म्हैस आजारातून केंव्हा बरी होईल ?
आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर लेखन करणार आहे . सातारा
जिल्ह्यातील फलटण , माण खटाव हे दुष्काळ ग्रस्त तालुके आहेत . त्याल्यात्यात माण तालुका अतिशय
दुष्काळ प्रवण तालुका . या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी ३५-४० सेमी . आहे . बहुतेक शेती पावसाच्या
पाण्यावर अवलंबून आहे . त्यामुळे ठराविकच पिके काढली जातात . या तालुक्यात घरटी एक माणूस मुंबईला
कामाला असते . किंवा सैन्यात भरती होते .
जिल्ह्यातील फलटण , माण खटाव हे दुष्काळ ग्रस्त तालुके आहेत . त्याल्यात्यात माण तालुका अतिशय
दुष्काळ प्रवण तालुका . या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी ३५-४० सेमी . आहे . बहुतेक शेती पावसाच्या
पाण्यावर अवलंबून आहे . त्यामुळे ठराविकच पिके काढली जातात . या तालुक्यात घरटी एक माणूस मुंबईला
कामाला असते . किंवा सैन्यात भरती होते .
त्यामुळे शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसाय किंवा मेढी पालन हा जोड
धंदा केला जातो . प्रत्येक घरा गणिक २-३ दुभती जनावरे असतातच . या जोड धंद्यामुळे येथील जनता कसेबसे
दोन घास खाऊ शकतात . दुग्ध व्यवसाय मुळे येथील जनता तग धरून आहे . म्हणून शेती बरोबर दुभती
जनावरांची जास्त काळजी घेतात .
असाच एक गरीब शेतकरी एक दिवस माझ्याकडे आला व मला
म्हणाला माझी एक म्हैस २ महिन्यापासून आजारी आहे . ती दुध देत नाही . त्यामुळे घरात तारेवरची कसरत
करावी लागते . माझी म्हैस आजारातून कधी बरी होईल ? असा प्रश्न मला विचारला . अश्या प्रकारचा प्रश्न
सोडविण्याचा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदाच आला . काही ज्योतिषी उपाय म्हणून गंडे , ताईत , दोरे देतात हे
मला माहित होते . पण त्यातले ज्ञान मला काहीच नाही .
मी माझ्या कॉलेज मधील प्राध्यापकांना विचारले कि माणूस व पाळीव
प्राणी यांच्या शरीर रचनेत काही फरक आहे का? त्यांनी सांगितले नाही . माणूस व पाळीव प्राणी यांच्यामधील
क्रिया सारख्याच असतात . फक्त पाळीव प्राण्याची ( गाय , बैल म्हैस ,कुत्रा ) यांची Efficiency जास्त आहे .
आणि प्रेग्नसी पिरीयड वेग वेगळा असतो . गायी मध्ये २८५ दिवस व म्हैस मध्ये ३०० दिवस असतो गाय
बैल म्हैस आजारी पडल्यावर पशु वैध त्यांच्या ठराविक लक्षणावरून औषधोपचार करतात . तेही ठराविक
आजारावर करतात . माणसाच्या बाबतीत जसे रक्त , मुत्र यांची तपासणी केली जाते तसे पाळीव प्राण्याची
तपासणी केली जाते हे माझ्या ऐकिवात नाही . किंवा त्यांची शस्त्रक्रिया केली जाते हे कोठे पाहण्यात नाही .
किंबहुना माणसा सारखे आजार त्यांना होतात य़बधल मला कल्पना नाही . आणि या सर्व गोष्टी करायचे
म्हटले तर त्याचा खर्च हि शेतकऱ्याच्या आवाक्या पलीकडचा असणार त्यामुळे शेतकरी त्या फंदात पडत
नसावेत . अगदीच गंभीर आजार असेल तर त्यांची काळजी घेणेही शक्य होणार नाही .
