कृष्णमूर्ति ज्योतिष: > कोणी घर देता का --- घर

Wednesday 18 December 2013

> कोणी घर देता का --- घर

+ कोणी घर देता का --- घर   

Case Study--9

        हे " नटसम्राट " या गाजलेल्या नाटकांतील   अप्पासाहेब बेलवलकर यांचे वाक्य.  साडेतीन हाताच्या 

देहाला रहायला एक घर हवय . माझ घर ,स्त्री पुरुषांनी गजबलेले घर ,चार भिंतीचे घर ,दगड विटा मातीने 

बांधलेले घर , जिथून कोणीही मला बाहेर  काढणार नाही असे माझे घर , माझ्या स्वप्नातले घर . 
                    
                         हे मिळविण्यासाठी किती तरी  आटापिटा करावा लागतो . तो करूनसुद्धा मिळेल तेंव्हा खर .

ज्यावेळी मिळते तेंव्हा स्वर्ग दोन बोटेच वर राहिलेला असतो .  
               
                                     असाच एक तरुण २२-२५ वर्षाचा स्वत:चे गांव सोडून आला होता . आई वडील त्याला 

सोडून गेले होते . सोबत एक धाकटा भाऊ . ह्याने आयटीआय कोर्स केलेला शिवाय मनुफक्चारिंग चा एक 

वर्षाचा कोर्स केलेला होता . हा  कमिन्स कंपनीत नोकरीला आहे . धाकटा भाऊ पुण्याला एका कंपनीत 

नोकरीला आहे. सध्या हा भाड्याच्या खोलीत रहात आहे . त्याच्या स्वप्नातल्या घरासाठी गेले वर्षभर प्रयत्न 

करीत आहे . आयते घर काही त्याला मिळत नव्हते . किंवा १-२ गुंठे जागाही त्याला मिळत नव्हती .  
                     
                                  एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला  सर , आयते घर काही मिळत नाही .

जे मिळतंय त्याच्या किमंती माझ्या आवाक्या पलीकडच्या आहेत. आता मी २ गुंठ्याचा प्लॉट

मिळविण्याच्या प्रयत्नात आहे . मला प्लॉट केंव्हा मिळेल ? असा प्रश्न त्याने मला विचारला . मी त्याला म्हटले

१ ते २४९ यामधील एखादी संख्या सांग . त्याने थोड एकाग्र होऊन १३१  संख्या सांगितली . ह्या नंबरवरून मी

कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .

 हा प्रश्न मी १४ सप्टेंबर २०१३ रोजी १२. ४८ . ४६ वाजता रे ७४ २६ पू  अ १७ ५९ उ येथे सोडविला . 

पत्रिकेचा अभ्यास करून 

 २३ ऑक्टोंबर २०१३ ते ३१ ऑक्टोंबर २०१३ या कालावधीत तुला घरासाठी प्लॉट मिळेल असे सांगितले . 

                    ३० ऑक्टोंबर रोजी त्याने मला फोन करून सांगितले कालच म्हणजे २९ ऑक्टोंबर ला जागेचा

व्यवहार झाला आहे  व टोकन म्हणून काही रक्कम दिली आहे . पुढील महिन्यात कागदोपत्री दस्त करणार

आहोत . सदरचा प्रश्न मी खालील पद्धतीने सोडविला . -----------

जागा घेण्यासाठी कृष्णमुर्ती नियम ----  चतुर्थ भावाचा उपनक्षत्रस्वामी जर ४,(घर ) ११ (लाभ ) व १२ 

(गुंतवणूक ) या भावांचा कार्येश असेल तर ४,११,१२ या भावांच्या दश अंतर्दाशेमध्ये घर किंवा जागेचा लाभ होतो . 
         
