कृष्णमूर्ति ज्योतिष: 2014

Saturday 18 October 2014

इच्छित मुलाशी विवाह होईल का?

                                         वरील प्रश्न एका आईने आपल्या मुलीबद्धल विचारला आहे .मुलगी सुशिक्षित ,सुसंस्कृत घराण्यातील आहे . ती औरंगाबाद मध्ये नोकरी करीत आहे . तिचे एका मुलावर प्रेम आहे . मुलगा आमच्या जातीतला नाही . आमचा त्याला विरोध आहे . आम्ही उभयतांनी तिला खूप समजावून सांगितले . पण ती ऐकायला तयार नाही . ती म्हणते मी लग्न केले तर याच मुलाशी करेन . आम्हाला तिची खूप काळजी वाटते . कारण मुलगा शिकलेला आहे पण नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही . आता सध्या त्याला नोकरी नाही . म्हणून त्यांनी मला विचारले ह्याच मुलाशी तिचे लग्न होईल का? आणि एक के पी नंबर (९१) दिला . 

                                   के पी नंबर देताना सुधा प्रश्नाच्या अनुषंगाने दिला जातो . के पी नंबर ९१ मधील ९ आकडा मुलीचे पंचम स्थान ( प्रेम प्रणय ) दाखवितो व दोघांची बेरीज केली तर १० येते म्हणजे लाभाचे व्यय स्थान व मुलीच्या सप्तमाचे व्यय स्थान म्हणजे शष्ट स्थान . प्रश्नाचा रोख बरोबर आहे . 

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का ? या प्रश्नासाठी के पी नियम -----
सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसून , स्थिर राशीत असेल व  २,७,११ या
भावाचा कार्येश असेल तर २,७,११ या भवाच्या कार्येश ग्रहाच्या दशेमध्ये विवाह होतो .

मी कॉम्पुटर वर के पी नंबर ९१ प्रमाणे कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली .
                        दि ११ / ८ / २०१४ वेळ ७=४६=५८  स्थळ अ १७,५९ रे ७४,२६ .

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
सिंह लग्न म्हणजे स्थिर तत्वाची कुंडली आहे . चंद्र शष्ट स्थानात व्ययेश आहे ( चिंता , काळजी ) चंद्र मंगळाच्या नक्षत्रात मंगल मुलीचा पंचमेश ( प्रेम , प्रणय ) आणि व्ययेश . मंगल मुलीच्या लाभस्थानात
 ( तृतीय स्थानात ) म्हणजे  प्रश्नाचा रोख बरोबर आहे प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे .
                                           पंचम स्थान मुलीचे लग्न स्थान होईल . पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . मुलीच्या कुंडलीत सप्तमाचा ( मूळ कुंडलीचे लाभस्थान ) सब गुरु आहे  गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

गुरु ---८ कयू
शनि ---११,३
चंद्र ---२ बु दृ ८
मंगळ ---११,१२,५
                                                   साप्तमचा सब गुरु अष्टम भावारंभी आहे . गुरु कर्क या चर राशीत आहे . गुरूचा नक्षत्रस्वामी शनि लाभात तूळ या चर राशीत आहे . गुरूचा सब चंद्र द्वितीयात कुंभ या स्थिर राशीत आहे . पण सब त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी मंगल  यशाच्या चौथ्या पायरीवर लाभात तूळ या चर राशीत आहे ' याठिकाणी चार राशीचे प्राबल्य आहे म्हणून ह्या मुलीचा विवाह ह्याच मुलाशी होणार नाही असे सांगितले .
                                                 पंचमाचा सब गुरु आहे . गुरु सप्तमाचा कार्येश नाही म्हणजे  प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये  होणार नाही . त्यामुळे दश अंतर्दशा पाहण्याची आवशक्यता नाही .
                                               सप्तमाचा सब गुरु २,३,५,८,१२ या  भावांचा कार्येश आहे . यामधील ३,८,१२ मुळे त्यांच्यामध्ये वादविवाद , संघर्ष होऊ शकतो  व प्रेमभंग होण्याची शक्यता जास्त आहे . मुलगीच (१२) मुळे . माघार घेईल . सबब ह्या मुलाशी लग्न होणार नाही .

                    खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मुलीची जन्मपत्रिका मागितली .
   जन्म तारीख ---- २२ / ८ / १९९१         जन्मवेळ ----  २३-३८          जन्मस्थळ ---- अ १९,१०  रे ७३,०५
   त्यावेळेचे एल , एस , आर , डी
                      दि    ११ / ८ / ३४                   वेळ --१०-२२-३२

                              एल --बुध  / राहू , एस ---मंगळ  , आर --शनि  ,  डी ---चंद्र

सप्तमाचा  सब मंगळ आहे एल एस आर डी मध्ये मंगळ आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
मंगळाचे कार्येशत्व ---

मंगळ ---- ५. ७
रवि ----४ बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१
राहू ----८ , ९ क यु गु ४,१२
शु क र --४,१ बु यु ४,३,६,गु यु ४,१२, र यु ४

प्रथमदर्शनी मंगळ  पहिल्या पायरीला ५,७ या भावांचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह होईल असे वाटते पण दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या पायरीला मंगळ १,४,६,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे  .

तसेच पंचमाचा सब  राहू आहे --- राहू एल एस आर डी मध्ये आहे

राहूचे कार्येशत्व ----
राहू ----८,९
शुक्र ---४,१ बु यु ४,३,६गु यु ४,१२ र यु ४
शनि ---९,१०,११ चं यु ९
रवि ---४,बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१

                                       पंचमाचा सब राहू सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून प्रेमाचे रुपांतर प्रेम विवाहामध्ये होत नाही . पंचमातला मंगळ धाडसी पणा देतो . पण तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे हट्टीपणा मुले , अविचारामुळे व अविवेकीपानामुळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते . सबब सदर मुलीने हा विवाह करू नये . कारण पंचमाचा सब राहू , सप्तमाचा सब मंगळ १,४,६,८,१२ या विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे . तसेच सप्तमेश , सप्तमाचा सब मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे  हा मुलगा खोटारडाआहे .  किंवा याच्याकडून फसवणूक होऊ शकते .

                        हा प्रश्न मी ११ ऑगस्ट २०१४ रोजी सोडविला , गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजाऱ्याकडून कळले कि मुलगी नोकरी सोडून मुंबईला गेली आहे . ह्या दोन्घामध्ये काहीतरी बिनसले असावे असे वाटते . 

Monday 13 October 2014

पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल काय ?

                                          सध्या निवडणुकीचे वातावरण आहे . केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे . महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत . महाराष्ट्र मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत . प्रत्येक पक्ष आप आपली ताकद आजमावत आहेत . त्यामध्ये आजी - माजी आमदार आपले नशीब आजमावत आहेत काही ठिकाणी बंडखोरी होत आहे . काही पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . असेच एक ओळखीची व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली मी सुधा या शर्यती मध्ये आहे . मला XXX  पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल का ? मी म्हटले मनामध्ये पक्षातर्फे तिकिट मिळेल काय ? हा विचार करून , मन एकाग्र करून १ ते २४९ मधील एक संख्या सांगा . त्याने थोडा विचार करून १४९ हि संख्या सांगितली . 
        
        
        हा प्रश्न मी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ०८=०७=२१ वाजता अ १७,५९ रे ७४. २६ येथे सोडविला

                                       पक्षातर्फे तिकिट म्हणजे निवडणूक लढविण्यासाठी त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र  असते . पत्राचा विचार तृतीय स्थानावरून करतात . पत्र केंव्हा येईल ? बातमी केंव्हा पेपरमध्ये छापून येईल ? बातमी खरी कि खोटी , इच्छित फोन केंव्हा येईल ? जाहिरात पेपर मध्ये केंव्हा छापून येईल ? हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंव्हा होईल ? या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरून करतात . 


कृष्णमुर्ती नियम -- १) तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातर्फे तिकिट मिळेल . 


राजकारणामध्ये यश --- २) दशमाचा सब १,६,९,१०,११ या भावाचा कार्येश असून गुरु बुध मंगल शनि  इ . ग्रह दशमाचे कार्येश असतील तर राजकारणात यश मिळते . 


दशमाचा सब ६,१०,११ चा कार्येश असेल तर प्रगती होईल , आणि नवम (९) भावाचा कार्येश असेल तर प्रसिद्धी मिळेल . दश - अंतर्दशा संबंधित भावाच्या कार्येश असाव्यात . 


निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल का ? ----


३) लाभाचा सब लग्न  भावाचा कार्येश असेल तर निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल .

हि कुंडली वृश्चिक लग्नाची , स्थिर तत्वाची आहे ह्याचा अर्थ , आहे त्या स्थितीत बदल करू नये असे सुचित करीत आहे . 


मनातील विचार जुळतो का ते पाहू  -----


चंद्र मनाचा कारक  , चंद्र अष्टमात मिथुन राशीत , नवम भावारंभी . चंद्राची दृष्टी तृतीय स्थानारांभी .  चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे . म्हणजे प्रश्न बरोबर आहे . 



ह्या  कुंडली मध्ये तृतीयाचा सब शनि आहे शनीचे कार्येशत्व -----


शनि ---- 

गुरु ---- ९, २ 
बुध ----
मंगळ ----१,६ 

शनि लाभाचा कार्येश  होत नाही . म्हणजेच पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही . हे सांगता येते . 


तसेच पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होते का ते पाहू . 


लाभाचा सब केतू आहे,  केतूचे कार्येशत्व ----

केतू --- ५, गु ९,२ बुध ११
बुध ---११,राहू युती ११ के दृ ५ 
गुरु ---
बुध --११, राहू युती ११ के दृ ५ 

लाभाचा सब लग्नाचा कार्येश होत नाही म्हणजे पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होत नाही . 

पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही त्यामुळे निवडणुकीत यश मिळेल का हे पाहण्याचा प्रश्नच येत नाही . 
                                        
                                       संबंधित व्यक्तीला पक्षातर्फे तिकिट मिळाले नाही 

भविष्य काळात राजकारणात यश मिळेल का ? ते पाहू -----


दशमाचा सब राहू आहे ----


राहू --- ११, बुध बु यु ११ 

मंगळ ---१,६ 
गुरु ----
बुध ---११, राहू युती ११ के दृ ५ 

दशमाचा सब राहू १,६,११ या भावाचा बलवान कार्येश आहे  म्हणून भविष्य काळात राजकारणात यश मिळू शकेल . 





Monday 8 September 2014

 ( आयुर्वेद )औषधोपचार चालू करावे  का?

                                     
                         एक स्त्री जातक तिच्या ११ वर्षाच्या मुलाबरोबर आली होती . तिचा मुलगा इयत्ता ६ वी मध्ये शिकत होता .   पण त्याची उंची फक्त १०० से . मी . होती.   आपण " पा " सिनेमा पाहीला असेल च . त्यामध्ये अमिताभ बच्चन चा चेहरा जसा दाखविला आहे तसाच त्याचा चेहरा दिसत होता . वयोमानानुसार त्याची उंची वाढत नव्हती . उंची वाढविण्यासाठी त्याला हार्मोन्स ची इंजेक्शन दिली जात होती ( रोज एक या प्रमाणे ) असे दोन वर्षे दिली होती हार्मोन्स मुले त्याची उंची फक्त ४" वाढली होती परंतु त्यानंतर त्याच्या उंचीमध्ये वाढ झाली नाही . हार्मोन्स मुळे एक साइड इफेक्ट निर्माण झाला तो म्हणजे त्याच्या शरीरामध्ये क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत गेले ते साधारपणे ६. ० इतके वाढले . साधारणपणे त्याचे प्रमाण ०. ५ ते १. ५ इतकेच असले पाहिजे . वाढलेले क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर पडायला पाहिजे  पण ते बाहेर पडत नव्हते . त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी झाले . इंटर नेट वर मी क्रियेटिनिन बधल मी माहिती मिळविली . क्रियेटिन हा घटक आपल्या स्नायू मध्ये असतो शरीराला उर्जा पुरविण्याचे काम क्रियेटिन करतो . उर्जा पुरवत असताना त्याचे रुपांतर क्रियेटिनिन मध्ये होत असते . हे क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर टाकले जाते . क्रियेटिनिन वाढण्याची कारणे तीन आहेत  . १) उच्च रक्तदाब   २) मधुमेह  ३) हायपर टेन्शन  म्हणून मी त्यांना साखर तपासण्यासाठी सांगितले पण रिपोर्ट  Nil  आला . उच्च दाब असण्याची शक्यता नाही  राहिले फक्त हायपर टेन्शन . हायपर टेन्शनची अनेक कारणे आहेत , त्यामध्ये नैराश्य , आळस , आत्मविश्वास कमी वगैरे .  त्याला चालताना त्रास होतो . कधीकधी चालताना तोल जातो . अशक्त पणा वाटतो . यासर्वावर उपचार म्हणून होमिओपथिकची औषधे चालू केली  होमिओपथिक औषधामुळे क्रियेटिनिन कमी झाले अंदाजे ४ . ० पण  अधून मधून ते वाढत होते . त्याच्या आईला वाटले होमिओपथिक बरोबर आयुर्वेद औषधे द्यावी . म्हणून तिने मला प्रश्न विचारला कि आयुर्वेद औषधे चालू करावी का ? 

औषधोपचार चा विचार पंचम स्थानावरून केला जातो पंचम स्थानाचा सब खालीलप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे औषधोपचार करावे 

पंचमाचा सब रवि असेल तर अलोपथि , चंद्र -होमिओपथि , बुध - आयुर्वेद , मंगळ - इलेक्ट्रिक शोक  अथवा फ़िजिओथेरपि  राहू --युनानी , केतू - मंत्रोपचार व आयुर्वेद . 
नियम --पंचमाचा सब वरील प्रमाणे असेल आणि ५,९,११ या भावांचा बलवान कार्येश असेल तर आयुर्वेद औषधे सुरु करावी 

                               त्यांना मी सांगितले मनामध्ये यासंबंधी विचार करा व मला १ ते २४९ या मधील एक 

संख्या सांगा त्यांनी त्याप्रमाणे विचार करून मला ५० हि संख्या सांगितली 
                             ५० या संख्ये मधील ५ या संख्येवरून औषधाधोपचारचा विचार केला जातो परंतु  पुढील ० 

या संख्ये वरून परिणाम शुन्य होईल असा मी विचार केला परंतु कुंडली काय म्हणते हे पाहण्यासाठी 

मी ५० या संख्ये वरून कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली . हा प्रश्न मी दि . ६ सप्टेंबर २०१४ रोजी       

११=१३=५३     वाजता     अ १७,५९ रे . ७४,२६ येथे सोडविला 

प्रश्न आईने विचारला म्हणून , पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . 

हि कुंडली तूळ लग्नाची , चर तत्वाची आहे म्हणजे ११ वे स्थान बाधक स्थान होईल . 

या कुंडली मध्ये पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

शुक्र --११
केतू --६ , गु १०,३     ( केतू --मंत्रोपचार  व आयुर्वेद )
राहू -- १२, बु १२,९    ( राहू --युनानी , बुध --आयुर्वेद )
मंगळ --१,२,७         ( मंगळ --इलेक्ट्रिक शोक , फ़िजिओथेरपि )

                                               पंचमाचा सब शुक्र सिंह या स्थिर राशीत आहे म्हणजे आहे ह्यात बदल करू नये , पण सबचा नक्षत्रस्वामी केतू मीन या द्विस्वभाव राशीत आहे , नक्षत्रस्वामी बदल करावा असे सुचित करीत आहे . यापैकी काय निवडावे असा प्रश्न मला पडला .  एकूण शुक्राचे कार्येशत्व पाहता शुक्र जास्त प्रमाणात प्रतिकूल भावांचा कार्येश आहे  म्हणून मी ठरविले बदल करू नये . बदल केला तर आजार  बळावण्याची शक्यता जास्त आहे . यशाच्या चतुर्थ पायरीवर मंगल २,७ या मारक भावांचा कार्येश असून वृश्चिक या स्थिर राशीत आहे . 

          शुक्र   ११ ( बाधक ) , २,७ ( मारक ) , १२ ( हॉस्पिटल ) , ६ ( आजार , रोग ) या भावांचा बलवान कार्येश आहे . फक्त ९ या अनुकूल भावांचा बलवान कार्येश आहे . प्रतिकूल भाव जास्त आहेत म्हणून त्याचा आजार जास्त वाढेल म्हणून मी त्यांना मी सांगितले कि आयुर्वेद औषधे चालू  करू नका 

आता दशांचा विचार करू --- प्रश्न वेळी रवि महादाशेमध्ये शुक्राची अंतर दशा चालू आहे . रविचे कार्येशत्व ---

रवि --
शुक्र --११,८
राहू --१२, बु १२ , ९
मंगळ --१,२,७

शुक्राचे कार्येशत्व आपण वर पाहिलेच आहे . रवि  ११ ( बाधक ) , ८ ( अशुभ स्थान ) १२ ( हॉस्पिटल ) , २,७ 
( मारक ) , या भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे दशा सुधा अनुकूल नाही . सबब आयुर्वेद औषधे चालू करू नयेत असे सांगितले . 