शेतकऱ्याच्या बोलण्यातून एक गोष्ट कळली ती म्हणजे म्हैस आठव्या
महिन्यात व्याली होती . सर्व साधारण पणे म्हैसी चा प्रेग्नसी कालावधीत ३०० दिवस म्हणजे १० महिन्याचा
असतो . दोन महिने अगोदर व्याल्या मुले गर्भाशयाला इजा झाली असेल का? हा विचार माझ्या मनात आला .
ज्योतिष शास्त्रात शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार करतात ( गाय , बैल , म्हैस कुत्रा ,शेळी मेंढी )
मी मनात विचार केला हा प्रश्न सोडवून तर पाहू . शेतकऱ्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले व सांगितले
मनामध्ये माझी म्हैस आजारातून बरी केंव्हा होईल असा विचार कर आणि एक पान काढ व उजव्या
बाजूवरील पान क्रमांक मला सांग . त्याप्रमाणे करून त्याने मला १४५ क्रमांक सांगितला १४५ नंबरवरून मी
कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली .
हा प्रश्न मी ९ जून २०१४ रोजी १०=३४=२२ वाजता अं १७,५९ रे ७४,२६ येथे सोडविला
ह्या कुंडलीत शेतकऱ्याच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू .
चंद्र लाभ स्थानात आहे . म्हणजे षष्ठ स्थानापासून षष्ठ स्थानात . शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार
केला जातो चंद्र लाभ स्थानात आहे म्हणजेच म्हैस आजारी आहे हे नक्की झाले .
षष्ठ स्थान पाळीव प्राणी म्हणजेच म्हैस . षष्ठ स्थान हे म्हैसिचे लग्न स्थान होईल . षष्ठ स्थान लग्न स्थान
धरून कुंडली फिरवून घेतली आहे .
म्हैसिचे लग्न मेष चर तत्वाचे आहे षष्ठ स्थान कन्या ०३,१३,१९ ने सुरु
होते . षष्ठ स्थानाचा सब शनि आहे शनि म्हैस आजारातून बरी होणार कि नाही ते सांगणार आहे . शनीचे
कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
शनि --७,११,गु दृ ४,१०,शु दृ १,८
गुरु ---३,१०,४ क यु
बुध ---३,४
राहू ---६,७ क यु शु १,८
लग्न चर तत्वाचे आहे म्हणजे ११ वे स्थान हे बाधक स्थान होईल . शनि १,३,४,६,७,८१० ११ भावांचा
बलवान कार्येश आहे शनि १, ४,( अंतिम स्थान ) ६,( आजार )८,(मृत्यू) १०,(इच्छा पूर्ती होणार नाही)
११ ( बाधक स्थान )
षष्ठ चा सब शनि आहे म्हणजे दीर्घ मुदतीच आजार आहे . शनि तुल राशीत सप्तमात आहे .व अष्टम स्थानारंभी
आहे . (अंदाजे ५ अंश फरक )
षष्ठ चा सब शनि आहे ----दीर्घ मुदतीचे आजार
शनि तुल राशीत आहे म्हणून ----पोटा खालचा भाग ,मूत्रपिंड , गर्भाशय , कटी भागाची हाडे .
शनि तुल राशीत सप्तमात आहे ----स्त्री इंद्रिय , मूत्राशय, गर्भाशय , स्त्री अंडाशय , प्रोस्टट ग्रंथी
शनि अष्टम भावारंभी आहे( ५ अंश ) ----प्रजोत्पादन इंद्रिये , मुत्र , बीजकोष , योनी मार्ग
शनीचा नक्षत्र स्वामी गुरु आहे------ रक्त दोष , सूज येणे पांढऱ्या पेशी वाढणे ,कैंसर
गुरु अष्टमात नवम आरंभी -----मांडी ,जांघ , नाडी / धमणी
गुरु मिथुन राशीत ---- खांदे , हात ,फुफ्पुसे ,रक्त , श्वास
शनीचा सब बुध ---मज्जातंतूचे विकार , अपचन ,भूक मंदावणे ,पोटदुखी , अतिसार
बुध अष्टमात ---वरीलप्रमाणे
शनीचा सबचा नक्षत्र स्वामी राहू लाभात ( लाभ स्थान --बाधक )व्यायारांभी राहू तुल राशीत वरील प्रमाणे
वरील निष्कर्ष वरून एक गोष्ट लक्षात येते म्हैसिला गर्भाशय , मूत्रपिंड, मूत्राशय चा विकार झाला आहे . प्रश्न
वेळी मंगल / मंगल / शुक्र ची दशा चालू होती . मंगल शुक्र दशा १७ जून २०१४ पर्यंत होती . मंगल शुक्राचे
कार्येशत्व खालीलप्रमाणे
मंगल --- शुक्र ---१,८
चंद्र ---६,७ कयु राहू यु ६ शुक्र ---१ ,८
शनि ---७,११ राहू --- ७
गुरु ---३,११,४ कयू मंगल --- ६, ९
मंगल ३,४,६,७, ११ या भावांचा व शकूर १,६,७,८ भावांचा बलवान कार्येश आहे .
