी
त्याच्या पत्रीकेची लग्नशुध्दि मि यापुर्वीच केली होती.
नियम... ७ चा सब २ ७ ११ चा कार्येश असेल तर २ ७ ११ च्या संयुक्त दशेमधे विवाह होतो.
या पत्रिकेत ७ चा सब शुक्र आहे.
शुक्राचे कार्येशत्व....
शुक्र...
बुध...११,५ शु युती ११,१
चंद्र...
शनी...६,१०

फोर स्टेप प्रमाणे या ठिकाणी सबची प्रतीकुलता निर्माण झाली आहे. म्हणजे शुक्र ३-४ स्टेपला पुर्णपणे विरोधी भावाचा कार्येश झाला आहे. सबब आदित्य चा विवाह होणार नाही असे खात्रीपुर्वक म्हणता येईल.
तसेच ७ चा सब शुक्र मिन या द्विस्वभाव राशीत आहे व शुक्र बुधाच्या युतीत आहे .
 दशेचा विचार केल्यास आता बुध शनी गुरू दशा २०/७/१८ पर्येंत आहे
                              बुध...११,५ शु यु ११ १
नक्षत्र स्वामी              बुध... ११,५शु यु  ११,१
सब...                       चंद्र...
सब चा न. स्वामी         शनी...६,१०

                           शनी...६,१०
नक्षत्र स्वामी           शनी...६,१०
सब..                    शनी...६,१०
सब चा न. स्वामी.    शनी...६,१०

                                गुरू...
नक्षत्र स्वामी                चंद्र..२,३
सब..                         शनी...६,१०
सब चा न. स्वामी          शनी...६,१०

एकूण दशेचा विचा र केला दशा सुद्धा विरोधी भावाची कार्येश आहे म्हणून  २०/७/१८ पर्यंत विवाह होणार नाही. 

Saturday, 3 February 2018

  विवाह केंव्हा ?        

पुरूष ९/९/८९ १२-२५ दुपारी गुलबर्गा  .
मी पत्रिका पहिली त्यावेळचे रुलिंग खालीलप्रमाणे

        दि . ३/२/१८     वेळ ३-०७-४८ दुपारी             फलटण ( अ १७,५९ रे ७४,२६ )
एल..बुध           एस..रवी            आर..रवी              डी..शनी            एल एस मंगळ
दशा म. द  / अं .द  रवी शनी १८/११/१८ पर्यंत .

७ चा सब बुध . 
बुध रूलिंगमधे आहे . तसेच म.द. व अं.द स्वामी रवी , शनी सुधा रूलिंगमधे आहेत म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
बुध..१०,८ श द्रुष्ट १ ४
चंद्र..१
शनी..१,४ गु द्रु ७ २ ५
शुक्र .. ११ १२

बुध २ ५ ७ ८ ११ या अनुकूल भावांचा कार्येश आहे.
रवी शनी दशा १८/११/१८ पर्यंत आहे

रवी ..१०
शुक्र ..११ १२
शनी..१ ४ गु द्रु ७ २ ५
शुक्र ..११ १२

रवी २ ५ ७ ११ चा कार्येश आहे .
शनी..१ ४ गु द्रु ७ २ ५
शुक्र ..११ १२
शुक्र ..
मंगळ .. १० ६

शनी २ ५ ७ ११ या.बरोबर १ ४ ६ १० चा कार्येश आहे म्हणून सोडून दिली . त्या पुढील बुध अं.द.निश्र्चित केली.
बुधाचे कार्येशत्व वर काढललेले आहे . बुध २ ५ ७  ११ चा कार्येश आहे.
रवी बुध बुध १८/११/१८ ते १/१/१९ पर्येंत विवाह होईल.
 गोचर......
रवी बुध दोन्ही जलद गतीचे ग्रह.आहेत म्हणून त्यांचे नक्षत्रस्वामी पहिल्या दोन पायरीवर अनुकूल असेल तर घटना.घडेल .

रवी बुध दोन्ही १८/११/१८ ते १५/१२ /१८ पर्यंत अनुकूल आहेत.
याच कालावधीत विवाह होईल.

Tuesday, 30 January 2018

विवाह केंव्हा होईल  ?
 पुरूष २४/८/८०  ६-१५ सकाळी  चोपडा जि जळगाव

 एल   एस   आर    डी
शुक्र   गुरू    शुक्र    बुध    एल एस राहू
 ७/६/१७ . ३-४३-०४ दुपारी   फलटण

७ चा सब.राहू  राहू रूलिंग  मधे आहे
 राहू चे कार्यत्व
राहू १२ चं ६
बुध  १२, १ क यू  दृ ७ रवी यू १२
राहू १२चं ६
बुध  १२, १ क यू दृ ७ रवी यू १२


सब राहू बुधाच्या नक्षत्रात बुद्ध प्रथम भावारंभी आहे  म्हणून बुधाची सप्तम भावावर पूर्ण द्रुष्टी आहे . म्हणून राहू ७ चा का र्येश होतोय
आता विवाह केंव्हा होईल यासाठी दशा पाहू .  गुरू म.द २०३२ प
जन्मकुंडली सिंह लग्नाची आहे.  सिंह स्थिर लग्न म्हणून शनी अंतर्रशा घेतली
गुरू। शनी १०/१०/२०पर्यंत
 गुरू १। २। ३। ७। १०। ११। १२
यामधे २। ३। ७। ११ अनुकूल
शनी १। २। ७। १२ चा कार्येश
 २। ७। अनुकूल शिवाय शनी सप्तमेष आहे  पुढील विदशा पाहू
 बुध २। ३। ७। बरोबर ४। ६ चा कार्येश
 केतू। २। ३। ९। बरोबर १ ,४ ,६ ,१२ चा कार्येश म्हणून बुध व के तू दोन्ही विदशा सोडून दिल्या
 त्यापुढील शुक्र विदशा
शुक्र १। ३। ५। ८। ११ चा कार्येश
 गुरू शनी शुक्र २५/२/१९ ते २९/७/१९  ह्या कालावधीत विवाह होईल, 

Thursday, 25 January 2018

पत्रिका मेलन
 पुरूष २४/५/८६  २१-१०  कोल्हापूर
हि पत्रीका पत्रिका मेलन साठी आली होती.
मि ज्यावेळी पत्रिका पाहिली त्यावेळी ७ चा सब गुरू होता. तो रूलींग मधे होता.
आजही गुरू लग्न नक्षत्र स्वामी म्हणून रूलिंग मधे आला आहे.
२६/१/१८  ९-४६-४४ फलटण
एल.. शनी एस..रवी आर..मंगळ डी..शुक्र एल एस..गुरू
म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे.
७ चा सब गुरू
गुरू..३
गुरू..३
बुध.. ६ क.यु
चंद्र..१२ ८
 ४ स्टेप प्रमाणे गुरू ३-४ पायरीला ६ ८ १२ भाव चा कार्येश आहे.
८ भाव हा पुरक भाव आहे. परंतू जोडीला ६। १२ भाव असल्यामुळे सदर पत्रिका जुळत नाही.
सप्तमाचा सब गुरू ६ १२ भावांचा कार्येश आहे म्हणजे या पत्रिकेत वै.सौख्याचा अभाव आहे म्हणून पत्रीका जूळत नाही. 

Thursday, 18 January 2018

जन्म वेळ निश्र्चित करणे ( लग्न शु ध्दी ) ...
आमच्या कॉलेजमधील एक प्राध्यापक मला म्हणाले , माझी पत्रीका काढायची आहे . मि म्हटले काढू की. ते म्हणाले मला जन्मतारीख माहीत आहे पण जन्मवेळ माहीत नाही. ठिक आहे मि प्रयत्न करेन. त्या नंतर हि गोष्ट मि विसरून गेलो . एक दिवस त्या सरांनी विचारले पत्रीका काढली का ? तेंव्हा लक्षात आले सरांची पत्रीका काढायची आहे. एक दिवस ठरवून पत्रीका काढायला बसलो.

१०/११/६१ वेळ.. सकाळी स्थळ...करमाळा
वेळ नक्की माहित नाही.
कृष्णमूर्ती पद्धतीने वेळ निश्च्छित करता येते . रुलिंग प्लॅनेट वरून पत्रिकेचे लग्नारंभ ठरविता येतो . रुलिंग प्लॅनेट म्हणजे १) आपण ज्यावेळी पत्रिका काढायला सुरुवात करू त्यावेळी कोणते लग्न आहे ते पाहणे 
                              लग्नाचा स्वामी 
                        २) चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी 
                        ३) चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी 
                        ४) वाराचा स्वामी 
          इंग्रजी मध्ये  L S R D म्हणतात किंवा रुलिंग म्हणतात.      