Wednesday 27 August 2014

काळाबरोबर वेळही आली होती -----

                                          ज्योतिषाला जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विवाहाचा . जन्माच्या वेळी पत्रिका काढली जाते आणि विवाहाच्यावेळी बाहेर काढली जाते . त्या खालोखाल शिक्षण , नोकरी , घर ,वाहन , प्रेमविवाह , कर्ज , परदेशगमन . ह्या सर्व समस्याचे ज्योतिष मार्गदर्शन केले जाते . पण काही प्रश्न विचारले जात नाही उदा . मला अपघात केंव्हा  होणार आहे ? माझे आयुष्य किती आहे ? मी आजारी केंव्हा पडणार आहे ? या प्रकारच्या घटना घडल्यानंतर च त्याची कारणमीमांसा शोधली जाते . फार फार तर एखादी व्यक्ती जास्त आजारी असेल तर त्याचे  नातेवाईक प्रश्न  विचारतात . 
                    माझ्या  मित्राची मुलगी डॉक्टर आहे , तिचा पती सुधा डॉक्टर आहे -- म्हणजे होता असे म्हणावे लागेल . दोघांना दोन मुले   आहेत   ( एक मुलगी ,एक  मुलगा ) त्यांची प्रक्टिस उत्तम चालू होती . सर्व काही आनंदी आनंद होता . पण काळाला ते पाहवले नाही . एकदा एका नातेवाईकाच्या मुलीचा साखरपुडा होता म्हणून सर्वचजण गावाला नातेवाईकाकडे   गेले होते . कार्यक्रम पूर्ण व्हायला रात्रीचे ९ वाजले ९=३० वाजता घरी यायला निघाले . पती गाडी चालवत होते . साधारणपणे एका तासानंतर १०=३० ते ११=३० या दरम्यान  समोरून एक वाहन  येत होते  त्याला लाइट्स नव्हते फ़क्त दिशा दिशा दर्शक आलटून पालटून लागत होते  . त्यामुळे नक्की कोणत्या प्रकारचे वाहन आहे हे कळत नव्हते . त्यामुळे जवळ आल्यावर समोरा समोर जोरात टक्कर झाली व ड्रायव्हर ची बाजू पूर्णपणे घासत गेली . त्यामुळे तिचे पतीचे व सासऱ्याच्या बहिणीचा मृत्यू जागेवरच झाला . हि व तिची दोन्ही मुले बाहेर फेकली गेली . हि व हिचा मुलगा बेशुद्ध पडले . मुलीला थोडेसे खरचटले होते . मुलीने आरडा ओरडा करून लोकांना बोलावले . नंतर हॉस्पिटल मध्ये भरती केले . 

पतीचे निधन  कोणत्या योगामुळे झाले  त्याचे विवेचन आपण पाहणार आहोत . प्रथम अपघाताचे नियम कोणते आहेत ते पाहू . 

कृष्णमुर्ती प्रमाणे -----

१) लग्नाचा सब अष्टमाचा कार्येश असेल तर --
२) अष्टमाचा सब लग्नाचा कार्येश असेल तर --
३) लग्नाचा सब चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंधित असेल तर वाहनामुळे अपघात होतो . 
४) अष्टमाचा सब मारक बाधक व मोक्ष (४) स्थानाशी संबंध असेल तर अपघातात जीवित हानी होते . 
५) बाधक स्थानाशी संबंध येत नसेल तर जीवित हानी होत नाही 
६) लग्नाचा संबंध ४ भावाशी असेल तर अपघाताचे स्वरूप सामान्य असते . हाच सब ४,१२ या भावाशी संबंधी असेल तर हॉस्पिटल मध्ये जावे लागते . 
७) लग्नाचा सब शनि असून अष्टमाशी संबंध असेल तर उंचीवरून पडून अपघात होतो . 
८) लग्नाचा सब चंद्र असून अष्टमाशी संबंध असेल तर पाण्यात बुडून अपघात होतो 
९) शनि मंगळ यांची अंशात्मक युती असेल तर--
१०) शनि , शाष्टेश ,अष्टमेश व चतुर्थेश यांच्या युतीत असेल तर किंवा शनीची त्यांच्या स्वामीवर दृष्टी असेल तर अपघात होतो . 
११) लग्न  / अष्टम भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशा अंतर्दशे मध्ये अपघात घडतात . 
१२) असे प्रश्न सोडवताना आयुष्य योग पाहावा . लग्नाचा सब १,५,९ भावांचा कार्येश असेल तर दीर्घायू , ( वय वर्षे ६६ च्या पुढे )सब ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर अल्पायू ( वय वर्षे ३३ च्या आत ) व १,५,९ / ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर मध्यायू  ( वय वर्षे ३३ ते ६६ )

पुरुष जातक ---

जन्मतारीख १४ / ११ / १९६३                    जन्म वेळ -- २=१७=२१           जन्मस्थळ ---सोलापूर 

अपघाताची तारीख ---२३ / ६ / २०००       वेळ --रात्री  १०=३०  ते ११=३० 


१) लग्नाचा सब रवि आहे . रविचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                         रवि ---३,१,श दृ ५,६
न . स्वामी          गुरु ---७,८
      सब              शुक्र --
स . न . स्वामी     बुध---३,११
लग्नाचा सब १,५ / ६,८  भावांचा  कार्येश आहे म्हणून जातक मध्यायू   ( वय वर्षे ३३ ते ६६ ) लग्नाचा सबचा सब शुक्र आहे . 

२) अष्टमाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                        गुरु ---
न . स्वामी         बुध --३,११
      सब            बुध ---
स . न . स्वामी  गुरु ---७,८

अष्टमाचा सब चा चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंध दिसून येत नाही . पत्रिका निट पहिली तर एक गोष्ट लक्षात येईल ,गुरूची नववी दृष्टी मंगळावर आहे . त्यामुळे मंगळाचे कार्येशत्व गुरूला प्राप्त होईल . मंगळ चतुर्थारंभी
 ( ६ अंश )आणि नवमेश आहे . शिवाय मंगळ शुक्र युती आहे . त्यामुळे गुरूला ४,९ या भावांचे कार्येशत्व मिळेल . गुरु १, ३,४,७,८,९,११ या भावांचा बलवान कार्येश आहे . गुरु ची दृष्टी लग्नावर आहे . भावारंभी नाही . अष्टम भावाचा चातुर्थाशी व शुक्राशी संबंध येतो . म्हणून वाहन अपघात झाला . कुंडली सिंह लग्नाची स्थिर तत्वाची आहे . स्थिर लग्नाला नवम भाव बाधक आहे . 
३ ( प्रवास ) , ४ ( वाहन , मोक्ष ), ७ (मारक ), ९ ( बाधक ) ,८ ( मृत्यू ) ज्यावेळी अष्टम भावाचा संबंध चतुर्थ , मारक ,बाधक भावांशी येतो त्यावेळी व्यक्ती वाचण्याची शक्यता नसते .

ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी जातकाची गुरु / राहू  / चंद्र  / गुरु  /शनि दशा चालू होती . 

                         गुरु ---                                                           राहू --१०,बु ३,११ मं दृ ३,९       
न . स्वामी         बुध --३,११                                                      गुरु --७,८                              
      सब             बुध ---                                                            गुरु ---                                   
स . न . स्वामी   गुरु ---७,८                                                     बुध ---३,११                            

       

              चंद्र --२,१२                                                           शनि --५,६ कयू 
              मंगळ --३,९,शु यु ३                                              मंगळ --३,९,शु यु ३
               बुध --                                                                 मंगळ --
               गुरु --७,८                                                           बुध ---३,११


               ( २,३,७,८,९,१२ )                                                   ( ३,६,९,११ )
मृत्यू चा कारक शनि ,मृत्युच्या वेळी उपस्थित आहे चतुर्थाचा सब गुरूच आहे तो अष्टम भावाचा बलवान कार्येश आहे . अष्टमाचा सब गुरु ची मंगळावर दृष्टी , मंगळ चतुर्थ भावारंभी ( ६ अंश ) चतुर्थ व अष्टमाचा संबंध म्हणून वाहन अपघात जातकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेण्याची वेळ आली  नाही . 

