फायलीन वादळ
आंध्रच्या किनार पट्टीवर फायलीन वादळ झाले त्यावेळी मनात उठलेले विचारांचे वादळ शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे . सकाळ वर्तमान पत्रात एक फोटो आला होता त्यामध्ये एक माणूस त्याचे वादळात पडलेले घर पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करीत होता .
चहुबाजूनी आभाळ दाटून आले होते . वार्याचा वेग वाढला होता . आज पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हे दिसायला लागली होती . बहुतेक आज पावसाचे तांडव नृत्य सोसावे लागणार होते
चहुबाजूनी आभाळ दाटून आले होते . वार्याचा वेग वाढला होता . आज पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हे दिसायला लागली होती . बहुतेक आज पावसाचे तांडव नृत्य सोसावे लागणार होते
माणसाच्या आयुष्यातसुद्धा अस घडत कधी कधी अशावेळी
माणूस हताश होतो . सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरतात . अघटीत घडत असते त्याला
सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो निसर्गाला ,नियतीला वाट मोकळी करून ध्यावी
लागते .
बंड , हे बंडच असते ,निसर्गाविरुद्ध केलेले बंड , निसर्ग तुमच्यात कधी
ढवळाढवळ करतो का? नाही ना ! हजारो वर्षापासून त्याचे सृष्टीचक्र नियमित
अव्याहतपणे चालू आहे . मग त्याच्या विरुद्ध बंड , त्याला कसे मानवणार ?
मानवाला पृथ्वीवर आणण्यासाठी त्याला केंव्हा तरी असे तडाखे द्यावेच
लागतात . त्यावेळी माणूस कोठे ताळ्यावर येतो. निसर्गाची तडाखे देण्याची
प्रवृत्तीतून मानवाने काहीतरी शिकावे हीच निसर्गाची अपेक्षा असते .
आव्हान ,जरूर ध्याव , पण समोरची व्यक्ती बघून ध्याव ना!
हत्तीपुढे सस्याची काय कथा .माणूस राक्षस बनत चालला आहे . त्याची भूक वाढत
चालली आहे . पचेल तेवढेच खाव ना ! निसर्ग एका घासात पृथ्वीला गिळंकृत करू
शकतो . वामनाने नाही का तीन पावलात स्वर्गलोक , पृथ्वीलोक व पाताळलोक
आक्रमित केला . मानव , वामन होऊ शकत नाही हे मात्र खरे . शेवटी "मर्यादा"
हा शब्द मानवापुढे लावावाच लागतो . तो पूर्ण होऊ शकत नाही . अपूर्णता हा
त्याचा स्थायीस्वभाव बनलेला आहे . अतिरेक केलाच तर कडेलोट ठरलेला . आहे
फक्त विनाश --विनाश --------- मग --पुन्हा घर बांधायला सुरुवात -----
No comments:
Post a Comment