मि रूलिंग प्लनेट पाहिले
१८/१/२०१८ वेळ..१-११-११ फलटण
एल..मंगळ, एस..चंद्र,  आर..शनी ,डी ..गुरू ,एल एस..शुक्र
१) मंगळ ग्रहाची दोन लग्ने मेष , व्रुश्र्चिक
२) चंद्राचे कर्क
३) शनीची मकर व कुंभ
४) गुरू ची धनू व मिन
प्रथम पासून पाहू ....
१) मेष मधे केतू शुक्र व रवी ची नक्षत्रे आहेत यापैकी एकही रूलिंग मधे नाही म्हणजे मेष लग्न असणार नाही. व्रुश्र्चिक मधे गरु शनी बुधाचे नक्षत्र आहे . यापैकी गुरू शनी रूलिंग मधे आहेत . म्हणून व्रुश्र्चिक असू शकते
२) कर्क राशीमधे गुरू शनी बुध नक्षत्रे आहेत. यापैकी गुरू शनी रूलिंगमधे आहेत .म्हणून  कर्क असू शकते
३) मकर मधे रवी चंद्र मंगळ नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ चंद्र रूलिंगमधे आहेत म्हणून मकर असू शकते तसेच कुंभमधे मंगळ राहू गुरू ची नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ गुरू रुलिंगमधे आहेत म्हणून कुंभ असू शकते.
४) धनू राशीमध्ये केतू शुक्र रवी ची नक्षत्रे आहेत यापैकी एकही रूलिंगमधे नाही म्हणून धनू असणार नाही. मिन राशीमधे गुरू शनी बुध नक्षत्रे आहेत यापैकी गुरू शनी रूलिंगमधे आहेत परंतू गुरू दोन वेळा नाही म्हणून मिन  लग्न गुरु नक्षत्र असणार नाही. मिन लग्न शनी नक्षत्र घेता येईल
व्रुश्र्चिक ,कर्क ,मकर व कुंभ ,मिन यापैकी एक लग्न आहे हे नक्की झाले.
 व्रुश्र्चिक चा स्वामी... मंगळ
कर्क चा स्वामी..... चंद्र
मकर चा स्वामी...शनी
कुंभ चा स्वामी....शनी
मिन चा स्वामी ... गुरु
आता रूलिंग मधील प्रत वारी चा विचार करू
मंगळ...प्रथम
चंद्र....द्वितीय
शनी...त्रितीय
गुरू....चतुर्थ
कर्क मकर व कुंभ मिन यांची प्रत वारी २ व ३ ,४ क्रमांकाची आहे , म्हणून हि लग्ने घेता येणार नाहीत.सदर व्यक्तीचा जन्म व्रुश्र्चिक लग्नावर झाला असे ठामपणे म्हणता येईल.
आता किती अंशावर जन्म झाला ते पाहू ....
 व्रुश्र्चिक राशीमधे गुरू शनी बुधा ची नक्षत्रे आहेत यापैकी गुरू शनी रूलींग मधे आहेत .पैकी शनी तिसर्या  प्रतीचा व गुरू ४ थ्या प्रतीचा आहे . म्हणून व्रुश्र्चिक रास शनी नक्षत्र असे निवडावे लागेल. आता सब व सब सब निवडायचा . चंद्र व गुरू बाकी आहेत यापैकी चंद्र दुसर्या प्रतीचा व गुरू ४ थ्या प्रतीचा म्हणून सब चंद्र  व सब सब गुरू घ्यावे लागेल .
सदर व्यक्ती चा जन्म व्रुश्र्चिक रास शनी नक्षत्र चंद्र सब व गुरू सब सब वर झाला असे म्हणता येईल.
यावरून शहासने सरांचे उपनक्षत्रस्वामीचे कोष्टक आहे त्यावरून लग्नाचे अंश कला विकला ठरविणे  . सॉफ्टवेअर मधील ट्रान्झिट ऑप्शन वापरून वेळ ठरविता येते . ती वेळ येते ... 
सकाळी ७-५३-१७
या वेळेवरून के पी पध्दतीने कुंडली काढली
काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही हे पहाण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील दोन घटना तपासून पाहील्या .
१ ) नोकरी...१५/२/१९८९
२) विवाह..२५/५/१९९०
नियम .. दशमाचा सब २ ६ १० चा कार्येश असेल तर २ ६ १० च्या संयुक्त दशेमधे नोकरी मिळते 

नोकरी ...१५/२/८९
यावेळी शुक्र शुक्र चंद्र दशा होती
                                          शुक्र..११ ७ बु यू ११ ८
       नक्षत्रस्वामी                मंगळ..१२ ६
      उपनक्षत्रस्वामी ( सब )   रवी..
सब चा नक्षत्रस्वामी            गुरू..२ ५

शुक्र  २ ६ ११ चा कार्येश

                                   चंद्र..१
नक्षत्रस्वामी                शनी.. २ ४
 उपनक्षत्रस्वामी ( सब )गुरू ..
सब चा नक्षत्रस्वामी     रवी .. १२ १०

चंद्र २ ४ १० चा कार्येश
सदर दशा २ ४ ६ १० ११ ची कार्येश आहे . ४ शैक्षणीक क्षेत्र .
सदर व्यक्ती कॉलेज मधे प्रा. आहे.
विवाह...७ चा सब २ ७ ११ चा कार्येश असेल तर २ ७ ११ च्या संयुक्त दशेमधे विवाह होतो.
विवाह..२२/५/१९९०
यावेळी शुक्र शुक्र गुरू दशा होती
शुक्र २। ५। ७। ८। ११
चा कार्येश आहे हे आपण वर पाहिले
गुरू ...
रवी..१२ १०
केतू..३ श २ ४
मंगळ..१२ ६
गुरू २ ३ भावाचा कार्येश आहे
विवाह ठरणे व होणे यामधे अंतर असू शकते. विवाह झाला त्यावेळी गुरू विदशा होती ति फारशी अनुकूल नाही. म्हणूश मि त्याना विचारले विवाह केंव्हा ठरला. ? ते म्हणाले जानेवारी मधे ठरला.
जानेवारी मधे राहू  ची दशा होती
राहू ७ ८ ९ १० ११ १२ चा कार्येश आहे.
राहू ७ ८ ९ ११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे .
   शुभम भवतू 

Tuesday, 9 January 2018

कन्सर असेल का ?
माझ्या मेव्हण्याचा नातू. १२-१३ वर्षाचा असेल. एक दिवस खेळताना त्याचा पाय दुखायला लागला. खेळून खेळून दुखत असेल म्हणून घरच्यांनी दुर्लक्ष केल. एक दिवस रात्रीच रडायला लागला म्हणायला लागला , माझा पाय दुखतोय. आई वडीलांनी डॉ.ला दाखवले. डॉ.नी  काही गोळ्या दिल्या . काही दिवस बरे वाटले. पण पुन्हा तो म्हणायला लागला माझा पाय जास्तच दुखतोय. मग सर्वांनाच काळजी वाटायला लागली पुन्हा एका निष्णात डॉ.ला दाखविले त्यावेळी डॉ. म्हणाले पायाच्या हाडाजवळ एक गाठ आहे. ति दुखतेय. ( डाव्या पायाच्या नडगी ..गुडघ्याखाली ) ऑपरेशन करून ति गाठ काढली पाहिजे . व तपासायला पाठवली पाहिजे. आता मात्र सर्व कुटुंब हादरले. नाना शंका यायला लागल्या. आई वडिलांची झोप उडाली. एवढ्या लहान वयात अस होऊ शकत ?
अशावेळी नाही म्हटले तरी मनात शंका येतातच ना.....
याच अवस्थेत मुलाच्य आईने प्रश्र्न विचारला . डॉ.ने सांगितले ते सर्व सांगितले व कन्सर असेल का ? यातून केंव्हा बरा होईल .?
 मि तिला एक केपी नंबर द्यायला  सांगितले.तिने ४० नंबर दिला .
या नंबर वरून मि केपी पध्दतीने कुंडली काढली . या कुंडलीतील चंद्रावरून मनातील विचार जुळतो का ते पाहू .   चंद्र दशमात आहे.चंद्र दशमात म्हणजे पंचमापासून षष्टात. म्हणाजे प्रशश्र्नाच रोख बरोबर आहे.
 दि. २४/१२/२०१७ वेळ..२१-०८-५३  फलटण
 शरीरामधे अनावश्यक पेशींच्या गाठी तयार करणे ह्याचे कारकत्व गुरू ग्रहाकडे आहे. षष्टाचा सब गुरू असेल किंवा सब गुरूच्या नक्षत्रात असेल तर कन्सर असतो.
पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली.
 षष्टाचा सब शुक्र
शुक्र..३ १ श यु. ३
केतू..५ श ३
मंगळ..१ ८
राहू..११ चं ६ न. बु २ १०
षष्टाचा सब गुरू नाही व गुरूच्या नक्षत्रात नाही. त्यामुळे कन्सर नाही हे नक्की.
फक्त मंगळाचा व अष्टम.भावाचा संबंध आहे याचाम्हअर्थ गाठआहे  त्यासाठी ऑपरेशन करावे लागेल. असे सांगितले.
२७ डिसेंबरला  ऑपरेशन झाले. लहान गाठ होती ती काढून टाकली. थोडा तुकडा काढून तपासणी साठी मुंबई ला पाठवीला. त्याचे रिपोर्ट ३ जानेवारी २०१८ रिपोर्ट  मिळाले. रिपोर्ट निल आला . काहिही निष्पन झाले नाही.
 सर्वांना च हायसे वाटले .
पूर्ण बरे होण्यासाठी म.द. अं.द. पाहिल्या . राहू चंद्राची दशा चालू होती.
राहू १० ११ २ ६
चंद्र ११ ६
पुर्ण बरा होण्यासाठी  दशा ५ ११ दोन्ही भावाच्या कार्येश असल्या पाहिजेत. राहू चंद्र ११ भावाचा कार्येश आहे . विदशा ५ भावाची कार्येश असली पाहिजे. प्रश्र्न वेळी शनी विदशा चालू होती .शनी विदशा सोडून दिली 
 शनी ९ १० १२ २ ३ ५
बुध १० १ २ ४ ६ ७
केतू १२ १ ३ ४ ५ ६ ७
शुक्र ९ ११ १ ३ ५ ६ ८
५ ११ चे कार्येशत्व फक्त शुक्र दाखवीतो. म्हणून २०/४/१८ ते २०/७/१८ मधे पुर्ण बरा होईल. आता मुलगा घरातल्या घरात हालचाल करीत आहे.  सध्या पाय दुखत नाही. परंतू २-३ महिने काळजी घ्या असे सुचविले. 
शुभम् भवतू

