कृष्णमूर्ति ज्योतिष: August 2022

Wednesday 10 August 2022

मेडिकल प्रवेश ---

                              फेसबुक वरील लेख वाचून एका पालकांचा फोन ..... माझ्या मुलीने आता NIIT  ची परीक्षा दिली आहे . तिला मेडिकल जाण्याची खूप इच्छा आहे  आणि तिला खात्री वाटते तिला प्रवेश मिळेल. तरीसुद्धा मनात थोडी धाकधूक वाटत. आहे . ऍडमिशन  मिळेल कि नाही . प्रवेश  नाही मिळाले तर रिपीटेशन क्लास ला बसता येणार नाही. . सद्य रिपीटेशन चे क्लास सुरु झाले आहेत. मी विचारले रिपीटेशन क्लास म्हणजे काय ? म्हणाले ज्यांना NIIT परीक्षेत स्कोअ र होणार नाही असे वाटते.अशा मुलांचे पुढील वर्षासाठी क्लासेस  आतापासून  सुरु करतात. प्रवेश  मिळणार नसेल तर पुढील वर्षासाठी रिपीटेशन क्लास जॉईन करता येईल. ( म्हणजे पुन्हा फी भरायची ६०-७०,०००)

मी म्हटले मुलीकडे फोन द्या . मी हा प्रश्न नंबर कुंडलीनुसार सोडवायचे ठरविले. मुलीला  थोडक्यात नंबर कुंडली बदल माहिती सांगितली . मला मेडिकल प्रवेश मिळेल का ? असा विचार मनात करून  १ ते २४९ या मधील कोणतीही संख्या सांग . संख्या लकी नंबर असू नये.  . तिने ६५ हि संख्या सांगितली .  के.पी नंबर ६५ यावरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडल तयार केली . 

नियम--- ४ त्या भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी  , लाभाचा (११) कार्येश असेल   त्याच बरोबर लाभाचा (११) सब ४ त्या भावाचा कार्येश असेल तर प्रवेश मिळे.ल . दोन्ही नियम लागू होत असतील तरच  प्रवेश मिळेल. ४ त्या भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा . ४ थ्या  भावाचा सब वक्री असला तरी चालेल ,फक्त त्याचा नक्षत्र स्वामी वक्री नसावा . ४थ्या  भावाचा सब वक्री  ग्रहाच्या नक्षत्रात असून  आणि लाभाचा कार्येश असला तरी प्रवेश मिळत नाही . 

दि --८ / ८ /२०२२   वेळ--१२=०५-५७

हि कुंडली कर्क लग्नाची आहे . ज्यावेळी कुंडलीचे कर्क लग्न असते त्यावेळी होकारार्थी उत्तर द्यावे असा एक संकेत आहे . पण हा शॉर्टकट झाला. प्रत्यक्षात कुंडलीवरून काय येते ते पहिले पाहिजे . म्हणून मी कुंडली पाहायला सुरुवात केली . नियमानुसार ४ थ्या भावाचा सब गुरु आहे आता गुरु वक्री  आहे . एक निरीक्षण ज्यावेळी शिक्षणासंबंधी प्रश्न असतात गुरु किंवा बुध ची उपस्थिती असते . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

गुरु-- 

शनी(व)---८ , ७ , ८ क.यु दृष्टी २ , १० , 

राहू--१० , मंगल १० ,दृ चंद्र ५ ,६ क यु दृ २

शुक्र ---१ , ११

गुरु २,५,६,७,८,१० ११ चा कार्येश आहे गुरु ११ भावाचा कार्येश आहे परंतु गुरु स्वतः वक्री असून शनी ह्या वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे . 

लाभाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ----

राहू--१०,११ क .यु मंगळ १०, दृ चंद्र ५

शुक्र --१, ११, दृ ७

शनी---८ क यु 

मंगळ ... १०, दृ चंद्र ५,, ११

लाभाचा सब राहू ४ चा कार्येश नाही .