Thursday 31 July 2014

कुर्यात सदा मंगलम 

                                         माझ्या भावाचा मित्र एकदा मंडइत भेटला व म्हणाला माझ्या मुलीचे लग्नासाठी प्रयत्न चालू आहेत पण अध्याप कुठे जुळत नाही . मी म्हटले तिची जन्मतारीख जन्मवेळ दे . त्याने घरी फोन करून मला तिची जन्मतारीख जन्मवेळ व जन्मस्थळ दिले . मी ते लिहून घेतले . त्यानंतर बरेच दिवस त्याची गाठ पडली नाही . मी चौकशी केली तेंव्हा  कळले कि त्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे . त्याला मधुमेह होता . पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती . ती बरेच दिवस होती . त्यानंतर पायाला गंगारिंग झाले . त्यातच बायपास सर्जरी झाली . दोन दिवस  पुण्याला हौस्पितल मध्ये admit होता . शेवटी सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले .  हि गोष्ट माझ्या मनाला फार लागली . त्यानंतर मी त्याच्या घरी फोन केला . व त्याच्या पत्नीला सांगितले दोन महिन्यापूर्वी त्याची माझी भेट झाली होती त्यावेळी तुमच्या मुलीच्या लग्नासंबंधी चर्चा करत होतो  पण अचानक असे घडलेले मला माहित नव्हते त्यामुळे  मी संपर्क साधू शकलो नाही . त्यावेळी त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते . मी म्हटले ठीक आहे,  या.    
                                         एके दिवशी त्या मुलीला घेऊन घरी आल्या व म्हणाल्या या मुलीचा लग्नाचा योग केंव्हा आहे ? माझ्याकडे मुलीच्या जन्माचे टिपण होते . त्यावरून मी कृष्णमुर्ती प्रमणे कुंडली  तयार केली . तसेच मुलीकडून एक केपी नंबर घेतला व दोन्ही पत्रिकेचा आभ्यास करून त्यांना सांगितले ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ या कालावधीत लग्न होईल . आणि त्याच कालावधीत लग्न झाले . माझे उत्तर बरोबर आले.  कसे  ते खालीलप्रमाणे 
हा प्रश्न  दि . २३ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडविला . 
स्त्री जातक  जन्मतारीख --२२ जून १९८७ जन्मवेळ --सकाळी ९-१४ जन्मस्थळ -सातारा 
या कुंडलीत सप्तमाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ---
बुध --१२ कयु 
गुरु -- ९,६
शनि --५ क्यू 
बुध ---१२,३,१२ कयू   मं यु १२

 कृष्णमुर्ती नियम ---सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर २,७,११, / ५., ८ या भावांच्या  सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो . 

बुध ३,५ या पूरक भावांचा कार्येश आहे . म्हणजे लग्न होणार  नक्की . आता केंव्हा होणार ह्यासाठी आपणाला 
दश - अंतर दशा पाहाव्या लागतील . प्रश्न्वेळी मंगळाची महादशा ,गुरु अंतर दशा ,  होती . 
मंगळ  / गुरु दशा ११ / ८ /२०१३ ते १८ / ७ / २०१४ पर्यंत आहे  

मंगल --                             गुरु ---                                 केतू ---३ क यु                      शुक्र ---११
गुरु --९,६                            केतू ---२,३ क यु बु १२,३       चंद्र ---१०,१                           चंद्र ---१०
शुक्र --११ क यु                    शुक्र ---११ क यु                    राहू ---८,९ क यु गु ९,६          केतू ---३ क यु 
चंद्र ---१०,१ , १० क यु          चंद्र ---१०                             शनि ---५,७  शु दृ १०,४         चंद्र ---१०,१ 

 रवि ---११                                                                    चंद्र ---१० क यु 
मंगळ ---१२, बु यु १२                                                    शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७
चंद्र ----१०                                                                     गुरु ---
शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७                                      केतू ---२,३ क यु बु १२ ,३ 

मंगल महादशा  (११ ) गुरु अंतर्दशा  (२,११ ) या  भावांची बलवान कार्येश आहे . २,७,११ या भावांची साखळी पूर्ण  होण्यासाठी विदशा  अशी शोधावी  लागेल ती म्हणजे ७ या भावांची कार्येश असेल .  वरील ग्रहांचे कार्येश पाहता फक्त रवि ,चंद्र, केतू  ७ या भावाची कार्येश आहे . यामध्ये चंद्र २,७,११ या तिन्ही भावांची कार्येश आहे .   म्हणून मी चंद्र विदश निवडली . मंगळ / गुरु  / चंद्र ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ हा कालावधी आहे  
९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४  याच कालावधीत विवाह होईल . 
                                       ह्या मुलीचा विवाह २४ एप्रिल २०१४ रोजी झाला आहे . 

हाच  प्रश्न मी केपी नंबर ११५ ने  सोडविला 

केपी नंबर ११५ वरून मी  कृष्णमुर्ती पद्धतीने  तयार केली . 
दि . २३ / ११ / २०१३ वेळ -१५-५३-२२    स्थळ -- अ १७,५९  रे ७४,२६

या कुंडलीत सप्तमाचा सब  राहू आहे . 

राहू -- १,२ क यु शु दृ ४,९
राहू --- १,२ क यु शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१०, शु दृ ४,९

सप्तमाचा  सब २ या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा कार्येश  आहे राहू केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी त्यावेळी ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने  देतात . विवाह केंव्हा केंव्हा होईल   त्या साठी  दशा अंतर दशा पाहू . प्रश्न वेळी शनि महादशा व चंद्राची अंतर्दशा  चालू होती. शनि व चंद्र ची कार्येशत्व खालीलप्रमाणे 

                           शनि ---                                            चंद्र ---१०,११  क यु 
                           गुरु ---१०,शु दृ ४,९                            शनि --२,५,६ बु यु २
                           शनि --                                             चंद्र ---१०,११ क यु 
                           गुरु ---१० शु दृ ४,९                            शनि -- २,५,६ बु यु २
अनुकूल भाव                 ( ९ )                                                 ( २,५,११ )

शनि महादशा ( ९) चंद्र अंतर्दशा   ( २ , ५ , ११ )या  भावाची बलवान कार्येश आहे . पुढील विदशा खालीलप्रमाणे 

शनि / चंद्र  / राहू   २८ / १० /२०१३ ते  २३ / १ / २०१४   पर्यंत 
                   गुरु                               १० / ४ /२०१४
                  शनि                              १० / ७ /२०१४

गुरु --१० शु दृ ४,९ 
गुरु --१० शु दृ ४,९
केतू --७,८ क यु मं १२,३,८
केतू --७,८ क यु मं १२,३,८

गुरु ३,७,८ या   भाव बलवान कार्येश आहे . या ठिकाणी २, ७ , ११ / ५ , ८ भावांची साखळी  पूर्ण होते . म्हणून शनि महादशा चंद्र अंतर्दशा व गुरु विदशा म्हणजे २३ / १ /२०१४ ते १० / ४ /२०१४ या कालावधीत विवाह व्हावयास हवा . 
ह्या मुलीचा सुपारी व साखरपुडा ४ फेब्रुवारी २०१४ ला झाला . विवाह २४ / ४ /२०१४ रोजी झाला 
  

Sunday 29 June 2014

म्हैस आजारातून केंव्हा बरी होईल ?

                                                            आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर लेखन करणार आहे . सातारा 

जिल्ह्यातील फलटण , माण खटाव हे दुष्काळ ग्रस्त तालुके आहेत . त्याल्यात्यात माण तालुका अतिशय 

दुष्काळ प्रवण तालुका . या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी ३५-४० सेमी . आहे . बहुतेक शेती पावसाच्या 

पाण्यावर अवलंबून आहे . त्यामुळे ठराविकच पिके काढली जातात . या तालुक्यात घरटी एक माणूस मुंबईला 

कामाला असते . किंवा सैन्यात भरती होते . 

                                                              त्यामुळे शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसाय किंवा मेढी पालन हा जोड 

धंदा केला जातो . प्रत्येक घरा गणिक २-३ दुभती जनावरे असतातच . या जोड धंद्यामुळे येथील जनता कसेबसे 
दोन घास खाऊ शकतात . दुग्ध व्यवसाय मुळे येथील जनता तग धरून आहे . म्हणून शेती बरोबर दुभती 

जनावरांची जास्त काळजी घेतात . 