गाठ कोठे असेल?
यासंबंधी काही विचार करता येईल का ?
षष्टाचा सब शुक्र येतो शुक्र शनी युतीत आहे. शुक्र धनू राशीत धनू राशीवरून मांडी चा विचार करतात, शुक्र शनी युतित आहे शनी वरून पायाचा विचार करतात. शुक्र केतू नक्षत्रात आहे केतू मकर राशीत आहे . मकर राशीवरून गुडघ्याचा अर्थबोध होतो.
धनू रास ..मांडी
शनी...पाय
मकर..गुडघा ( केतू मकर मधे )
पायाचा विचार ...गुडघ्या पासून घोट्या पर्यंत. 
एक राशी ३० अंशाची असते. मुलाचा पाय साधारण१ ते सव्वा फूट असेल.म्हणजे १५ इंच. आपण त्याचे तीन भाग करू. १) १ ते ५ २) ५ ते १० ३) १० ते १५ इंच.आता राशीचे तीन भाग करू. एक ते पांच पर्यंत राशीचे ० ते १०अंश, पांच ते दहा पर्यंत राशीचे १० ते २० अंश होतील. , दहा ते पंधरा राशीचे २० ते ३० अंश होतील.ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फल देतात. शुक्र केतू नक्षत्रात आहे. 
आता केतू २३ अंशावर आहे राहू केतू नेहमीच वक्र गतीने भ्रमण करतात. रवी ते शनी ग्रहांच्या  बाबतीत गुडघ्यापासून घोट्यापर्यंत अंश वाढत जातील , परंतू राहू केतू च्या बाबतीत अंश कमी होत जातील . म्हणजे गुडघ्या पासून सुरुवात केली तर ३०,२९,२८ २७ ,२६ .... आता केतू २३ अंशावर आहे राहू केतू  बाबतीत पाहिला भाग ३० ते २० अंशपर्यंत राहील  आपण जे तीन भाग केलेत त्यातील पहिल्या भागाच्या शेवटी म्हणजे गुडघ्याच्या खाली कोठे तरी गाठ असली पाहिजे.
ऑपरेशनच्या वेळी लक्षात आले गुडघ्याच्याखाली ४ बोटे अंतरावर गाठ होती . ह्याची खात्री करण्यासाठी मी प्रत्यक्ष मुलाला भेटून आलो. त्यावेळी कळले गुडघ्याच्या खाली ४ बोटे अंतरावर गाठ होती.ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केla तर आपणाला त्यातील रहस्य शोधता येईल.
शुभम भवतु 

Thursday, 4 January 2018

 प्रश्र्न... शेतजमीन केंव्हा विकली जाईल ?  केपी नं. १५१
२६/१२/१७ वेळ ..१४-०५-२४  फलटण
नियम... १० चा सब १०, ५,६ चा कार्येश असेल तर जमीन विकली जाईल.
या पत्रिकेत १० चा सब ( जमीन घेणार्याचे ४ स्थान , घेणारी व्यक्ती  सप्तम स्थानावरुन पाहिली जाते. सप्तम स्थानापासून ४ स्थान म्हणजे १० स्थान येते . )
शनी आहे ।
शनी..२ क यू
केतू..३, श २ न. चं ४ ५ क यू
राहू..
बुध.. १ ८ ११

शनी ५ चा कार्येश आहे.
जमिन विकली जाईल.
शनी धनू या अग्नी तत्वाच्या राशीत रवी यूतीत ( ४ अंश ) म्हणजे जमीन जिराईत असावी.
आता दशा पाहू...
सधा शनीची म.द.दशा चालू आहे शनीमधे रवीची अं.द चालू आहे .शनी ५ चा कार्येश आहे हे आताच आपण पाहिले आहे. प्रश्र्न कुंडलीचे लग्न व्रुश्र्चिक आहे ( स्थिर तत्व ) म्हणून रवी अं.द. दशा सोडून दिली व त्यापुढील चंद्र अं.द. घेतली.

चंद्र..५ क यू
शनी..२ क यू शु यु २ ७
रवी..२ १०
केतू..३ श २ न. चं ५ क यू

चंद्र ५  १० या भावांचा कार्येश आहे.
 १० ५ ६ ची साखळी पुर्ण होण्यासाठी ६ भावाची गरज आहे. ६ भाव फक्त मंगळ दाखवितो.
मंगळाची विदशा विचारात घ्यावी लागेल.
मंगळ..१२ ६
राहू..९ चं ४
शुक्र.. २ ७ २ क यू श यू २
केतू..३ श २ न. चं ५ क यू

शनी ५ ६ या भावाचा कार्येश आहे.  हा कालावधी येतो
१/१/१९ ते ४/२/१९
 शनी चंद्र मंगळ दशेमधे शेत जमीन विकली जाईल.
येथून पुढे गोचर पाहणे आवश्यक आहे. शनी हा मंद गती ग्रह व चंद्र मंगळ शिघ्र गतीचे ग्रह आहेत . शनीचे सब मधील भ्रमण व चंद्र मंगळाचे नक्षत्रातील भ्रमण पहावे लागेल .
 प्रथम शनी...
शनी १ जानेवारी। ते ७ जाने. मंगळ सब मधे
८ जाने. ते २४ जाने. राहू सब
२५ जाने ते ९ फेब्र. गुरू सब मधे
१) १ जाने. ते ७ जाने. १९ मधे शनी मंगळ सब मधे मंगळ पहिल्या २ पायरीला ६ चा कार्येश अनुकूल आहे
२) १ जाने. ते ७ जाने १९ मधे मंगळ शनी नक्षत्रात मधे आहे. शनी पहिल्या २ पायरीला ५ कार्येश अनुकूल आहे .
३) चंद्र अतिशिघ्र गतीचा असल्यामुळे मि रवीचे नक्षत्रातील भ्रमण पाहिले.
रवी १ जाने. ते ७ जाने.मधे शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र पहिल्या २ पायरीला ५ चा कार्येश अनुकूल आहे.
 १ जाने. ते ७ जाने. २०१९ मधे शेत जमिन विकली जाईल.