१ (लग्न ), ४ ( अंतिम क्षणं ), ६ ( आजार, रोग ) , ७ (मारक ), ११( बाधक ), ८ (मृत्यू )
नियम -- ज्यावेळी १,४,६,८,१२,मारक बाधक भावांच्या दशा येतात त्यावेळी वाचण्याची शक्यता कमी असते
१७ जून २०१४ पर्यंत . परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही . आजारातून बरी होण्यासाठी षष्ठ
चा व्यय म्हणजे पंचम भावाची दशा यावयास हवी . त्यापुढील विदशा रवीची आहे रविचे कार्येशत्व पुढीलप्रमाणे
रवि --२,५,३
मंगल ---६,९
राहू ---७
मंगल ---६,९
रवि विदशा पंचम भावाची बलवान कार्येश आहे . तसेच ९ भाव म्हणजे पंचमाचा पंचम रवि विदशेमध्ये आजर
बरा होइल . रवि विदश १७ जून २०१४ ते ८ जुलै २०१४ पर्यंत आहे याच कालावधीत म्हैसी चा आजार बारा
होईल असे सांगितले .
त्यानंतर मी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही . असो
महाजनांनी मार्गदर्शन करावे .
दि . १२/७/२०१४ रोजी वरील लेखातील शेतकरी एका कामानिमित्त माझ्याकडे आले होते .
त्यांना विचारले म्हैस कशी आहे ? ते म्हणाले तुम्ही सांगितलेल्या तारखेपासून तिच्यामध्ये खूप चांगला
फरक पडला आहे खाणे व्यवस्थित चालू आहे , परंतु अधाप दुध देत नाही . मी म्हटले ठीक आहे हळूहळू
तिच्यामध्ये फरक पडेल .
ज्यांच्या बोटाला धरून इथपर्यंत वाटचाल केली त्या मा . गोंधळेकर सर यांना वंदन करून इथेच पूर्णविराम देतो .
रवि --२,५,३
मंगल ---६,९
राहू ---७
मंगल ---६,९
रवि विदशा पंचम भावाची बलवान कार्येश आहे . तसेच ९ भाव म्हणजे पंचमाचा पंचम रवि विदशेमध्ये आजर
बरा होइल . रवि विदश १७ जून २०१४ ते ८ जुलै २०१४ पर्यंत आहे याच कालावधीत म्हैसी चा आजार बारा
होईल असे सांगितले .
त्यानंतर मी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही . असो
महाजनांनी मार्गदर्शन करावे .
दि . १२/७/२०१४ रोजी वरील लेखातील शेतकरी एका कामानिमित्त माझ्याकडे आले होते .
त्यांना विचारले म्हैस कशी आहे ? ते म्हणाले तुम्ही सांगितलेल्या तारखेपासून तिच्यामध्ये खूप चांगला
फरक पडला आहे खाणे व्यवस्थित चालू आहे , परंतु अधाप दुध देत नाही . मी म्हटले ठीक आहे हळूहळू
तिच्यामध्ये फरक पडेल .
ज्यांच्या बोटाला धरून इथपर्यंत वाटचाल केली त्या मा . गोंधळेकर सर यांना वंदन करून इथेच पूर्णविराम देतो .