                                                            असाच एक गरीब शेतकरी एक दिवस माझ्याकडे आला व मला 

म्हणाला माझी एक म्हैस २ महिन्यापासून आजारी आहे . ती दुध देत नाही . त्यामुळे घरात तारेवरची कसरत 

करावी लागते . माझी म्हैस आजारातून कधी बरी होईल ? असा प्रश्न मला विचारला . अश्या प्रकारचा प्रश्न 

सोडविण्याचा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदाच आला . काही ज्योतिषी  उपाय म्हणून गंडे , ताईत , दोरे देतात हे 

मला माहित होते . पण त्यातले ज्ञान मला काहीच नाही . 

                                                           मी माझ्या कॉलेज मधील प्राध्यापकांना विचारले कि माणूस व पाळीव 
प्राणी यांच्या शरीर रचनेत काही फरक आहे का? त्यांनी सांगितले नाही . माणूस व पाळीव प्राणी यांच्यामधील 

 क्रिया सारख्याच असतात . फक्त पाळीव प्राण्याची ( गाय , बैल म्हैस ,कुत्रा ) यांची Efficiency जास्त आहे . 

आणि प्रेग्नसी पिरीयड वेग वेगळा असतो . गायी मध्ये २८५ दिवस व म्हैस मध्ये ३०० दिवस असतो  गाय 

बैल म्हैस आजारी पडल्यावर पशु वैध त्यांच्या ठराविक लक्षणावरून औषधोपचार करतात . तेही ठराविक 

आजारावर करतात . माणसाच्या बाबतीत जसे रक्त , मुत्र यांची तपासणी केली जाते तसे पाळीव प्राण्याची 

तपासणी केली जाते हे माझ्या  ऐकिवात नाही . किंवा त्यांची शस्त्रक्रिया केली जाते हे कोठे पाहण्यात नाही . 

किंबहुना माणसा सारखे आजार त्यांना होतात य़बधल मला कल्पना नाही . आणि या सर्व गोष्टी करायचे 

म्हटले तर त्याचा खर्च हि शेतकऱ्याच्या आवाक्या पलीकडचा असणार त्यामुळे शेतकरी त्या फंदात पडत 

नसावेत . अगदीच गंभीर आजार असेल तर त्यांची काळजी घेणेही शक्य होणार नाही . 

                                                        शेतकऱ्याच्या बोलण्यातून एक गोष्ट कळली ती म्हणजे म्हैस आठव्या 

महिन्यात व्याली होती . सर्व साधारण पणे म्हैसी चा प्रेग्नसी कालावधीत ३०० दिवस म्हणजे १० महिन्याचा 

असतो . दोन महिने अगोदर व्याल्या मुले गर्भाशयाला इजा झाली असेल का? हा विचार माझ्या मनात आला . 

ज्योतिष शास्त्रात शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार करतात ( गाय , बैल , म्हैस कुत्रा ,शेळी मेंढी )

 मी मनात विचार केला हा प्रश्न सोडवून तर पाहू . शेतकऱ्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले व सांगितले 

मनामध्ये माझी म्हैस आजारातून बरी केंव्हा होईल असा विचार कर आणि एक पान  काढ व उजव्या 

बाजूवरील पान क्रमांक मला सांग . त्याप्रमाणे करून त्याने मला १४५ क्रमांक सांगितला  १४५ नंबरवरून मी 

कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली . 
     
हा प्रश्न मी  ९ जून २०१४ रोजी १०=३४=२२ वाजता अं १७,५९  रे ७४,२६ येथे सोडविला                                                
                                                      ह्या कुंडलीत शेतकऱ्याच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू . 

चंद्र लाभ स्थानात आहे . म्हणजे षष्ठ स्थानापासून षष्ठ स्थानात . शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार 

केला जातो चंद्र लाभ  स्थानात आहे म्हणजेच  म्हैस आजारी आहे हे नक्की झाले . 

षष्ठ स्थान पाळीव प्राणी म्हणजेच म्हैस . षष्ठ स्थान हे म्हैसिचे लग्न स्थान होईल . षष्ठ स्थान लग्न स्थान 

धरून कुंडली फिरवून घेतली आहे . 

                                                     म्हैसिचे लग्न मेष चर  तत्वाचे आहे  षष्ठ स्थान कन्या ०३,१३,१९ ने सुरु 

होते . षष्ठ स्थानाचा सब शनि आहे शनि म्हैस आजारातून बरी होणार कि नाही ते सांगणार आहे . शनीचे 

कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
   शनि --७,११,गु दृ ४,१०,शु दृ १,८
  गुरु ---३,१०,४ क यु 
  बुध ---३,४ 
   राहू ---६,७ क यु शु १,८

      लग्न चर तत्वाचे आहे म्हणजे ११ वे स्थान हे बाधक स्थान होईल . शनि १,३,४,६,७,८१० ११  भावांचा 

बलवान कार्येश आहे शनि १, ४,( अंतिम स्थान ) ६,( आजार )८,(मृत्यू) १०,(इच्छा पूर्ती होणार नाही) 

११ ( बाधक स्थान )

षष्ठ चा सब शनि आहे म्हणजे दीर्घ मुदतीच आजार आहे . शनि  तुल राशीत सप्तमात आहे .व अष्टम स्थानारंभी 

आहे . (अंदाजे ५ अंश फरक )

षष्ठ चा सब शनि आहे ----दीर्घ मुदतीचे आजार 

शनि तुल राशीत आहे म्हणून ----पोटा खालचा भाग ,मूत्रपिंड , गर्भाशय , कटी भागाची हाडे . 

शनि तुल राशीत सप्तमात आहे ----स्त्री इंद्रिय , मूत्राशय, गर्भाशय , स्त्री अंडाशय , प्रोस्टट ग्रंथी 

शनि अष्टम भावारंभी आहे( ५ अंश ) ----प्रजोत्पादन इंद्रिये , मुत्र , बीजकोष , योनी मार्ग 

शनीचा नक्षत्र स्वामी गुरु आहे------ रक्त दोष , सूज येणे पांढऱ्या पेशी वाढणे ,कैंसर 

गुरु अष्टमात नवम  आरंभी -----मांडी ,जांघ , नाडी  / धमणी 

गुरु मिथुन राशीत ---- खांदे , हात ,फुफ्पुसे ,रक्त , श्वास 

शनीचा सब बुध ---मज्जातंतूचे विकार , अपचन ,भूक मंदावणे ,पोटदुखी , अतिसार 

बुध अष्टमात ---वरीलप्रमाणे 

शनीचा सबचा नक्षत्र स्वामी राहू लाभात ( लाभ स्थान --बाधक )व्यायारांभी राहू तुल राशीत  वरील प्रमाणे 

वरील निष्कर्ष वरून एक गोष्ट लक्षात येते म्हैसिला गर्भाशय , मूत्रपिंड, मूत्राशय चा विकार झाला आहे . प्रश्न 

वेळी मंगल  / मंगल  / शुक्र  ची दशा चालू होती . मंगल शुक्र दशा १७ जून २०१४ पर्यंत होती . मंगल शुक्राचे 

कार्येशत्व खालीलप्रमाणे 

मंगल ---                                         शुक्र ---१,८
चंद्र ---६,७ कयु राहू यु ६                    शुक्र ---१ ,८
शनि ---७,११                                    राहू --- ७
गुरु ---३,११,४ कयू                            मंगल --- ६, ९

मंगल ३,४,६,७, ११ या भावांचा व शकूर १,६,७,८ भावांचा बलवान कार्येश आहे . 

१ (लग्न ), ४ ( अंतिम क्षणं ), ६ ( आजार, रोग ) , ७ (मारक ), ११( बाधक ), ८ (मृत्यू )

नियम -- ज्यावेळी १,४,६,८,१२,मारक  बाधक भावांच्या दशा येतात त्यावेळी वाचण्याची शक्यता  कमी असते 

१७ जून  २०१४ पर्यंत . परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही . आजारातून  बरी होण्यासाठी षष्ठ  

   चा व्यय म्हणजे पंचम भावाची दशा यावयास हवी . त्यापुढील विदशा रवीची आहे रविचे कार्येशत्व पुढीलप्रमाणे 

रवि --२,५,३
मंगल ---६,९
राहू ---७ 
मंगल ---६,९

रवि विदशा पंचम भावाची बलवान कार्येश आहे . तसेच ९ भाव म्हणजे पंचमाचा पंचम  रवि विदशेमध्ये आजर 
बरा  होइल . रवि विदश १७ जून २०१४ ते ८ जुलै २०१४ पर्यंत आहे याच कालावधीत म्हैसी चा आजार बारा 

होईल असे सांगितले . 