Thursday, 31 August 2017

 विवाह केंव्हा ? 
पुरूष दिनांक   १७/१/९० ८-१३ सकाळी     स्थळ -फलटण

एल  एस  आर  डी
शनी केतू गुरू गुरू Ls राहू
३१/८/१७  ६-३०-३१ फलटण
७ चा सब मुळ कुंडलीमधे शुक्र आहे
रूलिंग मधे शुक्र नाही. म्हणून केतू घेतला . सब केतू घेऊन वेळ येते . सकाळी ८-१०-५७
 ७ चा सब केतू ....
केतू..७ चं ८
बुध..११ ६
मंगळ..११ क यू द्रुष्टी ५ भावारंभी
बुध.. ११ ६

सब केतू ५ , ७ ,८ , ११ चा कार्येश.  केतू विवाहाला अनुकूल आहे
 आता दशा पाहू....
राहू शुक्र ६-११-१५ ते ६/११/१८
 राहू..
मंगळ..११ ३ ४
मंगळ..११ क यू द्रुष्टी ५
बुध.. ११ ६

राहू ३ ५ ११ चा कार्येश
शुक्र..
रवि..१२ शु यु १२ ९ १०
बुध..
शुक्र..१२ ९  १० र युती

शुक्र १०  १२ या विरोधी भावांचा कार्येश.म्हणून त्यापुढील रवी अंतर्दशा

रवी..१२ शु युती १२ ९ १०
रवी..१२ शु युती १२ ९ १०
शनी.. १२,कयू  २
शुक्र..१२ ९ १० र यूती १२

रवी २,  ९ चा कार्येश आहे
 चंद्र विदशा
चंद्र..८
चंद्र.।८
राहू..
मंगळ.. ११ ३ ४ ११ क यू द्रुष्टी ५
चंद्र  ३  ५ ८ ११ चा कार्येश

राहू रवी चंद्र  या दशेमध्ये विवाह होईल . हा कालावधी येतो २२-११-१८ ते २०/१२/१८
 राहू.३, ५ , ११
रवी.२ , ९
चंद्र. ३, ५, ८ ,११

कधी कधी ७ भाव न लागता ५  ८ भाव कार्येश असतानासुद्धा  विवाह होतो.
 एक गोष्ट नमूद करावी वाटते७ चा सब केतू बुधाच्या नक्षत्रात आहे व बुध हर्षल नेपच्यून च्या युतीत आहे त्यामुळे विवाह ठरणे , मोडणे असे होऊ शकते. तसेच नेपच्यून मुळे फसवणूक होऊ शकते
 ७ चा सब केतू कर्क या चर राशीत नक्षत्रस्वमी बुध धनु या व्दिस्वभाव राशीत आहे .व
 केतू ६ ,,८ चा कार्येश  म्हणून व्दिभार्या योग

Saturday, 26 August 2017

ब्युटी पार्लर व्यवसायातून लाभ होईल का?

स्त्री: १९-८-२०१७
 १८-०९
राजगुरूनगर(पुणे)
अ-१८ :५४  रे-७३ :५६
के.पी  नं  2

नियम: दशमाचा सब २,६,१०,११  व ७ चा कार्येश असून मंगळाशी संबंधित असेल तर व्यवसायात लाभ होतो.
 १० चा सब ५ चा हि कार्येश असावा . ५ कला, सौंदर्य
१० चा सब चा शुक्राशी संबंध असावा
(न.स्वामी, द्रुष्टी , युती ,)

बुध शुक्र    सौंदर्य ,
शुक्र शनी केसांचे सौंदर्य
सप्तम भावावरून गिर्हाईक चा बोध होतो . सप्तम भावाचा सब बुध आहे

 बुध शुक्र...लहान कुमारवयीन मुली
 मंगळ शुक्र ...तरूण स्त्रिया
रवी शुक्र ..उच्चभ्रु  स्त्रिया,
शनी शुक्र ..वयस्कर स्त्रिया
ग्राहक असू शकतील
१० चा सब बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे .
बुधाचे कार्येशत्व...

बुध..
शुक्र..४ , २, ३, ७, दृष्टी १०
रवी..५  रा यु. ५ के द्रुष्ट ११
केतू..११ श ८ १२ र द्रु ५श द्रु ८ १२
           न. मंगळ ५ ,१ ,९
१० चा.सब बुध २, ३, ४, ५, ७ ,८, ९ ,१०, ११ ,१२ चा कार्येश आहे
५ कला, ७ व्यवसाय १० व्यवसाय ११ लाभ .  शुक्र मिथुन २८-५-१६ आहे व ४ भावारंभ मिथुन २४-७-५२ आहे म्हणून शुक्र ४ भावारंभी आहे (फरक ३-५७-२४ ) त्याची दृष्टी १० भावारंभी आहे
शिवाय मंगळ ग्रहाचा संबंध आहे
सदर ची व्यक्ती व्यवसाय करेल.


सध्याच्या दशा पाहू....
गुरू मधे राहू २८/३/१८ पर्यंत.
गुरू राहू २८/३/२०१८ पर्यंत आहे. गुरु नंतर शनी दशा सुरु होईल

 गुरू .. .                                          राहू .. ५ र ५                                     शनी .. ८,१२,९ क  यु
मंगळ ..५,१,९                                केतू .. ११ श ८,१२ र दृ ५                     बुध .. ५
राहू .. ५ र ५                                  केतू ..                                                गुरु ..
केतू .. ११ श ८,१२ र दृ ५                 मंगळ .. ५,१,९                                    मंगळ .. ५,१,९


वरील गुरु राहू व शनी दशा पाहता सर्वच १,५,८,९,११,१२ च्या कार्येश आहेत यामध्ये २,६,१० भाव कोठेच नाहीत .
५  ८। १२ हे भाव व्यवसाय करण्यास अनुकूल नाहीत ८ भाव अडथळे १२ भाव अनावश्यक खर्च / गुंतवणूक दाखवतात
 पार्लर च्या व्यवसायात लाभाचे प्रमाण अल्प राहील .
 ६ भाव असणे आवश्यक आहे.  कारण ७ भाव हे गिर्हाईक आहे त्याच्या पैशाचा व्यय म्हणजे  ६ भाव होतो
  फक्त १०  ११ लागणे म्हणजे आपल्या इच्छैखातर व्यवसाय चालू ठेवणे असे होईल
तसेच दशम भावारंभी प्लूटो ग्रह आहे . दशम भावारंभ धनु २४-७-५२ आहे व प्लूटो धनु २३-१३-३६ आहे म्हणजे फक्त ५४ कला १६ विकला चे अंतर आहे प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे यामुळे सुद्धा पार्लरचा व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल .

किंवा ५। ८। १२ हे भाव समोरच्या व्यक्ती चे २। ६। ११ भाव होतात. दर महिन्याला ठराविक रक्कम घेऊन दुसर्याला चालवायला देणे हे फक्त होऊ शकेल.
 परंतू भागिदारी त करू नये. 

Friday, 25 August 2017

माझ्या मुलाचा विवाह  केंव्हा होईल ?.... 

औरंगाबाद येथील एका पालकांनी गेल्या महिन्यात माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलाचा विवाह केंव्हा होईल अशा प्रश्न विचारला .
मुलाची जन्मतारीख  .. २/९/९०
जन्मवेळ ........ संध्याकाळी ५-१५
जन्मस्थळ  ...... नासिक

वरील तारीख व वेळेनुसार मी केपी पद्धतीने कुंडली तयार केली
मी ज्या दिवशी कुंडली पहिली त्या दिवसाचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे
तारीख २५/८/२०१७ वेळ ८-४६-२२ सकाळी फलटण
लग्न .. बुध     नक्षत्र -चंद्र     राशी -बुध    वार -शुक्रवार  लग्न नक्षत्र --चंद्र

कुंडलीनुसार सप्तमा चा सब केतू आहे . रुलिंग प्लॅनेट मध्ये केतू नाही . पुढील शुक्र व मागील बुध  रुलिंग प्लॅनेटमध्ये  आहे यापैकी कोणता निवडावा .....
बुध  लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून मी बुधा ची निवड केली
सप्तमाचा सब बुध  निश्चित केला . सप्तमाचा सब बुध  घेतल्यामुळे जातकाची जन्मवेळ येते १७-१०-१३
बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
कृष्णमूर्ती नियम = सप्तमाचा सब २,७,११ याभावांचा कार्येश असेल तर २,७,११,या भावांच्या सयुंक्त दशे विवाह होतो. कधी कधी ७ भाव न लागता ५,८  हे भाव लागतात
बुध .. ८ कस्प युती
रवी .. ७
रवी ..
शुक्र .. ७ , ५  , ९

बुद्ध ५ ,७  , ८ ,९ या भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह होणार हे निश्चित .
आता केंव्हा होईल यासाठी दशा अंतर्दशा पाहू
कुंडली प्रथम पहिली त्यावेळी राहू महादशा शुक्र अंतर्दशा चालू होती .

राहूचे कार्येशत्व
राहू .. १२ शनी १२ ,१ ,२ चंद्र युती १२ गुरु द्रु ६ , ३
चंद्र .. १२ ,१ राहू युती १२ केतू द्रु  ६
मंगळ .. ४ , ११
रवी .. ७

राहू २, ३ ,७ ,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे आता अंतर्दशा शुक्र पाहू
शुक्र ..
केतू,, ६ चंद्र १२ गुरु युती ६ चं द्रु १२
केतू..
शनी .. १२, १ ,२ ..

शुक्र १ , ६,१२ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून हि अंतर्दशा सोडून दिली
त्यापुढील अंतर्दशा रवीची आहे रवीचे कार्येशत्व

रवी ..
शुक्र .. ७,५,१०
रवी..
शुक्र .. ७,५,१०

रवी ५,७ या भावांचा कार्येश आहे

लग्नकुंडली मकर या चर तत्वांची आहे म्हणून रवीची विदशा घेतली

राहू रवी रवी या दशेमध्ये विवाह होईल .
विवाहाचा कालावधी येतो १६/१/१९ ते १/२/१९
सादर पालकांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुलाचा विवाह होईल असे सांगितले .





Tuesday, 28 June 2016



              नोकरीमधे  बदल आहे का ?

                                                    भिजीत एका मल्टीनेशनल कंपनी मधे नोकरीला होता. यापूर्वी त्याने २  ३ नोकरया सोडलया होत्या. आता ज्या कंपनी मधे नोकरी करतो त्या ठिकाणी त्याला वरीष्ट खुप त्रास देत होते त्यामुळे तो वैतागलेला होता म्हणून त्याने मला प्रश्न विचारला की आताच्या  नोकरीमधे काही  बदल आहे का? ही नोकरी सोडुन दूसरी नोकरी मिळेल का? मि म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग. त्याने ७५ ही संख्या सांगितली

     हा प्रश्न मि २८।९।२०१३ रोजी १८़३०़०७ वाजता    अ १७  ५९  व    रे ७४  २६ येथे सोडविला
ही कुंडली कर्क लग्नाची आहे
नियम... दशमाचा सब ३  ५  ९  । २  ६  १०  ११ या भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा अंतर दशेमधे दूसरी नोकरी मिळेल
३  ५  ९  नोकरी सोडन्यासाठी व २  ६  १०  ११ दूसरी नोकरी मिलण्यासाठी
दशमाचा सब रवि आहे
रवि...२  ३  क यु
चंद्र...१२
मंगळ...
बुध  ...३
रवि २  ३  १२ या भावांचा कार्येश आहे
या मधे ३ बदल सुचवितो व २ दूसरी नोकरी मिळणार है सूचित करतो
नोकरी मधे बदल केंव्हा  होईलयासाठी दशा अंतर दशा पाहिल्या
प्रश्न वेळी गुरु मधे शुक्र ची अन्तर्दशा चालू होती
*गुरु..१२  ६      
गुरु..१२  ६        
बुध...                                                 
मंगळ...१  ५  १० 
*शुक्र...
गुरु..१२  ६
केतु...९  १०  कयु मं १  ५  १०
शुक्र...४  ११
गुरु  १ ५ ६ १० १२ चा व शुक्र १ ४ ५ ९ १०   या भावांचा कार्येश आहे
५  ९  १२ हे  भाव बदल सुचवितात व ६  १०  ११ हे दूसरी नोकरी मिळणार हे सुचवितात
३  ५  ९  व २  ६  १०  ११ ही साखळी जूळण्यासाठी विदशा अशी शोधावी लागेल  की जी ३  २ या भावांचि कार्येश असेल
पुढील विदशा रविची  आहे रविचे कार्येश
रवि...२  ३  क यु
चंद्र...१२
मंगल...
बुध...३


रवि विदशा २  ३  भावाची कार्येश आहेनोकरी मिळण्यासाठी २ ६ १० ११  व सोडन्यासाठी ३  ५  ९  ही साखळी पूर्ण होतेगुरु महादशेत शुक्र अंतर दशेत व रवि विदशेत घटना घडनार  आहे प्रश्न कुंडली चार तत्वाचि आहे हयाचा अर्थ घटना लवकर घडणार आहे है सूचित होतेगुरु शुक्र रवि दशेत म्हणजे ११।२।१४ ते ३१।३।१४ या कालावधीत नोकरी मधे बदल होणार असे सांगितलेगोचर भ्रमन....वरील कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल असेल तरच घटना घडेलगुरु शुक्र रवि यामधे गुरु मंद गतिचा ग्रह आहे म्हणून त्याचे सब मधील भ्रमण पहावे लागेल१) गुरु या कालावधीत वक्री आहे पण गुरु ११ फेब्रुवारीला २०१४ ला शुकराचया सब मधे आहे शुक्र वक्री नाही ६ मार्चला मार्गी झाला तो ३१ मार्च २०१४ शुकराचया सब मधे आहे शुक्र पहिल्या २ पायरीला अनुकूल आहे२) शुक्र हा शीघ्र गतिचा ग्रह आहे त्याचे नक्षत्र स्वामीचे भ्रमण पहावे लागेल ११ फेब्रुवारीला२०१४ ला शुक्र शुक्राच्या च नक्षत्रात आहे.  २२ फेब्रुवारीला रविचया नक्षत्रात आहे ११ मार्च २०१४ ला चंदराचयान नक्षत्रात व २५ मअर्च ला मंगलाचया नक्षत्रात  शुक्र रवि चंद्र मंगल हे सर्व पहिल्या २ पायरीला अनुकूल  आहे३ ) रविचे नक्षत्र भ्रमण लहावे लागेल रवि  ११ फेब ला मंगलाचया नक्षत्रात २० फेब्रुवारी ला राहुच्या नक्षत्रात ५ मार्च ला गुरुच्या नक्षत्रात व १८ मार्च ला शनिचया नक्षत्रात आहे मंगळ राहू गुरु शनि है सर्व पहिल्या दोन पायरीला अनुकूल  आहेतवरील कालावधीत म्हणजे ११ फेब्रुवारी २०१४ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल होते  म्हणून बदल याच कालावधीत झालासदर व्यक्तिने २७ फेबृवारीला नोकरी लागली असे सांगितले

Friday, 24 June 2016

निवडणूक ..... एक अनुभव

                                मागील विधानसभा निवडणुकीच्या काळातील घटना आहे. केन्द्रामधे भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रामधे  ऑक्टोंबर नोव्हेंबर २०१४ मधे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामधे आजि  माजि आमदार आपले नशिब आजमावित होते. प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावित होते.कही पक्षामधे नवीन चेहरयाना संधि देन्याचा प्रयत्न दिसत होता. अशीच एक ओलखीचि व्यक्ति माझ्याकडे आली व महनलिमि सुद्धा या शर्यतीमधे आहे कारण त्याच्या नावाची चर्चा चालली होती हे माझ्या कानावर आले होते त्य व्यक्तिने .... या पाक्षातरफे मला टिकिट मिळेल का? असा प्रश्न मला विचारला. मि म्हटले पक्षा तर्फे टिकिट मिळेल का असा विचार करुण कुलदैवतेचे स्मरण करून  १ ते २४९ या मधिल एक संख्या सांगा. त्याने थोड़ावेल विचार करून मला १४९ ही संख्या सांगितली हा प्रश्न मि १८ सप्टेम्बर २०१४ रोजी रात्री ८़७़२१ वाजता फलटण येथे सोडविला व ..... या पक्षा तर्फे आपणास टिकिट मिळणार नाहि असे स्पष्ट सांगितले.  ते कसे सांगितले त्याचे विवेचन खालीलप्रमाणे.....

पक्षातरफे टिकिट म्हणजे निवडणूक लधविन्यासठि त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र असते पत्राचा विचार तृतीय स्थानापासुन करतात. पत्र केनवहा येईल? बातमी पेपरमधे केनवहा छापुन येईल? इच्छित फोन केनवहा येईल? बातमी खरी की खोटी?  जाहिरात् पेपर मधे केनवहा छापुन येईल?
हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंवहा होईल या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरुन करतात
कृश्रनमुर्तिचा नियम ..... तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातरफे टिकिट मिळेल

निवडणूक लढ़विन्याचि इच्छापूर्ति होईल का?

नियम.... लाभाचा सब लगनभावाचा कार्येश होत असेल तर इच्छा पूर्ण होईल
या दोन नियमांचा वापर या उदाहरणामधे केला आहे.
मनातील विचार जुलतो का ते पाहु
चंद्र मनाचा कारक , चंद्र अष्टमात मिथुन राशित नवम स्थानारंभी आहे. चंद्राची दृष्टि तृतीय स्थानारंभी आहे म्हणजे प्रश्न बरोबर आहे.

चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे म्हणजे प्रश्न बरोबर आहे

य कुंडली मधे तृतियाचा सब शनि  आहे
शनिचे कार्येशत्व......
शनि...
गुरु...९,२
बुध....
मंगळ...१,६
तृतियाचा सब शनि लाभाचा कार्येशहॉट नाही म्हणजेच पक्षातरफे टिकिट मिळणार नाही हे सांगता येते
पक्षातरफे निवडणूक लढविणयाचि इच्छापूर्ति होते का ते पाहु
लाभाचा सब केतु  आहे
केतु... ५ गुरु ९,२,११
बुध...११ राहु यु ११ केतु दृ ५
गुरु...
बुध...११ राहु यु ११  केतु दृ  ५
लाभाचा सब लग्न भावाचा कार्येश होत नाहि तृतियाचा सब  लाभाचा कार्येश हॉट नाही व लाभाचा सब  लगनाचा कार्येश होत नाहि म्हणजे पक्षातरफे टिकिट मिळणार  नाही हे संगता येते
 सदर व्यक्तीला टिकिट मिळाले नाहि

उदाहरण दूसरे........
 जून २०१५ मधे सातारा जिल्हा प्रार्थमिक शिक्षक बैंकेची निवडणूक झाली त्यावेळी
श्री अनिल मला म्हणाले मागील पंच वार्षिक निवडणुकीत मी उभा राहिलो होतो  पण त्यावेळी मि पराभूत झालो होतो परंतु यावेळी मला उभे राहण्याची खुप इच्छा आहे  तर XXX  या पक्षा तर्फे मला निवडणुकीचे टिकिट मिळेल का?
कारण मिळण्यासाठी सुधा स्पर्धा आहेच
टिकिट मिळाले तर निवडणुकीत यश मिळेल का?  मि म्हणालो हा प्रश्न मनात धरून , कुलदेवतेचे स्मरण करुन  १ ते २४९  या पैकि एक संख्या सांगा त्यानी थोड़ावेल मन  एकाग्र करुन १४७ ही संख्या सांगितली

ह प्रश्न मि १६ मे २०१५ रोजी ११़२२़३८ वाजता फलटण ( अ १७  ५९  रे ७४  २६ )

येथे सोडविला त्याच दिवशी तुला पक्षातर्फ टिकिट मिळणार व तु निवडून येणार असे सांगितले
त्याचे विवेचन खालीलप्रमाणे....
ही कुंडली वृष्चिक लग्नाची आहे
पक्षातरफे टिकिट मिळेल का?  .....
तृतीया चा सब राहू आहे

राहु....

चंद्र...6 क यु 6
राहु...
चंद्र...6 क यु 6

राहु शष्ट भावाचा बलवान कार्येश  आहे पण लाभाचा कार्येश होत नाही


लाभाचा सब लग्नाचा कार्येश होतो का ते पाहु

लाभाचा सब शनि आहे
शनि...1,3,4 मं दृ 7  2
शनि...1,3,4 मं दृ 7  2
शुक्र...6  12
राहु...11 बुध 7 न चं 6

लाभाचा सब लगनाचा कार्येश आहे

म्हणजे निवडणूक लढ़विन्याचि इछा पूर्ण होत आहे

शष्ट भाव हा प्रतिस्पर्धयावर मात करण्याचे स्थान आहे.

आतापर्यंत आपण शष्ट भाव स्पर्धा परीक्षा, कोर्ट केस व क्रिकेट मैच साठी वापर करीत आलो आहोत निवडणुकित
पक्षा तरफे टिकिट मिळविणे ही सुधा एक स्पर्धाच आहे
म्हणून       १)   तृतीयांचा सब शष्टाचा कार्येश असेल          त्याच बरोबर
                  २)   लाभाचा सब लग्नाचा कार्येश असेल                तर टिकिट मिळेल असेच या उदाहरनातुन दिसून येते श्री अनिलला पक्षातरफे निवडणूक लढ़विन्यासठी टिकिट मिळाले 
पक्षातरफे टिकिट मिळविन्यासाठी स्पर्धा/ चढ़ाओढ असेल तर मला वाटते शष्ट भावाचा विचार व्हावयास हवा

दोन कुंडली मधिल साम्य.....


1) दोन्ही कुंडल्या वृश्चिक लगनाच्या आहेत

2) दोन्ही मधे तृतियाचा सब शष्टाचा कार्येश आहे
3) दोन्ही मधे तृतियाचा सब लाभाचा कार्येश नाही

दोन्ही कुंडली मधिल फरक


1) श्री सुनिलच्या पत्रीकेत लाभाचा सब लगनाचा कार्येश होत नाही म्हणून श्री सुनिलला टिकिट मिळाले नाही

2) श्री अनिलच्या पत्रीकेत लाभाचा सब लगनाचा कार्येश हॉट आहे म्हणून श्री अनिलला टिकिट मिळाले आहे

निवडणुकीत यश मिळेल का?


नियम......शष्टाचा सब 2  6  10  11 यापैकी भावाचा कार्येश असेल तर 2  6  10  11 या भावानचया कार्येश ग्रहांचया दशेत यश मिळते


निवडणूक साठी अनुकूल भाव 1  2  3  6  10  11

                      प्रतिकूल भाव  7  8  9  12  4  5

प्रश्न करत्यासाठी...शष्ट भाव  आवश्यक

प्रतिस्परध्यासाठी...द्वादश भाव आवश्यक

शष्ट भावाचा सब चंद्र आहे

चंद्र... 6 कयु
केतु...5गु 9 न श 1  3  4  मं दृ 7  2
मंगळ..7  2 श दृ 1  3  4
रवि...7  10

शष्टाचा सब चंद्र  1  2  3  6  10  अनुकूल आहे व 4  5  7 9

 भाव प्रतिकूल आहे संख्यात्मक 5 भाव अनुकूल आहेत म्हणून प्रश्न कर्ता विजयी होईल असे सांगता येते
लभाचा सब शनि आहे शनि चे कार्येशत्व....
शनि...1  3  4
शनि...1  3  4
शुक्र...8  12
राहू...11 बु 7 न चं 6

निवडणूक निकालाच्या वेळी दशा खालील प्रमाणे

केतु  मंगल  चंद्र दशा होती
केतू...
शनि...1  3  4  मं दृ 7  2
राहू...
चंद्र...6  कयु
अनकूल  1  2  3  6
प्रतिकूल  4  7

मंगळ...7  2  श दृ 1  3  4

रवि... 7  10 कयु
शुक्र...6  12
राहू...11 बु 7  न च 6
अनुकूल  1  2  3  6  10  11
प्रतिकूल  4  7  8  12
चंद्र...6 कयु
केतू... 5 गु 9
मंगल..7  12  श दृ 1  3  4
रवि...7  10
अनुकूल  1  3  6  10
प्रतिकूल  5  7  9  12

महादशा अन्तर्दशा श्री अनिल व प्रतिस्पर्धी याना अनुकूल असून सुधा केवळ शष्टाचा सब 4 पायरीवर 10 भावाचा बलवान कार्येश आहे  आणि लाभाचा सब  शनि 4 थ्या यशाच्या पायरीवर 11  6  भावांचा बलवान कार्येश आहे म्हणून श्री अनिल निवडून  आले. श्री अनिलला 667 पैकी 428 मते मिळाली व प्रतिस्परध्याला 197 मते मिळाली आतापर्यनतचा इतिहास श्री अनिल विक्रमी मतानी निवडून  आले. पुढ़ारी वृत्तपत्राने त्यांची विशेष नोंद घेऊन त्यांच्या साठी एक स्वतंत्र परिछेद छापला आहे.







         वडीलोपार्जीत मालमत्तेत हिस्सा मिळेल का?

वडिलोपार्जीत मालमत्ता ही अष्टम स्थानावरुन पाहिली जाते अष्टम भावाचा सब 4  8  11 या भावांचा कार्येश असेल तर 4 8  11 या कार्येश ग्रहांचया दशेत जमीनी मधे हिस्सा मिळतो अथवा घर मधे
काहीवेला 4 लागत नाही पण 2  दागिने  6  11 पैशाचया रुपात हिस्सा मिळतो

केपि नंबर 141  24 जून 16 वेल 18=47=35 फलटण


अष्टमचा सब रवि आहे


रविचे कार्येश त्व....