सबब ह्या मुलीला मेडिकल ला प्रवेश मिळणार नाही. हे खात्रीपूर्वक सांगता येईल .( नियमानुसार ) पुन्हा पुढील वर्षी प्रयत्न करावा . असे सांगितले . अद्याप प्रवेश सुरु झाले नाहीत. घोडे मैदान जवळच आहे . प्रवेशासंबंधी कळले कि आपणाला कळवीनचं . असो .... खरे तर असे प्रश्न ज्योतिषाच्या माध्यमातून सोडवावेत का ? उत्तर होय आले तर ठीक आणि उत्तर नाही आले तर मुलगा मुलगी , चे मानसिक खच्चीकरण होऊ शकते . त्यांना टेन्शन येते. अशी मुले डिप्रेशन  मध्ये गेली  तर लवकर उभारी घेत नाहीत. कारण हल्लीच्या मुलांच्यामध्ये सहनशीलता खूप कमी आहे . तिने जी संख्या  सांगितली ती म्हणजे ६५. या संख्येतून काय अर्थ बोध होतो. ६ भावावरून रोग आजार चा बोध होतो. ५ यावरून औषधोपचार आणि दोघांची बे रीज केली तर ११ येते म्हणजे इच्छापूर्ती. सादर जातकाची मेडिकल ला जाण्याची खूप इच्छा आहे असे दिसते. आता थोडा वेगळा विचार केला तर -- NIIT  परीक्षा हि एक स्पर्धा परीक्षा च आहे . ६५ या संख्येवरून ---सुरवातीला ६ हि संख्या आहे म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर विजय असे म्हणता येईल . परंतु त्यानंतरचा ५ हि संख्या समोरच्याला लाभदायक राहील. थोडक्यात काय  तर प्रवेश मिळणार नाही .. अजून एक ह्या मुलीची MBBS  ला च जाण्याची आहे . ४ भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी स्थिर राशीत असेल तर MBBS  ला ऍडमिशन मिळेल. पण याठिकाणी ४ चा सब गुरु मिन राशीत व त्याचा नक्षत्र स्वामी शनी मकर राशीत आहे मिन रासं  द्विस्वभावी व मकर हि रास चर तत्वाची आहे येथे कोठेही स्थिर राशीचा संबंध आलेला नाही

. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट ला मी सांगितले प्रवेश मिळणार नाही. ७ सप्टेंबर ला निकाल लागला त्यात तिला खूपच कमी मार्क मिळाले . एम बी बी एस ला ऍडमिशन मिळणार नाही ह्याची तिला खात्री झाली . पुन्हा तिने प्रयत्न करायचे ठरविले आहे .  .  महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु  !!!

Tuesday 9 August 2022

            नोकरी ---

                        एक स्त्री ..नर्स आहे. आतापर्यंत खाजगी हॉ स्पिटल मध्ये १०-१२ वर्षे नोकरी केली. खाजगी हॉस्पिटल मध्ये १०-१२ तास काम करावे लागत होते त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होत होते घराच्या लोकांसाठी पाहिजे तेव्हढा वेळ देता येत नव्हता. . एक मुलगा आहे . त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हते , म्हणून तिने नोकरी सोडून दिली. एक दोन महिने घरी थांबली सकाळचा वेळ घरकामामध्ये जात होता. पण दुपारी काहीच काम नव्हते. म्हणून पुन्हा तिने नोकरी करण्याचा विचार केला  माझ्याशी संपर्क केला . मला म्हणाली मला सरकारी नोकरी केंव्हा लागेल. ? मी  तिच्या बर्थ डिटेल्स वरून नोकरी केंव्हा लागेल ते सांगितले . त्या प्रमाणे तिला  नगरपालिकेचा कॉल आला .तिची निवड झाली आणि कल्याण ( मुंबई ) ला नोकरी सुरु झाली . प्रश्न पुढेच आहे .मुळची ती पुण्याची पण नोकरीसाठी तीला  डोंबिवलीला राहावे लागत होते . . ती राहते डोंबिवलीला आणि नोकरी आहे कल्याणला . डोंबिवली ते कल्याण हा प्रवास आहे  .  प्रवासाची दगदग फार होत होती.  , नोकरीचे आठ तास पुन्हा पाहिल्यासारखेच होत होते . यापूर्वी तीने पुण्यात मुलाखाती दिल्या होत्या . परंतु त्यानंतर तेथील काही कळले नव्हते . अचानक एक दिवस पिंपरी चिंचवड पालीकेचा मेल आला . आपली निवड झाली आहे सात दिवसाच्या आत हजर व्हावे . आता तिच्यापुढे प्रश्न निर्माण झाला .कल्याणची  नोकरी सोडून पुण्याला जावे का . ? एक तर पुण्याला गेले तर प्रवास एक दीड तासाचा होणार आहे . मुलगा मंचरला असतो तेथून एक दीड  तासात पुण्याला येता  येत होते . घराकडे हि लक्ष देता येत होते . मुलांसाठी वेळ देता येणार  होता. पुण्याचे सोयीचे होते . पण निर्णय घेता येत नव्हता. काय करावे ? म्हणून तिने मला प्रश्न विचारला कल्याण कि पिंपरी चिंचवड ची नोकरी करावी ? आर्थिक दृष्टिकोनातून कोणते सोयीचे होईल ?  मी तिला सांगितले दोन्हीसाठी १ ते २४९ मधील एक -एक संख्या सांग. तिने खालीलप्रमाणे संख्या सांगितली 

