कृष्णमूर्ति ज्योतिष: October 2014

Saturday 18 October 2014

इच्छित मुलाशी विवाह होईल का?

                                         वरील प्रश्न एका आईने आपल्या मुलीबद्धल विचारला आहे .मुलगी सुशिक्षित ,सुसंस्कृत घराण्यातील आहे . ती औरंगाबाद मध्ये नोकरी करीत आहे . तिचे एका मुलावर प्रेम आहे . मुलगा आमच्या जातीतला नाही . आमचा त्याला विरोध आहे . आम्ही उभयतांनी तिला खूप समजावून सांगितले . पण ती ऐकायला तयार नाही . ती म्हणते मी लग्न केले तर याच मुलाशी करेन . आम्हाला तिची खूप काळजी वाटते . कारण मुलगा शिकलेला आहे पण नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही . आता सध्या त्याला नोकरी नाही . म्हणून त्यांनी मला विचारले ह्याच मुलाशी तिचे लग्न होईल का? आणि एक के पी नंबर (९१) दिला . 

                                   के पी नंबर देताना सुधा प्रश्नाच्या अनुषंगाने दिला जातो . के पी नंबर ९१ मधील ९ आकडा मुलीचे पंचम स्थान ( प्रेम प्रणय ) दाखवितो व दोघांची बेरीज केली तर १० येते म्हणजे लाभाचे व्यय स्थान व मुलीच्या सप्तमाचे व्यय स्थान म्हणजे शष्ट स्थान . प्रश्नाचा रोख बरोबर आहे . 

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का ? या प्रश्नासाठी के पी नियम -----
सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसून , स्थिर राशीत असेल व  २,७,११ या
भावाचा कार्येश असेल तर २,७,११ या भवाच्या कार्येश ग्रहाच्या दशेमध्ये विवाह होतो .

मी कॉम्पुटर वर के पी नंबर ९१ प्रमाणे कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली .
                        दि ११ / ८ / २०१४ वेळ ७=४६=५८  स्थळ अ १७,५९ रे ७४,२६ .

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
सिंह लग्न म्हणजे स्थिर तत्वाची कुंडली आहे . चंद्र शष्ट स्थानात व्ययेश आहे ( चिंता , काळजी ) चंद्र मंगळाच्या नक्षत्रात मंगल मुलीचा पंचमेश ( प्रेम , प्रणय ) आणि व्ययेश . मंगल मुलीच्या लाभस्थानात
 ( तृतीय स्थानात ) म्हणजे  प्रश्नाचा रोख बरोबर आहे प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे .
                                           पंचम स्थान मुलीचे लग्न स्थान होईल . पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . मुलीच्या कुंडलीत सप्तमाचा ( मूळ कुंडलीचे लाभस्थान ) सब गुरु आहे  गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

गुरु ---८ कयू
शनि ---११,३
चंद्र ---२ बु दृ ८
मंगळ ---११,१२,५
                                                   साप्तमचा सब गुरु अष्टम भावारंभी आहे . गुरु कर्क या चर राशीत आहे . गुरूचा नक्षत्रस्वामी शनि लाभात तूळ या चर राशीत आहे . गुरूचा सब चंद्र द्वितीयात कुंभ या स्थिर राशीत आहे . पण सब त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी मंगल  यशाच्या चौथ्या पायरीवर लाभात तूळ या चर राशीत आहे ' याठिकाणी चार राशीचे प्राबल्य आहे म्हणून ह्या मुलीचा विवाह ह्याच मुलाशी होणार नाही असे सांगितले .
                                                 पंचमाचा सब गुरु आहे . गुरु सप्तमाचा कार्येश नाही म्हणजे  प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये  होणार नाही . त्यामुळे दश अंतर्दशा पाहण्याची आवशक्यता नाही .
                                               सप्तमाचा सब गुरु २,३,५,८,१२ या  भावांचा कार्येश आहे . यामधील ३,८,१२ मुळे त्यांच्यामध्ये वादविवाद , संघर्ष होऊ शकतो  व प्रेमभंग होण्याची शक्यता जास्त आहे . मुलगीच (१२) मुळे . माघार घेईल . सबब ह्या मुलाशी लग्न होणार नाही .

                    खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मुलीची जन्मपत्रिका मागितली .
   जन्म तारीख ---- २२ / ८ / १९९१         जन्मवेळ ----  २३-३८          जन्मस्थळ ---- अ १९,१०  रे ७३,०५
   त्यावेळेचे एल , एस , आर , डी
                      दि    ११ / ८ / ३४                   वेळ --१०-२२-३२

                              एल --बुध  / राहू , एस ---मंगळ  , आर --शनि  ,  डी ---चंद्र

सप्तमाचा  सब मंगळ आहे एल एस आर डी मध्ये मंगळ आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
मंगळाचे कार्येशत्व ---

मंगळ ---- ५. ७
रवि ----४ बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१
राहू ----८ , ९ क यु गु ४,१२
शु क र --४,१ बु यु ४,३,६,गु यु ४,१२, र यु ४

प्रथमदर्शनी मंगळ  पहिल्या पायरीला ५,७ या भावांचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह होईल असे वाटते पण दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या पायरीला मंगळ १,४,६,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे  .

तसेच पंचमाचा सब  राहू आहे --- राहू एल एस आर डी मध्ये आहे

राहूचे कार्येशत्व ----
राहू ----८,९
शुक्र ---४,१ बु यु ४,३,६गु यु ४,१२ र यु ४
शनि ---९,१०,११ चं यु ९
रवि ---४,बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१

                                       पंचमाचा सब राहू सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून प्रेमाचे रुपांतर प्रेम विवाहामध्ये होत नाही . पंचमातला मंगळ धाडसी पणा देतो . पण तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे हट्टीपणा मुले , अविचारामुळे व अविवेकीपानामुळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते . सबब सदर मुलीने हा विवाह करू नये . कारण पंचमाचा सब राहू , सप्तमाचा सब मंगळ १,४,६,८,१२ या विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे . तसेच सप्तमेश , सप्तमाचा सब मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे  हा मुलगा खोटारडाआहे .  किंवा याच्याकडून फसवणूक होऊ शकते .

                        हा प्रश्न मी ११ ऑगस्ट २०१४ रोजी सोडविला , गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजाऱ्याकडून कळले कि मुलगी नोकरी सोडून मुंबईला गेली आहे . ह्या दोन्घामध्ये काहीतरी बिनसले असावे असे वाटते . 

Monday 13 October 2014

पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल काय ?

                                          सध्या निवडणुकीचे वातावरण आहे . केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे . महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत . महाराष्ट्र मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत . प्रत्येक पक्ष आप आपली ताकद आजमावत आहेत . त्यामध्ये आजी - माजी आमदार आपले नशीब आजमावत आहेत काही ठिकाणी बंडखोरी होत आहे . काही पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . असेच एक ओळखीची व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली मी सुधा या शर्यती मध्ये आहे . मला XXX  पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल का ? मी म्हटले मनामध्ये पक्षातर्फे तिकिट मिळेल काय ? हा विचार करून , मन एकाग्र करून १ ते २४९ मधील एक संख्या सांगा . त्याने थोडा विचार करून १४९ हि संख्या सांगितली . 
        
        
        हा प्रश्न मी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ०८=०७=२१ वाजता अ १७,५९ रे ७४. २६ येथे सोडविला

                                       पक्षातर्फे तिकिट म्हणजे निवडणूक लढविण्यासाठी त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र  असते . पत्राचा विचार तृतीय स्थानावरून करतात . पत्र केंव्हा येईल ? बातमी केंव्हा पेपरमध्ये छापून येईल ? बातमी खरी कि खोटी , इच्छित फोन केंव्हा येईल ? जाहिरात पेपर मध्ये केंव्हा छापून येईल ? हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंव्हा होईल ? या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरून करतात . 


कृष्णमुर्ती नियम -- १) तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातर्फे तिकिट मिळेल . 


राजकारणामध्ये यश --- २) दशमाचा सब १,६,९,१०,११ या भावाचा कार्येश असून गुरु बुध मंगल शनि  इ . ग्रह दशमाचे कार्येश असतील तर राजकारणात यश मिळते . 


दशमाचा सब ६,१०,११ चा कार्येश असेल तर प्रगती होईल , आणि नवम (९) भावाचा कार्येश असेल तर प्रसिद्धी मिळेल . दश - अंतर्दशा संबंधित भावाच्या कार्येश असाव्यात . 


निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल का ? ----


३) लाभाचा सब लग्न  भावाचा कार्येश असेल तर निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल .

हि कुंडली वृश्चिक लग्नाची , स्थिर तत्वाची आहे ह्याचा अर्थ , आहे त्या स्थितीत बदल करू नये असे सुचित करीत आहे . 


मनातील विचार जुळतो का ते पाहू  -----


चंद्र मनाचा कारक  , चंद्र अष्टमात मिथुन राशीत , नवम भावारंभी . चंद्राची दृष्टी तृतीय स्थानारांभी .  चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे . म्हणजे प्रश्न बरोबर आहे . 



ह्या  कुंडली मध्ये तृतीयाचा सब शनि आहे शनीचे कार्येशत्व -----


शनि ---- 

गुरु ---- ९, २ 
बुध ----
मंगळ ----१,६ 

शनि लाभाचा कार्येश  होत नाही . म्हणजेच पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही . हे सांगता येते . 


तसेच पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होते का ते पाहू . 


लाभाचा सब केतू आहे,  केतूचे कार्येशत्व ----

केतू --- ५, गु ९,२ बुध ११
बुध ---११,राहू युती ११ के दृ ५ 
गुरु ---
बुध --११, राहू युती ११ के दृ ५ 

लाभाचा सब लग्नाचा कार्येश होत नाही म्हणजे पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होत नाही . 

पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही त्यामुळे निवडणुकीत यश मिळेल का हे पाहण्याचा प्रश्नच येत नाही . 
                                        
                                       संबंधित व्यक्तीला पक्षातर्फे तिकिट मिळाले नाही 

भविष्य काळात राजकारणात यश मिळेल का ? ते पाहू -----


दशमाचा सब राहू आहे ----


राहू --- ११, बुध बु यु ११ 

मंगळ ---१,६ 
गुरु ----
बुध ---११, राहू युती ११ के दृ ५ 

दशमाचा सब राहू १,६,११ या भावाचा बलवान कार्येश आहे  म्हणून भविष्य काळात राजकारणात यश मिळू शकेल .