Case Study- 10+ शेतजमिनीची विक्री केंव्हा होईल ?
माझ्या मित्राच्या मुलाकडे एका नावाजलेल्या वाहनाच्या कंपनीची एजन्सी होती . व्यवसायाला सुरुवात करताना बँकेचे कर्ज काढलेले होते .सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला होता . सुरुवातीला बँकेचे हप्ते वेळच्यावेळी भरले जात होते, नंतर नंतर बँकेचे हप्ते थकत गेले . व्यवसायाला लागणारे भांडवल कमी पडत होते . ऑर्डर खूप येत होत्या . कंपनीकडून वाहन खरेदी करताना कंपनी सर्व रक्कम घेत होती . वाहंन विकल्यानंतर कंपनीकडून कमिशन मिळत होते . ऑर्डर प्रमाणे वाहनाची पूर्तता करता येत नव्हती . भांडवल कमी पडत असल्यामुळे व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालत नव्हता .
माझ्या मित्राची शेती खूप होती व ती सर्व पाण्याखाली होती . म्हणून त्याने थोडी शेती विकायचे ठरविले . शेतजमीन विकण्याचा खूप प्रयत्न केला . भांडवल उभे करण्या इतपत रक्कम मिळत नव्हती . त्याला मुलाचे कर्ज फेडायचे होते. त्याच बरोबर भांडवल वाढवायचे होते . जी शेतजमीन विकायची होती त्यामध्ये एक बोअर होते ते २४ तास चालणारे होते . त्यामुळे त्याला वाटत होते आपल्याला चांगली रक्कम मिळू शकेल
एके दिवशी त्याने मला फोन केला व विचारले अरे माझी शेतजमीन केंव्हा विकली जाईल ? मी म्हटले तू माझ्या घरी ये मग बघू काय करायचे ते .
१६ डिसेंबर संध्याकाळी माझ्या घरी आला व तोच प्रश्न त्याने माल विचारले मी त्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले . मन एकाग्र करून मनात प्रश्न घोळवून ,कुलदैवतेचे स्मरण करून यातील एक पान काढ . उजव्या बाजूवरील पान नंबर मला सांग . थोडावेळाने त्याने ७७ नंबर सांगितला . ह्या नंबरवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली.
घर प्लॉट जमीन विकण्यासाठी कृष्णमुर्ती नियम -------
सप्तमस्थान हे घर जमीन विकत घेणार्याचे स्थान . साप्तमापासून चौथे स्थान म्हणजे दशमस्थान हे विकत घेणार्याचे घराचे स्थान होईल . दशमास्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर १० (४), ५ (११),६ (१२) या भावांचा कार्येश असेल तर जमीन विकली जाईल . ह्या भावांच्या दशा-अंतर्दाशेमध्ये घटना घडेल .
दशमभावाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व -----
राहू ----
न . स्वामी गुरु ----१०,९,११ कयू
सब चंद्र ----६,१,७ कयू
स . न . स्वा चंद्र ----६,१,७ कयू
दशमभावाचा सब राहू ६,१० या भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे शेत जमीन विकली जाणार हे निश्चित झाले . आता जमीन केंव्हा विकली जाणार ह्यासाठी आपणाला दश-अंतर्दशा पाहाव्या लागतील .
प्रश्न्वेली प्रश्नकुंडली चर तत्वाची आहे . म्हणजे घटना लवकर घडणार आहे हे निर्देशित होते . प्रश्न्वेळी चंद्र महादशा ३१ मे २०१९ पर्यंत व अंतर्दशा गुरूची ३० ऑगस्ट २०१३ पर्यंत होती . चंद्र बलवान कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
चंद्र ---६,१,७कयु गु दृ १०,९ गुरु ---११कयू
न . स्वामी चंद्र ---६,१,७कयु गु दृ १०,९ चंद्र ----६,१,७ क्यू गु दृ १०,९
सब गुरु ---११ कयू गुरु ---११ कयू
स . न . स्वा चंद्र ---६,१,७ कयू गु दृ १०,९ चंद्र ---६,१,७ कयू गुरु दृ १०,९
चंद्र व गुरु दोन्ही ६,१० या भावाचे बलवान कार्येश आहेत . चंद्र व गुरु जमीन विकण्यास अनुकूल आहेत आता ६,१०,५ या भावांपैकी पाचवा भाव लागलेला नाही म्हणून विदशा अशी शोधावी लागेल जी ५ या भावाची कार्येश आहे . या पत्रिकेमध्ये केतू व मंगळ हे दोनच ५ या भावाचे कार्येश आहेत .
केतू विदशा २७/११/२०१२ ते २६/१२/२०१२
मंगळ विदशा २१/५/२०१३ ते १८/६/२०१३
प्रश्न कुंडली चर तत्वाची आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे हे निर्देशित होत आहे . शिवाय छाया ग्रह बलवान असतात म्हणून मी केतूची विदश निवडली . केतूचे कार्येशत्व ----
केतू ---
न . स्वामी रवि ---५,२
सब राहू ----
स . न . स्वा गुरु ---१०,९,११ कयू
केतू ५,९,१०,११ या भावांचा बलवान कार्येश आहे . याठिकाणी १०,५,६ या भावांची साखळी पूर्ण झाली म्हणून २७/११/२०१२ ते २६/१२/२०१२ या कालावधीत जमीन विकली जाईल असे सांगीतले . वास्तविक जातक १६/१२/२०१२ ला माझ्याकडे होता म्हणजे पुढील दहा दिवसात घटना घडणार होती . या दहा दिवसात चंद्र - गुरु -केतू यांचे गोचर भ्रमण अनुकूल होते . याच कालावधीत घटना घडेल असे खात्रीपूर्वक सांगितले .
२९ डिसेंबरला त्याचा फोन आला दोन दिवसापूर्वी व्यवहार ठरला . रक्कम फार मोठी होती म्हणून त्याने( पार्टीने ) निम्मी रक्कम माझ्या मित्राला दिली . व राहिलेली रक्कम मार्च२०१३ मध्ये देऊन कागदोपत्री दस्त करू असे ठरले आहे .
No comments:
Post a Comment