कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday 4 February 2014

+ विवाह ----  पत्रिकामेलन 

             शेकडा ९९ % लोकांचे विवाह होतात . विवाह केंव्हा होईल ? या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न अभिप्रेत आहे  तो म्हणजे त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल ? विवाह करणे एवढेच उधिष्ट नसते तर त्यापुढील कमीतकमी    २५-३० वर्षे वैवाहिक जीवन चांगले असले पाहिजे . हे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा विवाहासाठी पत्रिका जुळवताना फक्त गुणमेलन पहिले जाते १८ पेक्षा जास्त  गुण असतील तर विवाह  जुळविला जातो . अन्यथा नाही . 
                  गुणमेलन पाहताना फक्त चंद्राचा व त्याच्या नक्षत्राचा विचार केला जातो . गुण पाहण्याचे एक साधे कोष्टक असते . दोघांची रास व जन्मनक्षत्र माहित असेल कि झाले . पंचागातील कोष्टकावरून कोणालाही किती गुण पडतात हे सांगता येईल .
संपूर्ण आयुष्याचे गणित या कोष्टकावरून ठरवायचे का ? 
हे तुम्हाला पटतंय का? ---------नाही ना .
 पत्रिका जुळविताना खालील गोष्टी पहाव्यात . 
१) वर-वधूचे आयुष्यमान   
२) शरीरप्रकृती  
३) जननक्षमता 
४) आर्थिक बाब 
 ५)नजीकच्या काळात येणारे  आजार 
६) दोघांचे पत्रीकेमधील रवि ग्रहामधील योग  
दोघांच्या रवि मध्ये युती ,लाभ ,नवपंचम , प्रतियोग असावा षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये
रवि- शनि ,रवि- राहू / केतू एकत्र असू नये .
७)चंद्र हा मनाचा कारक म्हणून  चंद्रा मधील योग
 दोघांच्या चंद्रामध्ये युती ,लाभ ,नवपंचम , प्रतियोग असावा षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये
८) एकमेकावरील प्रेम पाहण्यासाठी मुलीचा मंगल व मुलाचा शुक्र यामधील योग
 मुलीचा मंगल व मुलाचा शुक्र यामध्ये युती ,लाभ ,नवपंचम , प्रतियोग, असावा षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये
९) एकमेकांना समजून घेणारे  म्हणजे रवि व गुरु यांचेमधील योग 
दोघांच्या रवि व गुरु मध्ये युती ,लाभ ,नवपंचम , प्रतियोग असावा षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये
१०)सर्वात महत्वाचा म्हणजे वादविवाद संघर्ष यासाठी रवि व हर्शल यामधील योग
दोघांच्या रवि व हर्शल यामध्ये लाभ ,नवपंचम योग असावा युती,प्रतियोग,षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये , युती असेल तर कमीतकमी रवि वर गुरूची दृष्टी असावी
११) दोघांमधील संवाद ,विचार यासाठी चंद्र व बुध यामधील योग 
  चंद्र व बुध यामध्ये युती ,लाभ ,नवपंचम , प्रतियोग, असावा षडाष्टक अथवा केंद्र योग असू नये
१२) विवाहानंतर येणाऱ्या दशा - अंतर्दशा वैवाहिक जीवनाला पोषक आहेत कि  नाही . या  सर्व गोष्टी विवाह जुळवताना पहिल्या पाहिजेत . 
                       विवाह  हि एक तडजोड आहे . सर्व गुणसम्पन कोण आहे? सुखी माणसाचा सदरा कोणाला सापडला आहे? वाद - विवाद कोठे होत नाहीत ? भांडण कोठे होत नाही? त्यावेळी एकमेकांना समजून घेणारे योग आहेत   का?  हे नको का पाहायला ?----------  आता मला सांगा केवळ गुण पाहून विवाह करणे हे कितपत योग्य आहे?     असे म्हणतात विवाह स्वर्गात ठरविले जातात ,आपण फक्त ते पृथ्वीवर साजरे करत असतो.  
            
  कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे ----         जन्मवेळेचे रुलिंग   प्लनेट जुळले पाहिजे . व वराचा सप्तमाचा सब वधूच्या २,७,११ या भावांचा कार्येश आणि वधूचा सप्तमाचा सब वराच्या  २,७,११ या भावांचा कार्येश असला पाहिजे . 
                               वराचे जन्मवेलेचे ग्रह वधूचे पत्रिकेत वैवाहिक सौख्य दाखवतात का ते पाहिले पाहिजे  तसेच वधूचे जन्मवेलेचे ग्रह वराचे पत्रिकेत वैवाहिक सौख्य दाखवतात का हे पहिलेच पाहिजे . 
                                 
                                            गेल्या आठवड्यात एक  वयस्कर पती- पत्नी माझ्याकडे आले होते . त्यांच्या मुलीचे विवाहासंदर्भात पत्रिका जुळविण्यासाठी आले होते . आमच्या मुलीसाठी हे एक स्थळ आले आहे. मुलगा इंजिनियर आहे . एका मल्टी   नेशनल कंपनीत नोकरीला आहे. पगार चांगला आहे . स्वत :चा flat आहे . त्यांनी मुलीला पाहिलेले आहे . ते आमच्या मुलीसाठी फार आग्रह करीत आहेत . आम्ही एके ठिकाणी पत्रिका दाखविली आहे , त्यांनी २५ गुण जुळतात . असे सांगितले . लग्न करावयास हरकत नाही .असे सांगितले आहे .                                     आमचे शेजारचे म्हणाले तुमच्याकडे पत्रिका दाखवून मगच निर्णय घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे  आलो आहोत . ठीक आहे . मी मुला-मुलीची  पत्रिका पहिली व त्यांना सांगितले पत्रिका जुळत नाही . ते म्हणाले का ? अहो मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य नाहीच . जो मुलगा संतती देऊच शकणार नाही त्याच्याशी  लग्न  का लावायचे ? मी त्या मुलाच्या पत्रिके बधल खालील गोष्टी सांगितल्या . 
      १) सप्तमभावाचा सब  शनि आहे. शनि तुळेत राहूच्या नक्षत्रात पंचमात आहे पंचमात शनि मंगळ युती आहे .          ज्यावेळी सप्तमभावाचा उप नक्षत्र स्वामी व त्याचा नक्षत्र स्वामी शनि , राहू , केतू असेल म्हणजे शनि -राहू ,शनि - केतू , राहू - केतू असेल तर ती व्यक्ती वैवाहिक सुख देऊ शकत नाही  . 
                      कोणताही एक ग्रह घटना घडवत नाही . ग्रहांचा समूह परिणाम घडवीत असतो . 
      २) वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र व्ययात राहूच्या युतीत . राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहापासून मिळणाऱ्या सौख्याची हानी करतो . 
      ३) शुक्र रवीच्या युतीत व्ययात आहे . शुक्र अस्तंगत आहे . शुक्राणू संख्या गर्भधारणेसाठी पुरेसा नाही . 
      ४) व्ययात रवि , बुध , शुक्र , राहू युतीत आहेत . 
      ५) पंचम स्थानात दोन पापग्रह शनि , मंगळ यांची उपस्थिती 
      ६) सर्वात महत्वाचे म्हणजे  प्लुटो     हा पापग्रह स्फोटक , विध्वंस करणारा पंचम भावारंभी आहे . तो
            संतती स्थानाची हानी करतो .  
      ७) शुक्र नेपच्यून प्रतियोगआहे . नेपच्यून फसवणूक करणारा ग्रह आहे . 
      ८) पंचम भावाचा सब रवि व्ययात , व्ययाचा  बलवान कार्येश  रवि मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ अष्टमेश शनीच्या युतीत पंचमात  संतती सौख्य नाही . 
      ९) विवाहाचा कारक गुरु व संतती चा कारक गुरु हा नवमांश कुंडलीत सिंह  वंध्या राशीत आहे . 
                     आता मला सांगा अशा   या  मुलाबरोबर विवाह केला तर ह्या गोष्टी केंव्हा लक्षात येणार ?, लग्नानंतर २-३  वर्षांनी . म्हणजे मुलीच्या वैवाहिक सौख्याचे बारा वाजणार . तेथून पुढे घटोस्फोट कडे वाटचाल सुरु होणार ---- पत्रिका पाहताना वरील सर्व योगांचा विचार व्हावयास हवा . 

प्रा . कोरडे पी आर . 
१४२, पद्मावातीनगर फलटण 
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८

2 comments: