कृष्णमूर्ति ज्योतिष: February 2019

Tuesday 26 February 2019

एका जातकाने फोनवरून प्रश्न विचारला  नवीन कंपनीत जाऊ का ?
के.पी. २२९
१८/२/१९ २१-१९-०६ phaltan

मिन लग्नाची कुंडली आहे.
रुलिंग   चंद्र* बुध बुध चंद्र चंद्र
Ruling मध्ये सर्व शीघ्र गतीचे ग्रह घटना लवकर घडणार आहे.
१० चा सब शुक्र आहे.
शुक्र...१०,३,८ श यू १०,११
शुक्र...१०,३,८,श यू १०,११
शनी...१०,११ शु यू १०,३,८
शुक्र...१०,३,८ श यू १०,११

शुक्र ३,१०,११,८ चा कार्येश आहे . १०,११ अनुकूल आहेत. ३ नोकरीत बदल सुचवीत आहे. ८ थोडे अडथळे  आहेत .
सर्वच ग्रह १०,११ चे कार्येश आहेत . भविष्य कालीन दृष्टीने चांगला आहे. पोस्ट आहे तीच आहे.
हा बदल केंव्हा घडेल ? दशा पाहू..
बुध शुक्र २६/६/१९ प.
बुध..
गुरु...९,१
गुरु...
बुध...१२,७,श दृष्ट १०,११

बुध १,७,९,१०,११,१२ च कार्येश

शुक्राचे कार्येश. ३,१०,११,८ वर काढलेच आहे.
बुध शुक्र केतू  ३०/६/१९ प.
केतू...११ क.यू
रवी...१२,६
राहू...४,५ क.यू चंद्र ५
गुरु...९,१

५,९,१२ बदल सुचवितो. ६,११ अनुकूल

आतापर्यंत ६,१०,११ भाव मिळाले , परंतु यामध्ये २ भाव कोठेच लागत नाही. २ भाव फक्त रवी dakhavito म्हणून रवी सूक्ष्म दशा घेतली.
बुध शुक्र केतू रवी १०/५/१९ ते १३/५/१९  या कालावधी त नोकरी लागेल.सदर जातकाला कंपनीचे आॅफर लेटर मिळाले आहे. सद्या नोटीस period चालू आहे.
पत्रिका मेलन

           गेल्या आठवड्यात  माझ्याकडे दोन पत्रिका आल्या. ह्या पत्रिका ज्यांच्या आहेत ते दोघांचे अफेअर चालू आहे पण अलीकडे दोघांमध्ये धुसफूस वाढली  आहे.छोटे छोटे वाद होत आहेत. म्हणून दोघांनी पत्रिका जुळते का ते पाहण्यासाठी मला दिल्या आहेत.प्रथम दोन्ही पत्रिकेची लग्न शुद्धी सब --चंद्र  संबंध पद्धतीने करून घेतली

मुलगी..
लग्नाचा सब शुक्र आहे
चंद्रा तुळ राशीत विशाखा नक्षत्रात . आहे.
या ठिकाणी लग्नाचा सब शुक्र व चद्रचा राशी स्वामी शुक्र च आहे म्हणून पत्रिका बरोबर आहे.
पत्रिकाजुळविताना मी दोन्ही पत्रिका स्वतंत्रपणे पाहतो.
मुलगी...
७ च सब शुक्र आहे
शुक्र...२
शनी...४,५,६,५ क.यू
गुरु...
रवी...१

शुक्र ३-४ पायरीला पूर्ण विरोधी आहे. म्हणजे हिच्या पत्रिकेत विवाहाची शक्यता खूप कमीच आहे.झाला तरी वैवाहिक सौख्य असमाधानकारक . पहिल्या दोन पायरीला २,५ चा कार्येश आहे परंतु ३--४ पायरीला पूर्ण अशुभ , विरोधी भाव आहेत

मुलगी...
५ चा सब केतू आहे
केतू..
मंगळ..१०,८
बुध...२
गुरु...१२,७

मुलीच्या पत्रिकेत ५ चा सब७ चा कार्येश आहे तसेच ७ चा सब ५ कार्येश आहे.हिच्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग्य आहेत असे म्हणता येईल . त्याच बरोबर पंचमच सब मंगळाशी संबंधित असून ८,१२ शी संबंधित आहे म्हणजे सर्वस्व स्वाहा केल्याचे संकेत देतात.
मुलगी...
लाभाचा सब जर ७ चा कार्येश असेल तर वैवाहिक सौख्य चांगले असेल इथे  लाभाचा सब शुक्र च आहे शुक्र ७ चा कार्येश नाही.
म्हणजेच वैवाहिक सौख्य असमाधान काराक असणार.
आणि ते ७ च्या सब ने दाखविले आहेच.

आता मुलाची पत्रिका पाहू

या ठिकाणी लग्नाचा सब. शुक्र आहे चंद्रा कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे. लग्नाचा सब व चंद्र यांचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. ह्या पत्रिकेचे BTR केले पाहिजे. म्हणून मी जन्मवेळ ४ मी.२० से. ने वाढविली त्यामुळे लग्नाचा सब रवी येतो. आणि चंद्र रवी ननक्ष्ट्रत आहेच अशाप्रकारे सब व चंद्राचा संबंध प्रस्थापित झाला .
आता ७ च सब पाहू तो आहे शुक्र
शुक्र...१२,८
शनी...११
गुरु...
केतू...३, बू १२,४,७
शुक्र ३-४ पायरीला ३,७ च कार्येश आहे.
एकूण ३,७,११ अनुकूल व ४,१२ प्रतिकूल
परंतु यात ६ स्थान नाही. आणी विवाहासाठी ६ स्थान असूच नये.
आता ५ च सब बुध आहे
बुध...१२,४,७
शनी...११
बुध...१२,४,७
शनी...११

याठिकाणी ५ च सब ७ च कार्येश आहे पण ७ च सब ५ कार्येश होत नाही. म्हणून हा प्रेम विवाह होणारं नाही.
मुलाच्या पत्रिकेत ११ चा सब बुध आहे व तो ७ चा कार्येश आहे हे आपण आताच पहिले आहे मुलाचे वैवाहिक सौख्य चांगले आहे. परंतु मुलीचे वैवाहिक सौख्य चांगले नाही.मुलाच्या पत्रिकेत पंचमाचा  सब बुध  आहे . बुध हा ग्रह मुळातच द्वित्व  दाखविणारा आहे . आणि १२ शी संबंधित आहे म्हणजे विवाहानंतर सुद्धा याचे दुसरीकडे संबंध असू शकतील .
आता मला सांगा मुलीने हा विवाह करावा  का ? वरील सर्व कारणाने पत्रिका जुळत नाहीत असे सांगितले .

आपला अभिप्राय द्यावा

शुभम भवतु 

Monday 25 February 2019

विवाह --वैवाहिक जीवन
                                                जवळजवळ ९९ टक्के लोकांचे विवाह होतात. पण सर्वांचे वैवाहिक सौख्य समाधानकारक असतेच असे नाही. वैवाहिक सौख्य समाधानकारक म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या काय होऊ शकेल ? वैवाहिक सौख्य यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो.? मला वाटते यामध्ये एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, समजूतदारपणा , एकमेकांवरील विश्वास , एकमेकांबद्धलचे आकर्षण , प्रेम, एकमेकांबध्दल वाटणारी आस्था, आत्मीयता लैंगिक  सौख्य, निष्ठा , विचारांचे स्वातंत्र्य  विचारांची देवाणघेवाण , सुसंवाद यासगळ्यांचा परिपाक म्हणजे वैवाहिक सौख्य . फेसबुकवर पदार्पण केल्यापासून एक गोष्ट लक्षात आली . ५० टक्के लोकांचे वैवाहिक सौख्य याबदल  समस्या आहेत. याची करणे सुद्धा खूप असू शकतील  सद्याच्या काळात विवाहाचे प्रकार वेगवेगळे दिसून येतात या मध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज , लिव्ह इन रिलेशनशिप,यामध्ये जबाबदारी टाळण्याकडे प्रवृत्ती दिसून येते . यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आहे .
              सर्वच पालक मुलामुलींचे शिक्षण संपले , नोकरीमध्ये स्थिर स्थावर झाले कि वधू --वर संशोधनाला सुरुवात करतात. वधू -वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवितात . नाव नोंदविले कि स्थळे यायला सुरुवात होते.
बऱ्याच वेळा असे घडते कि कधी पत्रिका जुळते , मुलगा मुलगी पसंत पडत नाहीत, कधी पसंती झाली तर पत्रिका जुळत नाहीत. हल्ली मुलांपेक्षा मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत . त्यातूनही मुलींच्या  Biodata मध्ये अपेक्षा या सदरात एक शब्द आवर्जून लिहिलेला असतो तो म्हणजे  Well Settled . मुली असा विचार करत नाहीत कि त्यांचे वडील त्यांच्या विवाहाच्या वेळेला well settled होते का ? आज पालकवर्ग सुद्धा सासरी मुलीला कोणत्याच प्रकाराचे कष्ट पडू नयेत म्हणून संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता करतात . सद्याच्या काळात  स्त्री पुरूष समान  धरले जातात  . आणि हे असलेही पाहिजे. पालक म्हणतात आमच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण नगण्य होते . त्या काळात स्त्रीची दोनच कर्त्तव्य होती  चूल आणि मूल . आता काळ बदलला आहे . लोंकाच्या गरजा  वाढल्यात . एकाच्या पगारात भागात नाही . स्त्रियांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे .  . त्यामुळे तिच्या अपेक्षाही वाढल्या आहेत . अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकरी करण्याकडे कल  वाढत आहे . असे असून सुद्धा स्त्रीवर अन्याय होताना दिसून येतो .  यात पुरुषांचा अहं आडवा येतो. दोघे ही नोकरी करत असतात. कोणाचे कोणावाचून अडत नाही . ह्या विचारला जेंव्हा बळकटी प्राप्त होते तेंव्हा त्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे घटस्फोट .घटस्फोट झाल्यानंतर खंबीरपणे उभे राहणाऱ्या स्त्रियांचे  प्रमाण खूप अल्प आहे. कारण घटस्फोटित स्त्री कडे समाज वक्र दृष्टीनेच पाहत असतो . हे बदलणे काळाची गरज आहे .
                              मी  कृष्णमूर्ती ४ स्टेप  थेअरीने पत्रिकेचे विश्लेषण करतो. कृष्णमूर्ती पद्धती ( ३ स्टेप ) नुसार बऱ्याच वेळा विवाह होईल असे वाटते परंतु होत नाही , याचे कारण ४-स्टेप पद्धती मधून कळते . आतापर्यंत ३-४ पायरीला विरोधी भावाचे कार्येशत्व असेल तर बहुतेक वेळा विवाह होत नाही असे मी आजपर्यत समजत होतो. परंतु काही अशाही कुंडल्या पाहण्यात आल्या कि विरोधी भाव असताना सुद्धा  विवाह झाले आहेत.विवाह करणे हे उद्दिष्ट नसते तर तो पुढे २५-३० वर्षे टिकावा हे महत्त्वाचे असते .  विवाह झाला आणि दोन महिन्यात, सहा महिन्यात, किंवा वर्ष दोन वर्षात मोडला  तर त्याला विवाह झाला असे म्हणता येईल का ?

           

वैवाहिक सौख्य....
                                       कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ७ चा सब २,७,११,५,८ भावाचा कार्येश असेल तर विवाह होतो पण याचे विरोधिभाव  असतील तर  म्हणजे १,४,६,१०,१२ विवाह होत नाही असे आत्तापर्यंत आपण म्हणत आलो आहोत. परंतु माझ्याकडे अशा काही कुंडल्या आहेत की विरोधी भाव असताना सुधा विवाह झाले आहेत परंतु त्यांच्या नशिबात वैवाहिक सौख्य नाही. काहींचे विवाह झाले नाहीत. बऱ्याच वेळा असे आढळून येते की विवाहाचे योग असताना सुधा विवाह होत नाही यामध्ये आपले काहीतरी चुकत असावे किंवा जातकाकडून  तसे प्रयत्न होत नसावे. याठिकाणी प्रयत्न आणि प्रारब्ध यांची सांगड घातली पाहिजे असे मला वाटते. आपण एखाद्याला सांगितले की अमुक काळात योग आहेत आणि त्यादृष्टीने त्याने प्रयत्न केलेच नाहीत तर आपल्या सांगण्याला काहीच अर्थ राहत नाही.मी ज्या कुंडल्या पहिल्या त्या खालीलप्रमाणे ....

( गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख ,वेळ दिली नाही )
एक कुंडली...

७ चा सब शनी रुलिंग  प्रमाणे शनी बरोबर आहे.
शनी..८,१२,र यू ८,६
शनी...८,१२ र यू ८,६
बुध...९,४,९ क.यू ३
बुध...९,४,९ क.यू. ३

या पत्रिकेत ७ च सब ४,६,८,१२ या प्रतिकूल भावाचा कार्येश आहे त्यातल्यात्यात ३,९ भाव दुय्यम आहेत.तरीसुद्धा हिचा विवाह झाला आहे. एक मुलगा पण आहे.परंतु नवऱ्याचे पूर्ण दुर्लक्ष .  पती पत्नी मध्ये संवाद असा फारसा होतच नाही.वैशिष्टय म्हणजे विवाह झाला त्यावेळी २,७,११,५,८ हे भाव अनुकूल होते त्याच बरोबर ४,६,१२ हे भाव पण होते.मी एवढेच म्हणालो तुम्ही स्वतः चे अर्थार्जन पाहा. तिचे शिक्षण झाले आहे.  तुम्ही नोकरीचे प्रयत्न करा.  थोडाफार तरी संसाराला हातभार लावत येईल. ही स्त्री काही काळ  माहेरी होती. परत सासरी आली .कारण माहेरी थांबून तरी काय करू आई वडील थकले आहेत. भाऊ , भावाचा संसार तो किती साथ देईल याबद्दल शंकाच आहे आणि शिवाय समाज माझ्याकडे वक्र दृष्टीनेच पाहणार. म्हणून सासरी आले निदान मुलाला तरी आधार मिळेल.
उदा.२
७ चा सब गुरु
गुरु रुळींग प्रमाणे  बरोबर आहे .
गुरु...
शुक्र...५,१०,११,६ क.यू
शुक्र...६ क.यू
चंद्र...६

या पत्रिकेत ३-४ पायरीला  ६ हा भाव पूर्ण विरोधी आहे. तरी सुधा हिचा विवाह झाला आहे.
एक मुलगा  आहे.नवरा एका दुकानात कामाला आहे.  हा कधी पैसे देतो कधी देत नाही. ८-८ दिवस ही व्यक्ती बाहेर जाते कोठे जाते माहीत नाही. पती पत्नी मध्ये संवाद शून्य. . कामावरून घरी आला की मोबाईल वर बोलत असतो . . माझ्याकडे , मुलाकडे अजिबात लक्ष नसते.ही शिकलेली आहे , ट्युशन घेते आणि संसार चालवत असते.
उदा..३
स्त्री..वय वर्षे ४०
रूलिंग....शनी*, गुरु मंगळ, बुध रवी
७ चा सब बुध
बुध...१०,४,११ क.यू
रवी..१०,६
बुध...१०,४,११ क.यू
रवी..१०,६

३-४ पायरीला पूर्ण विरोधी भाव , विवाह नाही. सप्तम भावारंभी प्लूटो.
ही म्हणते मला विवाह करायचा आहे. आता मी काय सांगू हिला.?
मी तिला सांगितले विवाहाचा विचार सोडून द्या. होण्याची शक्यता फार कमी आहे. स्वतः चे अर्थार्जन पाहा.
या पूर्वी तिने अनेक नोकऱ्या केल्या आहेत.



उदा..४
स्त्री..
 हिने एका मुलाबरोबर परस्पर  नोंदणी पद्धतीने विवाह केला. काही  दिवसात मुलाकडील  लोकांनी   कायदेशीररित्या मुला मुलीला वेगळे केले. त्यानंतर हिच्या घरच्यांनी  नात्यात च हिचा विवाह केला . परंतु नवरा नपुसंक . ही म्हणते मी काय करावे आता . ती माहेरी निघून आली.
७ चा सब गुरु आहे रुलिंग  प्रमाणे बरोबर आहे.
गुरु..
शुक्र..१०,६,७,११
शनी...४ क.यू.
शनी...४ क.यू.

गुरु ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी आहे तरी सुधा विवाह झाला आहे.परंतु वैवाहिक सौख्य नाही.

उदा..५
ही पत्रिका२०१२ ला माझ्याकडे आली.  पालक म्हणाले माझ्या मुलीचा विवाह योग केंव्हा आहे ?
या पत्रिकेत ७ चा सब गुरु आहे
गुरु...
बुध...८,११
बुध...
शनी...४,६
गुरु ३-४ पायरीला  पूर्ण विरोधी भावाचा कार्येश आहे . त्यामुळे आज पर्यंत विवाह झाला नाही.

उदा..६
या पत्रिकेत ७ चा सब शनी आहे
शनी...४,११,१२,५ क.यू चंद्र दृष्ट ४
शनी...४,११,१२,५ क.यू चंद्र दृष्ट ४
केतू...
रवी ...६

शनी ३-४ पायरीला पूर्ण विरोधी आहे. याला सबची प्रतिकुलता म्हणतात. विवाह झाला नाही.

उदा. ७
या पत्रिकेत लग्नाचा सब  केतू आहे . चंद्राचा नक्षत्र स्वामी केतूच आहे म्हणजे पत्रिका बरोबर आहे
सप्तमाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व ....
PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 12       Rashi-Swami Mercury 2   1 4
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   7 (10)
It's Sub :------------ Jupiter:- 2   7 10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (12)      Rashi-Swami Mercury (2)   (1) (4)
Itself aspects :------ 7