                    त्यानंतर मी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही . असो 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

                 
                         दि . १२/७/२०१४ रोजी वरील लेखातील शेतकरी एका कामानिमित्त माझ्याकडे आले होते . 

त्यांना विचारले म्हैस कशी आहे ? ते म्हणाले तुम्ही सांगितलेल्या तारखेपासून तिच्यामध्ये खूप चांगला 

फरक पडला आहे खाणे व्यवस्थित चालू आहे , परंतु अधाप दुध देत नाही .  मी म्हटले ठीक आहे हळूहळू 

तिच्यामध्ये फरक पडेल . 

ज्यांच्या बोटाला धरून इथपर्यंत वाटचाल केली त्या मा . गोंधळेकर सर यांना वंदन करून इथेच पूर्णविराम देतो . 

Tuesday 20 May 2014

१२ सायन्स नंतर कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे ?

                  माझ्या विध्यार्थ्याची मुलगी ,नुकतीच तिने बारावी सायन्स ची परिक्षा दिली होती . पुढील शिक्षण कोणत्या प्रकारचे घ्यावे या संबंधी घरामध्ये चर्चा चाललेली होती . वडिलांचे मत होते तिने फार्मसीचे शिक्षण घ्यावे . तिचे म्हणणे होते कोम्पुटर किंवा आर्किटेक चे शिक्षण घ्यावे . 
                   माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे हे त्याला माहित होते . एक दिवस त्याने मला फोन केला  व म्हणाला मला आपली भेट घ्यावयाची आहे केंव्हा येऊ? मी त्याला सकाळी १०=००  यायला सांगितले . त्याप्रमाणे तो सकाळी आला . बरोबर मुलीला घेऊन आला . थोडा वेळ इतर गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला मी एका खास कामासाठी तुमच्याकडे आलो आहे . मी म्हटले काय काम आहे ? तो म्हणाला ज्योतिष विषयक एक सल्ला पाहिजे . मी म्हटले काय प्रश्न आहे ? हि माझी मुलगी नुकतीच तिने १२ वि  सायन्स ची परीक्षा दिली आहे . पुढील शिक्षण कोन्त्याप्रकाराचे घ्यावे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आलो आहे .
                   मी हा प्रश्न दोन प्रकारे सोडविला . १ ) एल,एस आर डि ( रुलिंग )प्रमाणे  २) संख्या शास्त्रा प्रमाणे
     तिला एका कागदावर ४ पर्याय लिहिलायला सांगितले व प्रत्येकापुढे एक संख्या लिहायला सांगितली तिने खालीलप्रमाणे लिहिले

१) आर्किटेक   २) आय टी   ३) कोम्पुटर   ४ )फार्मसी   
       ०७               २००            १७८                   १७२

दिनांक १८ / ५ / २०१४  वेळ - १०. १५  या वेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे 
१)   एल - चंद्र ,  एस -शुक्र ,   आर -गुरु ,   डी -रवि
एल-लग्नस्वामी , एस .. नक्षत्रस्वामी , आर ... राशिस्वामी , डी ...वाराचा स्वामी  संख्या शास्त्राप्रमाणे ----रुलिंग मधील लग्न स्वामी चंद्र आहे म्हणजे रास कर्क आहे . कर्क राशीचा क्रमांक ४ आहे . रुलिंग मधील नक्षत्रस्वामी शुक्र आहे . शुक्राच्या राशी दोन आहेत. वृषभ व तूळ  वृषभ हि दोन क्रमांकाची रास  व तुला हि ७ क्रमांकाची रास आहे म्हणून २+७ घ्या .  रुलिंग मधील राशी स्वामी गुरु आहे .गुरूच्या दोन राशी आहेत धनु व मिन धनु रास क्रमांक ९ व मिन राशीचा क्रमांक १२ म्हणून ९+१२ घ्या . रुलिंग मधील वरचा स्वामी रवी आहे रवीची सिंह आहे सिंह राशीचा क्रमांक ५ आहे .या सर्वांची बेरीज करणे खालीलप्रमाणे 

१)   चंद्र --कर्क राशी क्रमांक ---     ४
२)  शुक्र --वृषभ व तुल २+७----    ९
३)  गुरु ---धनु व मीन   ९+१२----२१
४)  रवि --- सिंह                   ----- ५
                                     ----------------
                                                    ३९
पर्याय फक्त ४ आहेत म्हणून ३९ या संखेला ४ ने भागिले बाकी ३ शिल्लक राहिली म्हणून तिसरा पर्याय कोम्पुटर हे उत्तर आले

२) तिने शाखेच्या पुढे ज्या संख्या लिहिल्या  आहेत त्यावरून  मी कृष्णमुर्ती कोष्टकाप्रमाणे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी काढले ते खालीलप्रमाणे आले 

१)  आर्किटेक ०७---  मंगळ --केतू -- गुरु 

२) आय टी   २०० --- शनि ---चंद्र --- बुध 

३) कोम्पुटर  १७८ ---गुरु ---शुक्र ---चंद्र 

४) फार्मसी   १७२ ----गुरु ---केतू ---राहू 

             यांची तुलना त्यावेळेच्या एल एस आर डि ( रुलिंग ) बरोबर केली . रुलिंग मधील ग्रह आहेत चंद्र शुक्र व गुरु  हे क्रमांक ३ च्या पर्याया बरोबर तंतोतंत जुळते म्हणून मी तिला सांगितले तुला कॉ म्पुटर या शाखेत प्रवेश मिळेल . 

                किंवा बी सी एस किंवा बी सी ए या शाखेमध्ये प्रवेश घेशील . कारण हि सुधा कोम्पुटर ची शाखा आहे . 

अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले .

शुभम भवतु 

Monday 12 May 2014

पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध असतील का ?

                   एक लेडी डॉक्टर ,. तिचे एका डॉक्टर बरोबर विवाह झालेला होता . दोघांची प्रक्टिस चांगली चाललेली होती . सगळे काही व्यवस्थितित चालले होते . दोन वर्षात तिला एक मुलगा झाला  . घरी फक्त सासू सासरे हि दोघ आणि त्यांचा मुलगा .एवढेच होते . हि घराचे सगळे आवरून दवाखान्यात जात होती ती दवाखान्यात जाते त्यावेळी सासू सासरे मुलाची काळजी घेतात . 
                        सगळ्याच गोष्टी व्यावास्थितीत चालल्या तर ते जीवन कसले . कधी कधी आयुष्यात  अचानक एखादे वादळ येते आणि सगळेच बदलून जाते . आयुष्य ढवळून निघते .
                           दोघेही स्वतंत्र प्रक्टिस पुण्यामध्ये करीत आहेत . पति कडे एक नवीन शिकाऊ लेडी डॉक्टर प्रक्टिस करण्यास येत होती .  ती आल्यापासूनच या दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले होते  तिला कळेना पति यापूर्वी असे कधी वागत नव्हते . आताच काय झाले ?सध्या नवरा तिच्यासाठी वेळ देत नव्हता . हिच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली .
                             एके दिवशी तिने मला फोन करून विचारले माझ्या पतीचे त्या स्त्री बरोबर तश्या प्रकारचे संबंध असतील का ? मी म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग तिने १५७  संख्या सांगितली . हा प्रश्न मी
   २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १५=३८=५७ वाजता अ १७,५९ रे ७४,२६ येथे सोडविला .
               कृष्णमुर्ती नियम -- पंचमाचा सब द्विस्वभाव राशीत असून ५ व ११   या भावाचा कार्येश असेल तर संबंध असतील व पंचमाचा सब स्थिर राशीत असून ६ व १२ भावांचा कार्येश असेल तर संबंध असणार नाहीत
               हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे . पत्नीने प्रश्न विचारला आहे म्हणून सप्तम स्थान पतीचे लग्न स्थान होईल . सप्तमा स्थान वृषभ लग्न आहे म्हणून सप्तमस्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे .
              पतीचे पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
           
             शुक्र --
न स्वा    गुरु --२,८
सब       मंगळ --५ कास्प युती
स न स्वा चंद्र --११,३,के यु ११
 
                       येथे पंचमाच सब शुक्र कन्या या द्विस्वभाव राशीत असून ५ व ११ या भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध आहेत हे सिद्ध होते . शुक्र लग्नेश आहे . सब चा नक्षत्रस्वामी गुरु हा सुधा मिथुन  द्विस्वभाव राशीत आहे . संबंध आहेत हे खात्रीपूर्वक सांगता येते . 
                    आता महादशा अंतर्दशा पाहू --
प्रश्न पाहते वेळी केतू महादशे मध्ये रवीची अंतर्दशा चालू होती केतूचे कार्येशत्व ----


केतू --११,  मं ४,१२ चं यु ११,३               रवि --११,बु यु ११          चंद्र --
केतू --११,मं   ४,१२ चं यु ११,३               शुक्र --१०,१                  केतू --११,मं ४,१२ चं यु ११,३
चंद्र --                                                 शुक्र --                         रवि --११,बु यु ११
केतू --११,मं   ४,१२, चं यु ११,३              गुरु ---२,८                    शुक्र --- १०, १


मंगळ --५                            राहू --५,शु १०,१ चं दृ ११,३          गुरु --२,८              शनि --६,९
चंद्र ---११,के यु ११                 मंगळ --४,१२,५ क यु                गुरु --२,८               गुरु --२,८
बुध --११ , १२ क यु                शुक्र ---                                    गुरु --२,८               शुक्र --
शुक्र -- १०,१                          गुरु --२,८                                  गुरु ---२ , ८           गुरु --२,८


राहू व केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने देतात 

वरील सर्व ग्रहांचे कार्येशत्व पाहता केतू मध्ये रवि , चंद्र , मंगळ व राहू अंतर्दशे पर्यंत संबंध चालू राहतील . 
गुरु अंतर्दशे मध्ये गुरु ५, ११  भावाचा कार्येश नाही तसेच शनि ५, ११ भावांचा कार्येश नाही . गुरु अंतर्दशे पासून म्हणजे १६ मे २०१६ पासून संबंध संपुष्टात येतील . 

Friday 4 April 2014

ज्योतिष ---कृष्णमुर्ती ज्योतिष 

विवाह ----घटस्फोट -----पुनर्विवाह  ?

                          इंदोर  येथून एका अपरिचित महिलेचा मला फोन आला होता . ती म्हणाली मी नक्षत्राचे देणे या दिवाळी अंकामध्ये आपला लेख वाचला म्हणून मी आपणाला फोन करीत आहे . मला एक प्रश्न विचारावयाचा आहे मी म्हटले काय विचारावयाचे आहे . ती म्हणाली माझा पुनर्विवाह होईल का ? सध्या मी एका शाळेत  नोकरीला आहे . मी म्हटले आपली जन्मतारीख जन्मवेळ व ठिकाण ध्या . त्यांच्याकडून मी आवश्यक माहिती घेतली व दोन दिवसांनी फोन करा असे सांगितले . 
  जन्मतारीख  २६ / ४ /१९७० जन्मवेळ --पहाटे ४=१०  जन्मस्थळ -- अ १९,५४  रे  ७७ , ३५ यावरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . प्रथम आपण झालेल्या घटना तपासून पाहू -----
१)  विवाह ----१६ / १२ /२००४
२)  घटस्फोट ---३० / ९ /२००९
३)  संतती   ---- नाही 

कुंडली पहिली त्यावेळेचे एल , एस , आर  ,डि    दि -२२ / ३/२०१४ वेळ - २२=२२=३९
एल - शुक्र , एस - बुध , आर - मंगल , डी - शनि  , एल एस - गुरु 

१) पहिला विवाह १६ / १२ /२००४ रोजी झाला म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . एवढा उशीर होण्याचे कारण काय असेल ? हा प्रश्न मला पडला . मंगल शनि व हर्शल यांच्यामुळे विवाहाला उशीर होऊ शकतो . या पत्रिकेमध्ये सप्तमभावारंभी हर्शल आहे , तसेच वैवाहिक सौ ख्याचा कारक शुक्र नेपच्यून यांचा प्रतियोग आहे . हर्शल मुळे विवाहात अडथळे येऊ शकतात , किंवा ठरलेला विवाह मोडतो . तसेच शुक्र नेपच्यून प्रतियोग असल्यामुळे फसवणूक होऊ शकते . या कारणामुळे विवाहाल उशीर झाला असे म्हणता येईल . 
   सप्तमाचा सब शुक्र आहे . पत्रिका पहिली त्यावेळच्या एल , एस आर डी      मध्ये शुक्र आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे . शुक्राचे कार्येशत्व ----
 शुक्र ---
रवि ---१,२ क.यु 
शनि --२ , ११
शुक्र ---२ , ३ ,८

नियम --- सप्तमाचा सब २,७,११ / ५ , ८ या भावांचा कार्येश असेल तर २, ७ ,११ या भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशेत विवाह होतो . 
सप्तमाचा सब शुक्र  २ ,३ ८ ,११ या भावांचा बलवान कार्येश असून सुधा विवाह योग्य वयात झाला नाही चौथ्या पायरीचा शुक्र नेपच्यून प्रतियोग आणि हर्षल सप्तम भावारंभी म्हणून वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . विवाह झाला त्यावेळी चंद्र  / शनि  / बुध ११ / ११ /२००४ ते ७ / ३/ २००५ हि दशा चालू होती   चंद्र शनि व बुध यांचे कार्येशत्व ------
चंद्र ---१० का.यु                                           शनि ---२ , ११                                      बुध --- २ , ४
केतू ---६ र १ मं दृ २                                    शुक्र ----२ , ३ ,८                                  रवि ---१ , क यु 
राहू ---१२ , श २ , ११                                   मंगल ---२ , ३ क यु                              मंगल ---२ , ३ क यु
 राहू ---१२ , श २ , ११                                 चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु                         चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु 


अनुकूल     २ ११                                                 २ , ३ ,५, ८ , ९ , ११                        २ ,३ ,५ , ९ 
प्रतिकूल   १ , ६ ,१० ,१२                                          १०                                             १ , ४ , १०

दशा  २ ,३,५,८,९,११ या अनुकूल भावाबरोबरच १,४,६,१०,१२ या प्रतिकूल भावांची कार्येश आहे . 
२,३,५,८,९,११ या भावांचा कार्येश  ग्रहामुळे विवाह झाला आहे १,४,६,१०,१२ या भावांच्या कार्येश ग्रहामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक . त्यामुळे घटस्फोट कडे वाटचाल सुरु झाली .  ह्या महिलेला ३० / ९ /२००९ ला कायदेशीर घटस्फोट मिळाला .  त्यावेळी जातकाची चंद्र / शुक्र  / बुध दशा  चालू होती 
       १२ / ७ /२००९ ते   ७ / १० / २००९     चंद्र शुक्र बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

चंद्र   १० क यु                                   शुक्र -                                         बुध -- २ , ४
केतू --६ र १ मं दृ २                          रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १०         रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १०   
राहू ---१२ श २ , ११                         शनि ---२ , ११                              मंगल -- २, ३ क यु 
राहू ---१२ श २ , ११                         शुक्र ---२ , ३, ८                          चंद्र    ---९ , ५ १० क यु 

     ( १, ६, १० ,१२  )                                    ( ३ , १० )                                     ( १ , ३ ,४ , ९ ,१० ) 