     ह्या कुंडलीमध्ये चातुर्थाचा सब शुक्र आहे  शुक्राचे कार्येशत्व --------
   
                  शुक्र --- १ कास्प्युती 
     न . स्वामी राहू ----१ शु १,८ श यु ४,१,५
           सब     गुरु ---- ९,६ 
स . न . स्वा . गुरु ---- ९,६ 

चातुर्थाचा सब शुक्र  ४ या प्रमुख भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे प्लॉट मिळणार हे  नक्की झाले. आता

केंव्हा मिळणार यासाठी दशा - अंतर्दशा पाहाव्या लागतील . 

                      प्रश्न वेळी शुक्र महादशा १७ जुलै २०२५ पर्यंत होती . व अंतर्दशा राहूची १७सप्टेंबर २०१५ पर्यंत

होती . शुक्राचे कार्येशत्व आपण वर पहिले आहे . शुक्र महादशा अनुकूल आहे आता राहूचे कार्येशत्व -----

                           राहू ----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
            न . स्वा   राहू -----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
                 सब    शुक्र ----१ कस्प युती
        स . न . स्वा राहू ---- १,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
 
            राहू अंतर्दश ४ या प्रमुख भावाची कार्येश आहे . 

प्रश्न वेळी शनि विदशा १३  जानेवारी २०१३ पर्यंत आहे . शनीचे कार्येशत्व -----

                   शनि ----१,४,५ शु यु १,८ राहू यु १
      न स्वा    राहू ----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
          सब   बुध   ---१२ कस्प युती 
   स . न . स्वा चंद्र -- ३

          शनि ४, १२ या प्रमुख भावांचा कार्येश आहे . 
 
                   शुक्र महादशा ४ राहू अंतर्दशा ४  शनि ४, १२ या भावांचा कार्येश आहे . यामध्ये ११ वा भाव कोठेच

लागत नाही . म्हणून मी सूक्ष्म दशा पहायचे ठरविले कारण प्रश्न कुंडली चर तत्वाची आहे याचा अर्थ घटना

लवकर घडणार आहे . प्रश्नवेलि खालील सूक्ष्म दशा चालू होत्या . 
   
                        केतू --- २४ सप्टेंबर २०१३ पर्यंत 
                         शुक्र ----२३ ऑक्टोंबर २०१३ पर्यंत 
                        रवि -----३१ ऑक्टोंबर २०१३ पर्यंत 

  शुक्र ११ भावाचा कार्येश नाही हे आपण वर पहिलेच आहे . केतू व रवि हे दोन्ही ग्रह ११ या भावाचे कार्येश

आहेत . 

             केतू ---७,मं १०,२ शु दृ १,४,५                                                  रवि ----११
न . स्वा  शुक्र ----१,८,१  कस्प युती श यु १,४,५                         न स्वा  रवि ----११
    सब    रवि   ----११                                                                  सब   चंद्र ----
  स . न . स्वा --रवि ११                                                     स . न . स्वा शुक्र --१,८,१श यु १,४,५

केतू व रवि दोन्ही ४,११ या भावाचे कार्येश आहेत यापैकी कोणती विदशा निवडायची हा प्रश्न पडला होता . मा .

गोंधळेकर सर म्हणतात छाया ग्रह  नेहमी बलवान असतात . शिवाय केतू यशाच्या पायरीवर ११ या भावाचा

कार्येश आहे   पण रवि हा स्वत:च्या नक्षत्रात आहे . तसेच तो लाभेश असून लाभातच आहे ,म्हणून रवि

सुक्श्म्दशा निवडली . 
   
       शुक्र महादशा (४) राहू अंतर्दशा (४) शनि विदशा (४,१२) व रवि (४,११)   म्हणजे २३/१०/२०१३ ते

३१/१०/२०१३ या कालावधीत प्लॉट खरेदी केला जाईल . ह्याच कालावधीत घटना घडली आहे .


प्रा कोरडे पी आर ,
१४२,पद्मावातीनगर ,फलटण
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८
            

No comments:

Post a Comment