केतू मिथुन ह्या द्विस्वभाव राशीत आहे . मिथुन रास  हि वंध्या रास आहे . केतू गुरूच्या नक्षत्रात आहे, गुरूच्या सब मध्ये आहे . गुरु सिंह ह्या वंध्या राशीत आहे . ज्यावेळी विवाहाचा संबंध वंध्या राशीशी येतो त्यावेळी विवाह एक तर होत नाही किंवा वैवाहिकसौख्य  नसते . केतू १,२,४,१०,१२ या भावाचा कार्येश आहे . यातील २ भाव अनुकूल म्हणून विवाह झाला आहे 
भाव २ बरोबर १,४,१०,१२ हे विरोधी भाव सुद्धा कार्यान्वित झाले आहेत व केतू वर नेपच्यून ची दृष्टी आहे . सद्य हिची घटस्फोटाची केस चालू आहे हीच दुसरा विवाह होईल का .? सप्तमाचा सब हा बुधाशी ,अथवा द्विस्वभाव राशीशी संबंधित असेल आणि २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होईल . येथे ७ चा सब केतू मिथुन ह्या  बुधाच्या  द्विस्वभाव राशीत  आहे म्हणून दुसरा विवाह होऊ शकतो . दशेमध्ये २,८,११ हे भाव असावेत
चंद्र मंगल शनी २, ८ भावाचे कार्येश आहेत चंद्र मंगल डिसेम्बर २०२० पर्यंत आहे व चंद्र शनी ऑक्टोबर २०२३ ते मे २०२५ या कालावधीत होऊ शकतो . चंद्र केतू नक्षत्रात व केतूवर नेपच्यून ची दृष्टी . शनी  व प्लूटो मधे ७२.अंशाचे अंतर आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक राहील.
या सर्व कुंडल्यांचे विश्लेशन पाहता ३-४ पायरीला जर अशुभ  भाव  असतील तर विवाह होत  नाही किंवा  झालाच तर वैवाहिक सौख्य असमाधानकारक असते असेच सिद्ध होते 
                    एक उच्च पदस्थ अधिकारी , माझ्याकडे आले होते. म्हणाले मी माझ्या मुलाचे विवाहासाठी प्रयत्न करीत आहे.आतापर्यंत खूप मुली पाहिल्या. पण कोठेच जमून आले नाही.मी मुलाची पत्रिका पहिली. त्यावेळी लक्षात आले पत्रिकेत विवाहाचा योग च नाही.आता काय सांगावे हा प्रश्न मला पडला. मी म्हटले विवाहाचे योग खूप कमी आहेत. खूप प्रयत्नांनी विवाह.मी म्हटले मुलाला माझ्याकडे पाठवा. फक्त तुम्ही आग्रह करू नका. त्याच्या मनात असेल तरच त्याने यावे. त्या दिवशी मुलगा आला नाही, दुसऱ्या दिवशी पण आला नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याने मला फोन केला . माझी appointment घेतली. रात्री ८ वाजता आला. मी विचारले तू का आलास तेंव्हा तो म्हणाला मला मनातून वाटत होते म्हणून मी आलो. बरं,ठीक आहे. तुला काय विचारायचे आहे, तो म्हणाला मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. मी म्हटले मी एकाच प्रश्नाचे उत्तर देणार. कारण समस्या खूप असतात पण प्राधान्यक्रमाने कोणता प्रश्न सोडवावा हे तू ठरवायचे. त्याने मला विचारले माझी ध्यान धारणा साधनेत  प्रगती होईल का ? त्यावेळी मी त्याला म्हणालो ज्यावेळी मी तुझी पत्रिका पहिली त्यावेळी तुझ्या पत्रिकेत विवाहाचे योगच नव्हते. म्हणून तुला पाठवायला सांगितले. त्यावेळचे कोडे आता सुटले. परत तो म्हणाला मी विवाह सुधा करणार. मी म्हटले ती मुलगी सगळे सोडून तुझ्यासाठी येणार ,तू तिला साधना कशी  करायची ते शिकविणार का तिला प्रवचन एकावणार. तर म्हटला मी तिच्यासाठी सुधा वेळ देणार. आता मला सांगा अशाप्रकारचा  विवाह किती यशस्वी होईल ? याबाबत मला शंका आहे.

       पालक जेंव्हा अशा प्रकारच्या पत्रिका घेऊन येतात. तेंव्हा काय सागायचे हा प्रश्न सर्वच ज्योतिषांना पडतो.त्यांना स्पष्ट सांगितले तर ते पटणार नाही. ते म्हणतात आमच्या मुला / मुलींमध्ये काय कमी आहे रंग रूप ,आहे, शिक्षण आहे, MNC कंपनीत नोकरी आहे. विवाहानंतर ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी त्यांना ज्योतिषाने सांगितलेले आठवते..
मला एवढेच म्हणायचे आहे मुला/ मुलींच्या पत्रिकेत विवाह योग नसतील तर ..... ही वस्तुस्थिती पालक वर्ग स्वीकारतील का ?
शुभम भंवतू!!!


Sunday 17 February 2019

---कुंडलीची सत्यता -- चंद्र-- उपनक्षत्र  संबंध 

                             रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे.हे प्रत्येकाला लाभेल च असे नाही. आणि रुलींग प्लॅनेट कशासाठी घेतात  तर संबंधित भावाचा सब निश्चित करण्यासाठी. संबंधित भावाचा सब रुळिग मध्ये असेल तर आपण म्हणतो कुंडली बरोबर आहे.पण  संबंधित भावाचा सब रूलिग मध्ये नसेल तर आपण पुढचा किंवा मागचा सब घेवून वेळ निश्चित करतो. नवीन वेळेनुसार  कुंडली तयार करून प्रश्न सोडवितो.  पण रुलिग प्लॅनेट हे सगळ्यांनाच लाभणार का ? तर त्याचे उत्तर  नाही. कारण ते दैवी मार्गदर्शन आहे.
मग अशावेळी कुंडली ची सत्यता कशी पडताळून पहायची.?
तर कुंडलीची लग्नाशुधी करणे.
 चंद्र -उपनक्षत्र  संबंध  थिअरी प्रमाणे .
१) जातकाच्या कुंडलीतील लग्न भावाचा सब हा त्याच्या चंद्राचा  राशिस्वामी किंवा नक्षत्र स्वामी असावा
२) लग्नाचा सब चंद्राच्या राशीत  अथवा नक्षत्रात असावा
३)लग्नाचा सब चन्द्राच्या युतीत अथवा दृष्टीत असावा
४) लग्नाचा  सब आणि चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी तिसऱ्या ग्रहाच्या माध्यमातून संबंधित असावा

