कृष्णमूर्ति ज्योतिष

Monday 11 November 2013

Case Study-5

मला  नोकरी केंव्हा लागेल ?

                             एका परिचित व्यक्ती  म्हणाली सर माझा मुलगा बी सी एस झाला आहे . त्याने पुण्यात 
पुष्कळ मुलाखती दिल्या आहेत पण अद्ध्याप  नोकरी मिळाली नाही . मी त्याला म्हटले एकदा मुलाला घेऊन माझ्याकडे या मग बघू काय करावयाचे . मुलगा दर शनिवारी , रविवारी घरी येत असे . एका शनिवारी तो आणि त्याचा मुलगा माझ्या घरी आले . मुलगा म्हणाला सर मी खूप इंटरव्ह्यू दिलेत पण जागतिक मंदी असल्यामुळे नोकरी काही मिळत नाही .  नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न त्याने मला विचारला मी  
त्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले आणि म्हटले मला नोकरी केंव्हा मिळेल हा  विचार मनात आणायचा लदैवतेचे स्मरण करावयाचे ,एकाग्र होऊन या पुस्तकातील पान  काढ ,उजव्या बाजूच्या पानावरील नंबर मला सांग . त्याने थोडावेळ एकाग्र होऊन मला १३९ हा नंबर दिला . त्या नंबर वरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली काढली .
        हा प्रश्न मी दि . १० जुलै २०१२ रोजी संध्याकाळी १८-०३-५० वाजता सोडविला . आणि त्याला सांगितले ऑगस्ट , सप्टेंबर  मध्ये नोकरी लागेल .   त्यानंतर वडील माझी फी द्यायला लागले. मी मुलाला म्हटले तुझा पाहिला पगार झाला की माझी फी आणून दे.            
             सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मुलाचे वडील पेढ्याचा बॉक्स घेऊन आले . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनद ओसंडून वाहत होता .  मुलाविषयी भरभरून बोलत होते. १००-१२५ मुले इंटरव्ह्यूला  होती त्यामधील ६ मुलांची निवड केली . त्यामध्ये माझ्या मुलाचा नंबर लागला . तो विप्रो  कंपनी मध्ये नोकरीला लागला आहे .
                 
                              मुलाने सांगितले अगोदर सरांच्याकडे जावा . आणि त्यांना सांगा . मलाही खुप आनंद झाला . आनंद ह्यासाठी वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती . त्यांचा व्यवसाय चालत नव्हता . त्यात मुलाला नोकरी लागली म्हणून वडील खूप आनंदात होते
                 
                                 या कुंडलीत मनातील विचार जुळतो का ते पाहू .  चंद्र हा मनाचा कारक ह्या कुंडलीत चंद्र दशमेश आहे . षष्ठ भावारंभी आहे . म्हणजे प्रश्न नोकरीसंबंधी आहे हे बरोबर आहे
             
     कृष्णमुर्ती नियम --- दशमाचा सब जर २,६,१०,११  भावांचा कार्येश असेल तर २ ६ १० कार्येश भावाच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागते . 
             
     ह्या कुंडलीत दशमाचा सब शुक्र आहे . त्याचे कार्येशत्व  खालीलप्रमाणे ---
         

                                     शुक्र ---७,८ कयू
              न . स्वामी         चंद्र ---५,१०,६
                    सब             शनि---
             स . न . स्वामी   मंगळ ---११,२
      

                          शुक्र २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . म्हणजे नोकरी लागणार हे नक्की झाले . आता 
नोकरी केंव्हा   लागणार ह्यासाठी दशा -अंतर्दशा पाहाव्या लागतील .
            

                                प्रश्नवेळी बुध महादशा ११ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे . व केतूची अंतर्दशा ६ जुलै २०१३ 
पर्यंत आहे     बुध व  केतूचे बलवान कार्येशत्व खालील प्रमाणे
                                  
                बुध---९,१० कयू                                                    
                बुध---९,१० कयू                                                        
                बुध---९,१० कयू                                             
                बुध---९,१० कयू                                                               



            केतू ---७,शु   
           रवि ---९
          शुक्र ---७,८ कयू
          चंद्र --- ५,१०,६ कयू         

बुध १० भावाचा व केतू ६,१० भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे बुध महादश केतू अंतर्दशा नोकरीसाठी अनुकूल आहे . आता विदशा  अशी शोधावी लागेल ती २,११ भावांची कार्येश असेल .
                  
                        प्रश्नवेळेची कुंडली  चर तत्वाची आहे म्हणजे घटना  लवकर घडणार आहे. पुढील विदशा शुक्राची आहे शुक्र २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . म्हणजे शुक्र विदशा नोकरीसाठी अनुकूल आहे .

बुध महादशा( १० )केतू अंतर्दशा ( ६,१० )शुक्र विदशा  (२,६,१०,११ ) याभावांची कार्येश आहे .
          

                                शुक्र विदाशेच्या ३० जुलै २०१२ ते २९ सप्टेंबर २०१२ या कालावधीत नोकरी लागणार 
असे ठामपणे म्हणता येईल . त्यावेळी   गोचर पहिले नव्हते . फक्त औगस्ट सप्टेंबर मध्ये नोकरी लागेल असे सांगितले होते .सप्टेंबर मध्ये  वडील म्हणाले  मुलाचा पगार झाला आहे म्हणजे औगस्ट मध्ये नोकरी लागली असावी .
        
                      गोचर भ्रमण ---    बुध, केतू व शुक्र यामध्ये यामध्ये केतू हा मंद गतीचा ग्रह आहे त्याचे सब मधील भ्रमण पाहावे लागेल व बुध शुक्र शीघ्र गतीचे ग्रह असल्यामुळे त्यांच्या  नक्षत्र स्वमिचे भ्रमण पाहावे लागेल .
             
                                  १) केतूचे भ्रमण पाहू ---केतू ३० जुलै २०१२ रोजी शुक्राच्या सब मध्ये आहे १ औगास्त  २०१२ रोजी केतूच्या सब मध्ये, केतू १५ औगास्त २०१२ पर्यंत केतूच्या सब मध्ये आहे . केतू पहिल्या दोन पायरीला अनुकूल नाही .  १६ औगस्ट २०१२ ते १९ सप्टेंबर २०१२ पर्यंत बुधाच्या सब मध्ये बुध पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहे .
            
                              २) बुध --- बुध १६ /८/ २०१२  शनि नक्षत्रात, २१ / ८ /  २०१२ ते २८ / ८ / २०१२ पर्यंत बुध 
नक्षत्रात आहे .  शनि बुध दोन्ही पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत .
                             
 ३) शुक्र---- शुक्र १६ / ८ / २०१२ पासून राहू  च्या नक्षत्रात ,२३ /८ /२०१२ पासून गुरु च्या 
नक्षत्रात ५ सप्टेंबर पासून शनि नक्षत्रात  राहू गुरु शनि पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत .
       

  म्हणजे १६ /८ / २०१२ ते २८ /८ /२०१२ या कालावधीत नोकरी लागली असावी .

शुभम भवतु 

No comments:

Post a Comment