Case Study--4
ज्योतिष --कृष्णमुर्ती ज्योतिष
शुभमंगल ---------सावधान --
आज शिक्षणाच्या प्रसारामुळे मु ला-मुलींचे शिक्षण घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. उच्च
शिक्षण घेतल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नोकरी करण्याकडे कल वाढत चाललेला आहे. त्यामध्ये
मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत आहे. तसेच वेगवेगळ्या समाजामध्ये विवाहाचे वय
वेगवेगळे असते. आई-वडिलांना त्यांच्या विवाहाची काळजी वाटत असते. विवाह योग्य वयात होणे गरजेचे
असते . असे त्यांच्या अनुभवावरून त्यांना वाटत असते .
शिक्षण घेतल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नोकरी करण्याकडे कल वाढत चाललेला आहे. त्यामध्ये
मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत आहे. तसेच वेगवेगळ्या समाजामध्ये विवाहाचे वय
वेगवेगळे असते. आई-वडिलांना त्यांच्या विवाहाची काळजी वाटत असते. विवाह योग्य वयात होणे गरजेचे
असते . असे त्यांच्या अनुभवावरून त्यांना वाटत असते .
एक साधारण २०-२२ वयाची मुलगी (२०१२) जुलै महिन्यात पत्रिका जुळते का? हे पहाण्यासाठी
आली होती . बऱ्याच वेळा पत्रिका जुळत नसायची किंवा मुला-मुलींची पसंती व्हावयाची नाही एका दिवस मी
तिला म्हणालो आपण विवाह योग केंव्हा आहे ते पाहू . तुझी पत्रिका बरोबर आहे का? वेळ बरोबर आहे का?
ती म्हणाली तारीख बरोबर आहे . पण वेळ नक्की किती आहे ते मला माहित नाही . मी म्हटले ठीक आहे.
आपण वेगळ्या पद्धतीने पाहू . कृष्णमुर्ती पद्धतीने याला एक पर्याय आहे. तो म्हणजे नंबर कुंडली . ज्या
काळात योग आहे त्या काळात प्रयत्न करता येइल. व आपले उंबरठे झिजवायचे श्रम कमी होतील. मी तिला
सांगितले कुलदैवताचे स्मरण करून ,विवाहाचा प्रश्न मनात घोळवून १ ते २४९ पैकी एक संख्या सांग . तिने
मला १३७ ही संख्या सांगितली या १३७ नंबर वरून मी एक कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .हा प्रश्न
मी २८/७/२०१२ रोजी दुपारी १५-३९-४६ वाजता रे ७४,२६ पू अ १७,५९ उ येथे सोडविला . या प्रश्न कुंडलीचा
अभ्यास करून २१/१२/२०१२ ते २५ / ५/२०१३ पर्यंतविवाह होईल असे सांगितले
१८ मे २०१३ रोजी तिचा विवाह झालेला आहे
हे मी कसे ठरविले ते खालीलप्रमाणे
चंद्र प्रश्नाचा रोख बरोबर दाखवितो कि नाही ते पाहू
चंद्र राहू युती आहे . चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे. शनि चतुर्थेश पंचमेश आहे चंद्र कुटुंब स्थानारंभी आहे
प्रश्नाचा रोख बरोबर आहे. विवाहासाबंधी मनात काळजी आहे.
कृष्णमुर्ती नियम --- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर विवाह होतो विवाह त्यांच्या
दशा -अन्तर्दशेमधे होतो. येथे सप्तमाचा सब राहू आहे . राहू विवाह होणार कि नाही ते आपणाला सांगणार आहे
.तर राहूचे बलवान कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
राहू ----१,मं ११,२ चं यु १,१०
न . स्वामी शनि ---१२,४,५
सब केतू ---७,शु ८ चं दृ १,१०
स . न . स्वामी रवि ----९,बु यु ९
राहू ११,२,७ या भावांचा व ५ , ८ या पूरक भावांचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे
विवाह होणार हे नक्की झाले . आत केंव्हा होणार ह्य्साठी आपल्याला दशा-अंतर्दशा पाहाव्या लागतील .
प्रश्न्वेळी शनि महादशा २२/७/२०२३ पर्यंत होती शनीचे कार्येशत्व पुढीलप्रमाणे ----
शनि ---
न . स्वामी मंगळ ---११,२,१२ कयू
सब शनि --
न . स्वामी मंगळ ---११,२,१२ कयू
शनि २,७,११ पैकी ११,२ या भावांचा कार्येश आहे . दृष्टीचा विचार केला तर गुरूची मंगळावर दृष्टी आहे . दृष्टीमुळे
७,८ या भावांचा हि कार्येश आहे. शनि २,७,११ या तिन्ही भावांचा कार्येश आहे. . प्रश्न्वेळी शुक्र अंतर्दशा चालू
होती . ती १३ जुलै २०१४ पर्यंत आहे . शुक्राचे बलवान कार्येशत्व पुढीलप्रमाणे --
शुक्र --८
न स्वामी मंगल --११,२,१२ कयू
सब गुरु --- ७,३,६,८ कयू
स . न .स्वामी चंद्र ----१,१०रा यु १ के दृ ७
शुक्र पहिल्या दोन पायरीला २,११ या प्रमुख भावन्चाव ८ या पूरक भावाचा कार्येश
आहे .तिसर्या चौथ्या पायरीला ७ व ८ या भावांचा कार्येश आहे . त्याचबरोबर ६,१०,१२ या विरोधी भावांचाही
बलवान कार्येश आहे. प्रश्न्वेळी खालील विदशा चालू होत्या
शनि/शुक्र /राहू ------२१/१२/२०१२ पर्यंत
गुरु ----- २५/५/२०१३ पर्यंत
राहू , गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे
राहू -----१,मं ११,२ चं यु १,१० गुरु -----७,३,६,८ कयू
न . स्वामी शनि ---१२,४,५ चंद्र ----१,१०,राहू यु १,के दृ ७
सब केतू ---७,शु ८ चं दृ १,१० शनि ---
स . न . स्वामी रवि ----९,बु यु ९ मंगल ---११,२,१२ क्यू गु. दृ ७,३,८
राहू-गुरु ची तुलना करता गुरु विदशा मी निश्चित केली कारण गुरु यशाच्या चौथ्या पायरीला
११,२ भावांचा कार्येश आहे. व दृष्टीमुळे ७,८ भावांचा कार्येश आहे.
शनि / शुक्र / गुरु म्हणजे २१ / १२ /२०१२ ते २५ / ५ /२०१३ या कालावधीत विवाह होईल सांगितले
आणि त्याच कालावधीत विवाह झाला आहे.
No comments:
Post a Comment