नोकरी ---
एक स्त्री ..नर्स आहे. आतापर्यंत खाजगी हॉ स्पिटल मध्ये १०-१२ वर्षे नोकरी केली. खाजगी हॉस्पिटल मध्ये १०-१२ तास काम करावे लागत होते त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होत होते घराच्या लोकांसाठी पाहिजे तेव्हढा वेळ देता येत नव्हता. . एक मुलगा आहे . त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हते , म्हणून तिने नोकरी सोडून दिली. एक दोन महिने घरी थांबली सकाळचा वेळ घरकामामध्ये जात होता. पण दुपारी काहीच काम नव्हते. म्हणून पुन्हा तिने नोकरी करण्याचा विचार केला माझ्याशी संपर्क केला . मला म्हणाली मला सरकारी नोकरी केंव्हा लागेल. ? मी तिच्या बर्थ डिटेल्स वरून नोकरी केंव्हा लागेल ते सांगितले . त्या प्रमाणे तिला नगरपालिकेचा कॉल आला .तिची निवड झाली आणि कल्याण ( मुंबई ) ला नोकरी सुरु झाली . प्रश्न पुढेच आहे .मुळची ती पुण्याची पण नोकरीसाठी तीला डोंबिवलीला राहावे लागत होते . . ती राहते डोंबिवलीला आणि नोकरी आहे कल्याणला . डोंबिवली ते कल्याण हा प्रवास आहे . प्रवासाची दगदग फार होत होती. , नोकरीचे आठ तास पुन्हा पाहिल्यासारखेच होत होते . यापूर्वी तीने पुण्यात मुलाखाती दिल्या होत्या . परंतु त्यानंतर तेथील काही कळले नव्हते . अचानक एक दिवस पिंपरी चिंचवड पालीकेचा मेल आला . आपली निवड झाली आहे सात दिवसाच्या आत हजर व्हावे . आता तिच्यापुढे प्रश्न निर्माण झाला .कल्याणची नोकरी सोडून पुण्याला जावे का . ? एक तर पुण्याला गेले तर प्रवास एक दीड तासाचा होणार आहे . मुलगा मंचरला असतो तेथून एक दीड तासात पुण्याला येता येत होते . घराकडे हि लक्ष देता येत होते . मुलांसाठी वेळ देता येणार होता. पुण्याचे सोयीचे होते . पण निर्णय घेता येत नव्हता. काय करावे ? म्हणून तिने मला प्रश्न विचारला कल्याण कि पिंपरी चिंचवड ची नोकरी करावी ? आर्थिक दृष्टिकोनातून कोणते सोयीचे होईल ? मी तिला सांगितले दोन्हीसाठी १ ते २४९ मधील एक -एक संख्या सांग. तिने खालीलप्रमाणे संख्या सांगितली
१) पिंपरी चिंचवड --५७ २) कल्याण ----७९
मी हा प्रश्न ऑप्शन पद्धतीने सोडवायचे ठरविले . मी ज्यावेळी प्रश्न सोडवायाला घेतला त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले . दि -- ६ / ८ /२०२२ वेळ --१६=३०=३३
केतू * , गुरु ( व ) , गुरु ( व ) , मंगळ , शनी (व )
गुरु व शनी दोन्ही वक्री आहेत म्हणून सोडून दिले . राहिले फक्त मंगळ व केतू . केतूला राशी नाहीत म्हणून केतू ज्या राशीमध्ये आहे त्याचा स्वामी विचारात घेतला . केतू तूळ राशीत आहे म्हणून शुक्र गृहीत धरला . आता मंगल ग्रहाच्या दोन राशी मेष आणि वृश्चिक आणि शुक्राच्या दोन राशी वृषभ व तूळ
मंगळ --१+८ =९
शुक्र ---२+७ =९
-----------------------
बेरीज येते १८ . ऑप्शन दोनच आहेत म्हणून १८ ची एक अंकी बेरीज घेतली १+८=९ , या संख्येला दोन ने भागले . भागाकार ४ बाकी १ आला . बाकी एक आला म्हणून पहिला ऑप्शन हे उत्तर होईल
आता हाच प्रश्न मी नंबर कुंडलीनुसार करायचे ठरविले .
नियम --- ज्या कुंडलीमध्ये दशम भावाचा सब जर २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर ते ठिकाण निवडावे
१) पिंपरी चिंचवड साठी के.पी . नंबर ५७ घेऊन कुंडली तयार केली
दि --६ / ८ /२०२२ वेळ --१७=०१=३४
हि मिथुन लग्नाची कुंडली आहे दशम भावाचा सब गुरु आहे गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे
गुरु--१० क .यु
शनी--८
राहू ---११ मंगळ ११ , ६
शुक्र ---१ , १२
दशम भावाचा सब ६,१०,११ भावाचा कार्येश आहे तसेच शनी ८ व्य स्थानी आहे , साध्या कुंडलीनुसार त्याची दृष्टी २ स्थानावर पडते ( अंशात्मक नाही ) म्हणजे एकूणच गुरु २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे . परंतु ८ मुले थोडा त्रास सुधा होऊ शकतो. दशम भावाचा सब १२ भावाचा कार्येश आहे , १२ भाव हॉस्पिटल दाखवितो.
२) कल्याण साठी के.पी नंबर ७९ घेऊन कुंडली तयार केली . हि कर्क लग्नाची कुंडली आहे .
दि-- ६ / ८ / २०२२ वेळ -- १७=०७=५५
ह्या पत्रिकेत दशम भावाचा सब गुरु च आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
गुरु--
शनी---७
राहू---१०, मंगळ १० , ५
शुक्र ---१२, ११
या पत्रिकेत गुरु १०,११ भावाचा कार्येश आहे तसेच ५ या विरोधी भावाचा कार्येश सुद्धा आहे
दोनही कुंडलीचा विचार करता , पहिला ऑप्शन म्हणजे पिंपरी चिंचवड पालिका हे योग्य राहील .
दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले .
म्हणून मी पिंपरी चिंचवड पालिकेची ऑर्डर स्वीकारावी असे सांगितले . हे बोलणे रविवारी झाले . ती म्हणाली त्यांनी सोमवारीच बोलावले आहे , पिंपरी चिंचवड ची ऑर्डर स्वीकारते .आणि कल्याण च्या नोकरीचा राजीनामा देते. ती स्त्री सोमवारी १५ ऑगस्ट ला हजर झाली . ( तिला १५ ऑगस्ट ला यावयास सांगितले होते . )
महाजनांनी मार्गदर्शन करावे .
शुभंम भवतु !!!
No comments:
Post a Comment