उदा....
समजा लग्ना च सब गुरु आहे तर चंद्राचा राशी स्वामी किंवा चंद्रा नक्षत्रस्वमि गुरु असावा.
किंवा चंद्र गुरु युतीत अथवा दृष्टीत असावा किंवा गुरु चंद्राच्या नक्षत्रात किंवा चंद्राच्या कर्क राशीत असावा असं असेल तर कुंडली बरोबर.पण असे नसेल तर वेळ (+)(-) करून सब बदलला पाहिजे. कारण त्यादिवशी चा राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी निश्चित असणार आहे म्हणजे आपल्याला लग्नाचा सब च बदलावा लागेल.
एखादे जातक ची कुंडली आपण रुलिंग  नुसार निश्चित केली आणि पुन्हा तोच जातक वेगळ्या कारणासाठी आपण कडे आला आणि जर त्यावेळी संबंधित भावाचा सब जर रुलिंग मध्ये जुळला नाही तर पुन्हा त्याची वेळ बदलावी लागेल. असे करणे कितपत योग्य ठरेल.?
.म्हणजे एकाच कुंडलीच्या  दोन वेग वेगळ्या वेळा होतील.म्हणून मला वाटते लग्न शुढी करणे सर्वात उत्तम . आणि एकदा लग्न शूधी केली पुन्हा सब निश्चित करण्याचा प्रश्न येणार नाही . जो सब आहे त्याप्रमाणे प्रश्न सोडवावा.
.त्यात अजून बारकावे पाहता येतील.ज्यावेळी जातक आपल्याकडे प्रश्न विचारायला येतो. त्याचे जन्म टिपण ,तसेच त्याच्या पत्नीचे ,संतती असेल तर संततीचे जन्म टिपण घ्यावे.  वर सांगितल्याप्रमाणे प्रथम जातकाच्या पत्रिकेची लग्न शुध्दी करावी . नंतर त्याच्या पत्रिकेत सप्तमाचा सब त्याच्या पत्नीच्या चंद्राशी वरील प्रमाणे संबंधित असावा. तसेच त्याच्या पत्रिकेतील पंचामाचा सब त्याच्या संततीच्या चंद्राशी संबंधित असावा.जर जातकाचे  लग्न च झाले नसेल तर त्याच्या आई वडिलांचे जन्म टिपण घ्यावे. जातकाच्या चातुर्थाचा सब आई च्या चंद्राशी संबंधित असावा . व जातकाच्या पत्रिकेतील नवमाचा सब  हा वडिलांच्या चंद्राशी संबंधित असावा.किंवा लहान मोठं भाऊ बहीण यांच्या पत्रिका घ्याव्यात . जातकाच्या पत्रिकेतील लाभाचा सब हा जातकाच्या मोठ्या भावाच्या चंद्राशी संबंधित असावा . तसेच त्रितियाचा सब जातकाच्या लहान भाऊ बहिणीच्या चंद्राशी संबंधित असावा . अशाप्रकारे कुटुंबातील एकाची कुंडली कुटुंबातील इतर सदस्यांशी कनेक्टेड असली पाहिजे .
                          फक्त प्रश्न असा येतो हे सगळे करण्यास वेळ खूप लागणार आणि जातक इतका वेळ थांबणार का ? किंवा  दोन दिवसांनी जातकाच्या पत्रिकेची लग्न शुद्धी करून , इतरांशी कनेक्ट झाल्यानंतर, प्रश्न सोडवावा

शुभम भवतु