  १) पिंपरी चिंचवड --५७      २) कल्याण ----७९

मी हा प्रश्न ऑप्शन पद्धतीने सोडवायचे ठरविले . मी ज्यावेळी प्रश्न सोडवायाला घेतला त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले . दि -- ६ / ८ /२०२२ वेळ --१६=३०=३३ 

केतू * , गुरु ( व ) , गुरु  ( व ) , मंगळ  , शनी (व ) 

गुरु व शनी दोन्ही वक्री आहेत म्हणून सोडून दिले . राहिले फक्त मंगळ व केतू . केतूला राशी नाहीत म्हणून केतू ज्या राशीमध्ये आहे त्याचा स्वामी विचारात घेतला . केतू तूळ राशीत आहे म्हणून शुक्र गृहीत धरला . आता मंगल ग्रहाच्या दोन राशी मेष आणि वृश्चिक आणि शुक्राच्या दोन राशी वृषभ व तूळ 

मंगळ --१+८ =९

शुक्र ---२+७ =९

-----------------------

बेरीज येते    १८ . ऑप्शन दोनच आहेत म्हणून १८ ची एक अंकी बेरीज घेतली  १+८=९ , या संख्येला दोन ने भागले . भागाकार ४ बाकी १ आला . बाकी एक आला म्हणून पहिला ऑप्शन हे उत्तर होईल 

आता हाच प्रश्न मी नंबर कुंडलीनुसार करायचे ठरविले .

नियम --- ज्या कुंडलीमध्ये दशम भावाचा सब जर २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर ते ठिकाण निवडावे 

१)  पिंपरी चिंचवड साठी के.पी . नंबर  ५७ घेऊन कुंडली तयार केली 

दि  --६ / ८ /२०२२ वेळ --१७=०१=३४ 

हि मिथुन लग्नाची कुंडली आहे दशम भावाचा सब गुरु आहे गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

गुरु--१० क .यु 

शनी--८

राहू ---११ मंगळ ११ , ६ 

शुक्र ---१ , १२

दशम भावाचा सब ६,१०,११ भावाचा कार्येश आहे    तसेच शनी ८ व्य स्थानी आहे , साध्या कुंडलीनुसार त्याची दृष्टी २ स्थानावर पडते ( अंशात्मक नाही ) म्हणजे एकूणच गुरु २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे . परंतु ८ मुले थोडा त्रास सुधा होऊ शकतो. दशम भावाचा सब १२ भावाचा कार्येश आहे , १२ भाव हॉस्पिटल दाखवितो. 

२)  कल्याण साठी के.पी नंबर ७९ घेऊन कुंडली तयार केली . हि कर्क  लग्नाची कुंडली आहे . 

 दि-- ६ / ८ / २०२२ वेळ -- १७=०७=५५ 

ह्या पत्रिकेत दशम भावाचा सब गुरु च आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

गुरु-- 

शनी---७

राहू---१०, मंगळ १० , ५ 

शुक्र ---१२, ११ 

या  पत्रिकेत गुरु १०,११ भावाचा कार्येश आहे तसेच ५ या विरोधी भावाचा कार्येश सुद्धा आहे 

दोनही कुंडलीचा विचार करता , पहिला ऑप्शन म्हणजे पिंपरी चिंचवड पालिका हे योग्य राहील . 

दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले . 

म्हणून मी पिंपरी चिंचवड पालिकेची ऑर्डर स्वीकारावी असे सांगितले . हे बोलणे रविवारी झाले . ती म्हणाली त्यांनी सोमवारीच बोलावले आहे   ,  पिंपरी चिंचवड ची ऑर्डर स्वीकारते .आणि कल्याण च्या नोकरीचा राजीनामा देते. ती स्त्री सोमवारी १५ ऑगस्ट ला हजर  झाली . ( तिला १५ ऑगस्ट ला  यावयास सांगितले होते . )

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु !!!