रवि...8 , 11

राहु...10 र 8  11  गु यु 10  3  6
गुरु...
शुक्र...8

अष्टमाचा सब रवि राहुचया नक्षत्रात आहे मालमत्ता शापित असावि(राहु)


                यामधे 4 भाव  लागत  नाही घर अथवा जमीन मिळणार नाही


               परंतु 6  8  11 भावामुले पैशाचया रुपात नक्की मिळेल

 मंगळ दशा चालू आहे

मंगल

गुरु....10  3  6 रहु यु 10 केतु दृ 4
रवि....8  11
राहु...10 र  8  11 गु यु 10  3  6

मंगल  शुक्र  रवि

17 औक्तोंबर 18 ते 7 नोवहे 18
या कालावधीत मिळेल

शुक्र

राहु...10  र 8  11  गु यु  10  3  6
बुध...8
मंगल....1  2  7

रवि...8  11

राहु....10 र 8  11 गु यु 10  3  6
गुरु...
शुक्र... 8
            संबंधित व्यक्तिची घर जमीन मिळून मालमत्ता 1.5 ते  2 कोटींची आहे
त्यात वाटेकरी  7 जण आहेत
प्रत्येकी कमित कमी 20-- 25 लाख मिलतील

Tuesday, 21 June 2016

           ---------- संतती केंव्हा होईल ?
                        प्रत्येक स्त्री चे एक स्वप्न असते आपला संसार सुखी असावा आपल्या भावना जपणारा जिवापाड प्रेम करणारा एक सखा असावा.  पण प्रतयेकाची स्वप्ने पूर्ण झाली असती तर दु:ख औषधाला देखील राहिले नसते. 
         पण असा सखा मिळाला तरी संसार सुखाचा होईल याचि शाश्वती देता येत नाही. 
जोपर्यंत आपल्या मुलीला एखादी संतति होत नाही तोपर्यंत आई वडीलांचि काळजी संपत नाही
                अशाच एका स्त्री चे विवाह होउन तीन वर्षे झाली होती. अद्धयाप संतति झाली नाही पण तीन गर्भपात झाले. प्रत्येक स्त्रिला वाटत असते आपल्या संसार वेलिवर एखादे फूल उमलावे. पण वेलीवर फूल उमलायचे आधीच ते गलून पडत होते.अशावेळी घरातील वयस्कर स्त्रीयामधे शंका निर्माण होते तदनंतर वैधकिय चाचण्या  सुरु होतात त्यातून संतति झालीच नाहीतर स्त्री हतबल होते, आणी सुखी संसाराची स्वप्ने हळू हळू विरळ  होउ लागतात.
शेवटचा पर्याय म्हणून ज्योतिषाकडे पाउले  वळायला  लागतात 
                               प्रश्न विचारला जातो     माझ्या नशिबात संतति सौख्य आहे का?
          अशाच एका अभागी स्त्रीने मला प्रश्न विचारला मला संतति केंवहा होईल्? मि तिचे जन्मटिपण घेतले तीची जन्म तारीख ३।४।८८ वेळ १८़१० मुम्बई
 हा प्रश्न मि  १४।६।१६ रोजी संध्याकाळी ५़=३३़=०४ वाजता  येथे ( अ १७  ५९  रे ७४  २६)सोडविला
 कृष्णमूर्ति नियम.... पंचमाचा सब २  ५  ११ या भावानचा बलवान कार्येश असेल तर २  ५  ११ भावानचया कार्येश ग्रहाचया दशेमधे संतति होते
 या पत्रीकेत पंचमाचा सब मंगळ आहे
त्यावेलेचे          एल एस आर डी
एल -मंगळ  एस -मंगळ आर -बुध  डी -मंगळ  एल एस शनि  
पंचमाचा सब मंगळ  एल एस आर डी मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे
मंगळा चे कार्येशतत्व 
मंगळ.....
रवि....७
शनी...४
केतु...१२ र  ७ न र ७

या कुंडली मधे पंचमाचा सब

मंगळ 3 व 4 पायरिला 4,7,12 य भावानचा कार्येश आहे संततिला पूर्ण विरोधी भाव  आहे

    

    हाच प्रश्न मि के पि नंबर प्रमाणे सोडविन्याचा प्रयत्न केला
तिच्या कडून 1 ते 249 या पैकि एक नंबर विचारुन घेतला
तिने 79 नंबर दिला
याप्रमाणे ह प्रश्न मि 16/6/16 रोजी सकाळी 7=17=39 वाजता फलटण येथे सोडवला----- खालिलप्रमाने
या पत्रीकेत पंचमाचा सब चंद्र  आहे
चंद्र....
राहु....2 कयु र 11 गुरु युति 2  6  9
शनि...4  7
बुध....10  12

के पि नंबर कुंडली मधे सुधा पंचमाचा सब चंद्र 3 व 4 पायरीला 4  7  10  12  या भावानचा कार्येश आहे   हे  भाव संततिला पूर्ण विरोधी   आहेत


पंचमाचा सब संबंधित घटनेला नकार देत असेल तर दशा अनतरदशा पाहण्याची आवशक्याता भसत नाही



या पत्रीकेत संतति कारक गुरु आणि प्लूटो यांच्या मधे प्रतियोग आहे (6 अंश)
                प्लूटो हा ग्रह स्फोटक विध्वंस करणारा आहे.  हया ग्रहा  बरोबर जो ग्रह असतो अथवा युति असते त्या ग्रहची फले कमी करतो अथवा नष्ट करतो

गर्भपात झाले त्यावेळी नेमके कशामुळे  झाले त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न  केला
1) पहिला  जून  2014
गुरु  बुध  गुरु   1/4/14  ते 21/7/14
**गुरु  8 कयु
   केतु  12  र  7  न र 7
   बुध
   शनि  3,5,4 कयु गु दृ 8
** बुध
    शनि  3,5,4कयु गु दृ  8
    शनि  4  कयु
    केतु  12  र  7  न  र  7
3  5  भाव असून सुधा 4,7,8,12  मुळे गर्भपात झाला

2) दूसरा  ऑक्टोम्बर 2015

गुरु  केतु  बुध  17/9/15  ते  5/11/15

गुरु बुधाचे कार्येशतत्व  वर  काढले  आहे


केतु

रवि  7
केतु
रवि  7
गुरु  केतु  बुध  पूर्णपणे प्रतिकूल

3) तीसरा गर्भपात  7/6/2016

गुरु  शुक्र  चंद्र  3/6/16  ते  23/8/16

**गुरु  8 कयु                                      शुक्र   ८,२,९                              चंद्र १,११

   केतु  12  र  7  न र 7                         रवी   ७                                    मंगळ   ४

   बुध                                                   बुध                                          शुक्र   ८,२,९

   शनि  3,5,4 कयु गु दृ 8                     शनी ३,५,४ कयू गु दृ ८              रवी   ७


अनुकूल     ५                                       २  , ५                                            २, ११
प्रतिकूल ४,७,८,१२                               ४,७,८                                          १,४,७,८

या दशेमधे 2,5,11 भाव असून सुधा  केवळ 1,4,7.8,12 मुळे गर्भपात झाला




Sunday, 12 June 2016

स्त्री  26 नोव्हेंबर 77 वेळ 9=50  स्थळ--अ 17  59  रे 74  26

पुनर्विवाह होईल का?
सप्तामाचा सब शनि आहे
L शनि  S  राहु   R  बुध    D चंद्र
सब शनि LSRD मधे आहे म्हणजे वेळ बरोबर आहे

कृ नियम ....सप्तामाचा सब द्विस्वभाव राशीत अथवा त्याचा नक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशोत असेल व 2 7 11 या भावाचा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो


अथवा द्वितियाचा सब 2 8 11 चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो


शनि सिंह या स्थिर राशित असून त्याचा नक्षत्रस्वमि केतु मीन या द्विस्वभाव राशित आहे म्हणून द्वितीय विवाह होउ शकतो


शनि....

केतु...3 गुरु 6 1
राहु....
चंद्र....5

1 3 5 6 हे फारसे विवाहाला अनुकूल नाहीत

म्हणून द्वितीय विवाह करु नये कारण वैवाहिक सौख्य मिळणार नाही  कारण् शनि 1 3 6 च कार्येश आहे

फक्त मैत्रीपूर्ण सबंध ठेवता येतील (5)


तिने सांगितले माझे एका व्यक्ति बरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत .

 No Sex (6)
द्वितियाचा सब राहु आहे
प्रथम पत्नीचे मृत्यु स्थान म्हणजे द्वितीय स्थान येईल म्हणून द्वितीय स्थानावरुन द्वितीय विवाह पहावा तसेच द्वितीय स्थानापासुन सप्तम स्थान महणजे 8 स्थान येते म्हणून
द्वितियाचा सब 2,8,11 चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.