नियम --- सप्तमाचा सब जेंव्हा १,४,६,१०,१२ भावांचा कार्येश असतो त्यावेळी वैवाहिक सौख्य नसते १,४,६,१०,१२ भावाबरोबर च ३ , ९ या भावांचा कार्येश ग्रहांची दह्सा येते त्यावेळी कायदेशीर घटस्फोट होतो  
सदर जातकाला चंद्र / शुक्र  / बुध या दशेमध्ये च १२ / ७ /२००९ ते ७ /१० /२००९ या कालावधीत घटस्फोट मिळाला आहे . 
  संतती --- जातकाला संतती झाली नाही . 
नियम --- पंचमाचा सब  २ ,५ ,११ या भावांचा कार्येश असेल तर २ ,५ ,११ या भावांच्या ग्रहदशेमध्ये संतती होते . हाच सब जर १,४,१० ,१२  या भावांचा कार्येश असेल तर संतती होत नाही किंवा गर्भपात होतात .
 (१) कुटुंब वृद्धीला विरोध , ( ४) गर्भ राहण्यास विरोध , ( १०) इच्छापूर्ती नाही , ( १२) संततीचे मृत्यू स्थान आहे . तसेच पंचमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वंध्या राशीत ( मेष ,मिथुन ,सिंह ,कुंभ )असेल तरसुधा संतती होत नाही .
         पंचमाचा सब राहू आहे राहू कुंभ या वंध्या राशीत व्यय स्थानात आहे . म्हणजे संततीचे मृत्यू स्थानात आहे . राहू स्वत:चे नक्षत्रात आहे . राहूचे कार्येशत्व ----
      राहू ---१२,श २,११
     राहू ---१२,  श २,११
     शुक्र ---
    रवि ---१,२ क यु
      ह्या ठिकाणी राहू २,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुधा त्याने संतती दिली नाही . कारण राहू जेंव्हा स्व नक्षत्रात असतो तेंव्हा तो ज्या स्थानात असतो त्या भावाची फळे जास्त तीव्रतेने देत असतो .  तसेच चौथ्या  पायरीला राहूच्या सब चा नक्षत्रस्वामी मेष या वंध्या राशीत आहे म्हणून संतती झाली नाही . सध्या जातकाचे वय ४४ वर्षे आहे . निसर्गनियमानुसार स्त्रियांचा मासिक धर्म वय वर्षे ४०-४५ पर्यंत बंद  होतो यापुढे हि संतती होणार नाही .
                                आता पुनर्विवाहाचा विचार करू
     नियम-- सप्तमाचा सब बुध असेल, बुधाच्या नक्षत्रात असेल, बुधाच्या युतीत असेल , बुधाच्या दृष्टीत असेल , किंवा द्विस्वभाव राशीत असेल किंवा  नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल  आणि २,११,८ या भावांचा कार्येश
असेल तर पुनर्विवाह होतो .
                                 सप्तमाचा सब शुक्र आहे ---
  शुक्र ---
 रवि ---१,२ क यु गु दृ ७,१०
शनि ---२,११
शुक्र ---२,३,८
                    शुक्र २,३,८,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे परंतु शुक्र वृषभ या स्थिर राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी रवि हा मेष   या चर राशीत आहे . याठिकाणी कोठेही बुधाचा किंवा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . म्हणून द्वितीय विवाह होणार नाही
                   आता दशा पाहू ---  कारण दशेचा  अधिकार स्वतंत्र असतो . सध्या मंगळाची दशा  चालू आहे . मंगळाचा नक्षत्रस्वामी चंद्र आहे . चंद्र २,६,१०,११,१२  भावांचा बलवान कार्येश आहे , २, ११ भाव अनुकूल आहेत पण ६,१०,१२ हे विवाह विरोधी आहेत म्हणून मी जातकाला स्पष्ट सांगितले तुमचा पुनर्विवाह होणार नाही .  पुन्हा अशीच स्थिती निर्माण होईल . कारण ज्योतिषाने फक्त सल्ला ध्यायचा असतो . सल्ला मानायचा कि नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहेच             .
                      आणखी खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडून १ ते २४९ यापैकी एक संख्याविचारून घेतली . त्यांनी ७५ हि संख्या दिली . त्या संखेवरून मी एक कुंडली तयार केली . ह्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब शनि आहे . शनि तुल या  चर राशीत आहे . व त्याचा नक्षत्रस्वामी गुरु मिथुन या द्विस्वभाव राशीत आहे . गुरु ३,५,७,१२  या भावांचा कार्येश आहे . नंबर कुंडलीनुसार एखादे प्रेमप्रकरण चालू असावे . असे वाटते . पण नंबर कुंडलीनुसार विचार केला तर सध्या बुधाची दशा चालु  आहे . बुध ३,७,११,६,८,१२ या भावांचा कार्येश आहे . ६,८,१२ हे भाव विवाह विरोधी आहेत . म्हनुन पुनर्विवाह होणार नाही असा सल्ला दिला . नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची . 

प्रा कोरडे पी आर
१४२, पद्मावातीनगर , फलटण
९६२३४७४६२७  / ९४०३८१२६२८

Monday 31 March 2014

लग्न शुद्धी भाग -२

                                                      लग्न शुद्धी भाग -१ मध्ये आपण जबलपूर येथील जातकाची जन्मवेळ निश्चित   केली आहे . त्यावरून कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली.
जन्मतारीख -१०/०१/१९७९ जन्मवेळ संध्याकाळी ७=२५=३९ ठिकाण --अथनेर बेतुल
आपल्याला खालील तीन घटना पडताळून पहावयाच्या आहेत .
१) नोकरीची तारीख --एप्रिल २००८
२) मोठी बहिण विवाह --७ डिसेंबर १९९६
३) वडील -मृत्यू      ----५ नोव्हेंबर २०११
   



त्या जर कृष्णमुर्ती नियमाच्या आधाराने बरोबर आल्या तर आपण जी जन्मवेळ निश्चित केली आहे ती बरोबर आहे असे म्हणता येईल .
१)     प्रथम आपण नोकरीची तारीख बरोबर येते का पाहू .

नियम --- दशमाचा सब २,६,१०,किंवा ११ या भावांचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येशाच्या दश काळात नोकरी लागते . या ठिकाणी नोकरी लागलेली आहे फक्त २,६,१०,११ भाव लागतात का ते आपणाला पहावयाचे आहे .
 नोकरी लागली त्यावेळी जातकाची गुरु महादशा बुध अंतर्दशे मध्ये चंद्राची विदशा चालू होती .
गुरु , बुध व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

 गुरु                                                 बुध --५,३                                       चंद्र ---११,१
शनि --२,७                                      केतू --८ श २,७                               मंगल --६,१० र यु ६
मंगल -                                           गुरु ----                                           गुरु ----
रवि ---६ मं यु ६,१०                         शनि ---२,७                                     शनि ---२,७
गुरु   २,६ ,१०   भावाचा, बुध २ भावाचा व चंद्र २,६,१०,११ भावांचा कार्येश आहे नियामाप्रमाणे याच कालावधीत नोकरी लागली आहे . असे म्हणता येईल .
२) थोरल्या बहिणीचा विवाह तारीख ---७ डिसेंबर १९९६
    सदर जातक धरून एकूण तीन भावंडे आहेत . जा सगळ्यात लहान आहे . जातकाला एक मोठा भाऊ आहे व सगळ्यात थोरली बहिण आहे .
लाभ स्थान वरून मोठ्या भावाचा विचार करतात बहिण थोरली आहे म्हणून लाभाचे लाभ स्थान म्हणजे नवमस्थान  बहिणीचे लग्नस्थान होईल   नवमस्थन लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे
बहिणीचा विवाह झाला त्यावेळी जातकाला राहू महादशा शुक्र अंतर्दश व चंद्राची विदशा चालू होती .
नियम --- २,७,११  / ५,८ या भावांच्या कार्येश काळात विवाह होतो .
राहू , शुक्र व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----

राहू  ---६, र १०                                               शुक्र                                                 चंद्र ---३,५
रवि ---१० मं यु २                                            शनि --६,११                                      मंगळ ---१०,२
रवि ---                                                           शुक्र --                                             गुरु ----
शुक्र --- ८                                                       शनि --६,११                                      शनि --६,११    

राहू महादशा ( २,८ )  शुक्र अंतर्दशा  ( ११ ) व चंद्र विदशा ( २,३,५,११ ) भावांची कार्येश होती . या कालावधीत विवाह झाला असे म्हणता येईल .
3) वडिलांचा मृत्यू - ५ नोव्हेंबर २०११--                             वडिलांचा विचार नवम स्थानावरून करतात . नावं स्थान हे वडिलांचे लग्न स्थान होईल . लग्न मीन आहे . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे . वडिलांच्या मृत्युच्या काळात जातकाची गुरु महादशा शुक्र अंतर दशा गुरु विदशा बुध सूक्ष्म दशा व केतू प्राण दशा चालू होती . या सर्व ग्रहांचे कार्येशत्व -------     गुरु                                      शुक्र                                     बुध--९,७                     केतू शनि --६,११                           शनि --६,११                          केतू १२ श ६,११             गुरु --४,१मंगळ                                  शुक्र     --                              गुरु --                           शुक्र--- रवि --१०,मं यु १०,२             शनि --६,११                          शनि --६,११                      शनि --६,११ ( २,६,१० )                            ( ६ )                                      ( ६,७,१२ )                       ( ४,६ )वडिलांचे मीन लग्न आहे म्हणजे लग्न द्विस्वभाव राशीचे आहे सप्तम स्थान मारक त्याच बरोबर बाधक आहे                गुरु ---२ ( मारक ),६ (रोग  / आजार ),१० ( लाभाचे व्यय )               शुक्र ---६ ( रोग  / आजार )               बुध -- ६ ( रोग / आजार  ),७ ( मारक  / बाधक ), १२ ( हौस्पीटल )               केतू --४ ( अंतिम यात्राचतुर्थ स्थान , बाधक स्थान , मारक स्थान, व्यय स्थान यांचा संबध येतो त्यावेळी व्यक्ती वाचण्याची शक्यता नसते . 
६ ( रोग  / आजार ) ६ ( रोग  / आजार )