एका लग्नाची तिसरी गोष्ट --२
फेसबुक वरील लेख वाचून एका स्त्री जातक फोनवर बोलत होती ....... म्हणाली माझा पहिला घटस्फोट झाला आहे . त्यानंतर मी दुसरे लग्न केले आहे . परंतु दुसऱ्या विवाहाची घटस्फोटाची केस चालू आहे . त्यानंतर एका मुलाची ओळख झाली. ओळखीचे रूपान्तर प्रेमात झाले आहे . मला वाटत आहे हा घटस्फोट झाला की प्रेम विवाह करावा . तर माझ्या नशिबात प्रेम विवाह आहे का ? मी तिसऱ्यांदा लग्न करावे का ? मी म्हटले तुझे बर्थ डिटेल्स दे . तिने खालीलप्रमाणे दिले आहे . मी येथे जन्मठिकाण दिलेले नाही , ज्या ज्योतिषांना पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा
दि --२३ / ६ / १९९१ वेळ ९-३८ सकाळी जन्मस्थळ---XXXX
प्रथम झालेल्या घटना तपासून पाहू. ....
पहिला विवाह दि ६ / १ /२०१३
सप्तम भावाचा सब २, ७ ,११ /५ ८ भावाचा कार्येश असेल तर २,७,११ भावांच्या सयुंक्त दशेत विवाह होतो .
पहिला विवाह सप्तम स्थानावरून .... ७ भावाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 12 6 9 Mars-Yuti 12 5 10 Venus-Yuti 12 4 11
It's N.Swami :-------- Mercury:- (11) 3 12
It's Sub :------------ Ketu:- (11) Cusp Yuti: (12) Rashi-Swami Mercury (11) 3 12
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (12) 6 (9) Mars-Yuti (12) 5 (10) Venus-Yuti (12) (4) 11
Itself aspects :------ 7 5 9
पहिल्या पायरीवर गुरु ११ चा कार्येश आहे म्हणून विवाह झाला परंतु ४ थ्यपायरीवर ४ ,१०,१२ . हे भाव विवाहाला प्रतिकूल आहेत गुरु , बुध नक्षत्रात आहे . बुध हर्षलच्या प्रतियोगात ( १७६.२ . ) आहे . गुरु चा सब केतू नेपच्यून च्या प्रतियोगात ( १७५. )आहे यामुळे घटस्फोट झाला. दशेचा विचार केला तर त्यावेळी शनी रवी बुध दशा होती.
शनी --- ३,७,८,९ / १,४,६,१०,१२
रवी ----२,५,९,११ / ४,६,१०,१२
बुध ----५,९,११ / ४,६,१०,१२
दशेमध्ये २,५,७,८,११ भाव असल्यामुळे विवाह झाला परंतु १,४,६,१०,१२ हे भाव विवाहाला प्रतिकूल आहेत म्हणून घटस्फोट झाला
दुसरा विवाह --२७ / ८ /२०१७
दुसरा विवाह नवम स्थानावरून--- नवम भावाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ---
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 5 Cusp Yuti: (6) Rashi-Swami Jupiter 12 6 9
It's N.Swami :-------- Venus:- (12) (4) 11 Mars-Yuti (12) 5 (10) Jupiter-Yuti (12) 6 (9)
It's Sub :------------ Ketu:- (11) Cusp Yuti: (12) Rashi-Swami Mercury (11) 3 12
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (12) 6 (9) Mars-Yuti (12) 5 (10) Venus-Yuti (12) (4) 11
Itself aspects :------ 12
ह्या मध्ये राहू ९,११ या भावाचा कार्येश आहे त्यामुळे विवाह झाला आहे परंतु ४,६,१०,१२ हे भाव विवाहाला प्रतिकूल आहेत . तसेच राहू , शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्र प्लूटो केंद्र योग्य आहे ( ९१. ) राहूच सब , केतू नेप्क्युन च्या प्रतियोगात आहे . यामुळे घटस्फोट ची केस चालू आहे .
दुसऱ्या विवाहाच्या वेळी शनी राहू बुध दशा होती .
शनी --- ३,७,८,९ / १,४,६,१०,१२
राहू--- ९,११ / ४,६,१०,१२
बुध ----५,९,११ / ४,६,१०,१२
३,५, ७,८,९,११ मुले विवाह झाला १,४,६,१०,१२ मुले घटस्फोटाची केस चालू आहे
आता सदर स्त्री जातक तिसरा विवाह करू इच्छिते . तिसरा विवाह होईल का ? आणि वैवाहिक सौख्य कसे असेल. असे विचारते आहे . तिसरा विवाह लाभ स्थानावरून पाहतात. लाभाचा सब गुरु च आहे गुरुचे कार्येशत्व या अगोदर आपण पहिलेच आहे . तिसरा विवाह करू नये असा सल्ला दिला . कारण त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे . जो मुलागा तिच्या मनात आहे त्याचा प्रथम विवाह आहे . त्याच्या घरचे दोनदा घटस्फोट झालेल्या मुलीला स्वीकारतील का हा मोठं प्रश्न आहे . प्रेम विवाहासाठी सप्तम भाव व पंचम भाव यांचे संबंध असावे लागतात. हिच्या पत्रिकेत सप्तम ,पंचम भावाचा सब गुरु ९ ( पंचम चा पंचम ) चा कार्येश आहे परंतु पंचमचा सब गुरु ७ चा कार्येश नाही . म्हणून प्रेम विवाह होणार नाही .
शुभंम भवतु !!!
No comments:
Post a Comment