राहुचे कारयेशत्व

 राहु....
चंद्र....5
बुध....
केतु....3 गुरु 6,1 न बुध 12

राहु 4 पयरिला 1  3  6  12 या भावानचा कारयेश

आहे म्हणून वैवाहिक सुख मिळणार नाही
 म्हणून द्वितीय विवाह करु नये


* पोलिस भरती होईल का?*

*दि 12/8/94 वेळ 7=10am अ 18  9  रे 74  35

L  चंद्र  S चंद्र  R  शुक्र  D  रवि

रविचया राशित राहु आहे लग्न नक्षत्र बुध आहे

आता राहु/ चंद्र दशा चालू आहे


* दशमाचा सब शुक्र आहे

शुक्र रूलिंग मधे आहे तसेच दशे मधिल राहु व चंद्र रूलिंग मधे आहेत
म्हणजे जन्म वेळ बरोबर आहे
दशमाचे सब  शुक्र चे कार्येशत्व....
शुक्र....
चंद्र....2
चंद्र....
मंगळ....10 , 4
कृ नियम ... दशमाचा सब 2  6  10  11 या भावंचा कार्येश असेल तर 2  6  10  11 या कार्येश ग्रहांचया दशेमधे नोकरी मिळते
* शुक्र 2  10 या भावांचा कार्येश आहे
याचा अर्थ पोलिस विभाग मधे नोकरी मिळणार हे नक्की झाले शिवाय पोलिस अथवा मिलिट्री मधे नोकरी साठी रवि अथवा मंगळ याचा संबंध असावा लागतो तसा या ठिकाणी शुक्राचया सब च्या  सब चा नक्षत्र स्वामी मंगल आहे सर्वच गोष्टी या ठिकाणी जुळून आल्या आहेत
आता नोकरी केंवहा मिळणार...
सध्या राहु मधे चंद्र दशा चालू आहे
त्यापुढील मंगळ अंतर दशा
राहु/ मंगळ/ शनि चा कालावधि...
24/2/17 ते 25/4/17  असा आहे

* राहु...

  गुरु... 3  5  8
  बुध.... 12  11 र यु 12  11
  बुध.....12  11  र यु 12  11

राहु  11 च कार्येश आहे


* मंगळ...10  4

  मंगळ....10  4
  शुक्र.....
  चंद्र.... 2

मंगळ  2 4 10 चा कार्येश आहे


* शनि...7  6

  राहु.... 3  शु  2
  शुक्र....
  चंद्र.... 2

* शनि  2  6 चा कार्येश आहे

राहु मंगल शनि दशे मधे 2  6  10  11 ची  साखळी पूर्ण झाली
* वरील कालावधि मधे म्हणजे
24/2/17 ते 25/4/17  मधे नोकरी मिळणार हे नक्की झाले

Saturday, 18 October 2014

इच्छित मुलाशी विवाह होईल का?

                                         वरील प्रश्न एका आईने आपल्या मुलीबद्धल विचारला आहे .मुलगी सुशिक्षित ,सुसंस्कृत घराण्यातील आहे . ती औरंगाबाद मध्ये नोकरी करीत आहे . तिचे एका मुलावर प्रेम आहे . मुलगा आमच्या जातीतला नाही . आमचा त्याला विरोध आहे . आम्ही उभयतांनी तिला खूप समजावून सांगितले . पण ती ऐकायला तयार नाही . ती म्हणते मी लग्न केले तर याच मुलाशी करेन . आम्हाला तिची खूप काळजी वाटते . कारण मुलगा शिकलेला आहे पण नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही . आता सध्या त्याला नोकरी नाही . म्हणून त्यांनी मला विचारले ह्याच मुलाशी तिचे लग्न होईल का? आणि एक के पी नंबर (९१) दिला . 

                                   के पी नंबर देताना सुधा प्रश्नाच्या अनुषंगाने दिला जातो . के पी नंबर ९१ मधील ९ आकडा मुलीचे पंचम स्थान ( प्रेम प्रणय ) दाखवितो व दोघांची बेरीज केली तर १० येते म्हणजे लाभाचे व्यय स्थान व मुलीच्या सप्तमाचे व्यय स्थान म्हणजे शष्ट स्थान . प्रश्नाचा रोख बरोबर आहे . 

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का ? या प्रश्नासाठी के पी नियम -----
सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसून , स्थिर राशीत असेल व  २,७,११ या
भावाचा कार्येश असेल तर २,७,११ या भवाच्या कार्येश ग्रहाच्या दशेमध्ये विवाह होतो .

मी कॉम्पुटर वर के पी नंबर ९१ प्रमाणे कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली .
                        दि ११ / ८ / २०१४ वेळ ७=४६=५८  स्थळ अ १७,५९ रे ७४,२६ .

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
सिंह लग्न म्हणजे स्थिर तत्वाची कुंडली आहे . चंद्र शष्ट स्थानात व्ययेश आहे ( चिंता , काळजी ) चंद्र मंगळाच्या नक्षत्रात मंगल मुलीचा पंचमेश ( प्रेम , प्रणय ) आणि व्ययेश . मंगल मुलीच्या लाभस्थानात
 ( तृतीय स्थानात ) म्हणजे  प्रश्नाचा रोख बरोबर आहे प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे .
                                           पंचम स्थान मुलीचे लग्न स्थान होईल . पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . मुलीच्या कुंडलीत सप्तमाचा ( मूळ कुंडलीचे लाभस्थान ) सब गुरु आहे  गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

गुरु ---८ कयू
शनि ---११,३
चंद्र ---२ बु दृ ८
मंगळ ---११,१२,५
                                                   साप्तमचा सब गुरु अष्टम भावारंभी आहे . गुरु कर्क या चर राशीत आहे . गुरूचा नक्षत्रस्वामी शनि लाभात तूळ या चर राशीत आहे . गुरूचा सब चंद्र द्वितीयात कुंभ या स्थिर राशीत आहे . पण सब त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी मंगल  यशाच्या चौथ्या पायरीवर लाभात तूळ या चर राशीत आहे ' याठिकाणी चार राशीचे प्राबल्य आहे म्हणून ह्या मुलीचा विवाह ह्याच मुलाशी होणार नाही असे सांगितले .
                                                 पंचमाचा सब गुरु आहे . गुरु सप्तमाचा कार्येश नाही म्हणजे  प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये  होणार नाही . त्यामुळे दश अंतर्दशा पाहण्याची आवशक्यता नाही .
                                               सप्तमाचा सब गुरु २,३,५,८,१२ या  भावांचा कार्येश आहे . यामधील ३,८,१२ मुळे त्यांच्यामध्ये वादविवाद , संघर्ष होऊ शकतो  व प्रेमभंग होण्याची शक्यता जास्त आहे . मुलगीच (१२) मुळे . माघार घेईल . सबब ह्या मुलाशी लग्न होणार नाही .

                    खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मुलीची जन्मपत्रिका मागितली .
   जन्म तारीख ---- २२ / ८ / १९९१         जन्मवेळ ----  २३-३८          जन्मस्थळ ---- अ १९,१०  रे ७३,०५
   त्यावेळेचे एल , एस , आर , डी
                      दि    ११ / ८ / ३४                   वेळ --१०-२२-३२

                              एल --बुध  / राहू , एस ---मंगळ  , आर --शनि  ,  डी ---चंद्र

सप्तमाचा  सब मंगळ आहे एल एस आर डी मध्ये मंगळ आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
मंगळाचे कार्येशत्व ---

मंगळ ---- ५. ७
रवि ----४ बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१
राहू ----८ , ९ क यु गु ४,१२
शु क र --४,१ बु यु ४,३,६,गु यु ४,१२, र यु ४

प्रथमदर्शनी मंगळ  पहिल्या पायरीला ५,७ या भावांचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह होईल असे वाटते पण दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या पायरीला मंगळ १,४,६,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे  .

तसेच पंचमाचा सब  राहू आहे --- राहू एल एस आर डी मध्ये आहे

राहूचे कार्येशत्व ----
राहू ----८,९
शुक्र ---४,१ बु यु ४,३,६गु यु ४,१२ र यु ४
शनि ---९,१०,११ चं यु ९
रवि ---४,बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१

                                       पंचमाचा सब राहू सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून प्रेमाचे रुपांतर प्रेम विवाहामध्ये होत नाही . पंचमातला मंगळ धाडसी पणा देतो . पण तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे हट्टीपणा मुले , अविचारामुळे व अविवेकीपानामुळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते . सबब सदर मुलीने हा विवाह करू नये . कारण पंचमाचा सब राहू , सप्तमाचा सब मंगळ १,४,६,८,१२ या विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे . तसेच सप्तमेश , सप्तमाचा सब मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे  हा मुलगा खोटारडाआहे .  किंवा याच्याकडून फसवणूक होऊ शकते .

                        हा प्रश्न मी ११ ऑगस्ट २०१४ रोजी सोडविला , गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजाऱ्याकडून कळले कि मुलगी नोकरी सोडून मुंबईला गेली आहे . ह्या दोन्घामध्ये काहीतरी बिनसले असावे असे वाटते .